शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

घाटीतील रुग्ण,नातेवाईकांनी सोबत पाणीही आणावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:18 IST

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. रुग्ण, नातेवाईकांना मागील तीन दिवसांपासून पिण्यासाठी थेंबभर पाणीही मिळत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपाण्याचा ठणठणाट : उकाड्याने रुग्ण, नवजात शिशूंचे प्रचंड हाल

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. रुग्ण, नातेवाईकांना मागील तीन दिवसांपासून पिण्यासाठी थेंबभर पाणीही मिळत नसल्याचे चित्र आहे. पाण्याच्या बाटल्या घेऊन रुग्णांचे नातेवाईक घाटी परिसरात फिरताना दिसून येत आहेत. पाणीच नसल्याने प्रत्येक वॉर्डातील शौचालयांची अवस्था एवढी भयानक झाली आहे की, रुग्णांना दुर्गंधीनेच मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. घाटीत दाखल होण्यासाठी येणाऱ्या रुग्णांनी सोबत पाणीही आणावे, असे म्हणण्याची वेळ सध्या आलीआहे.घाटी रुग्णालयाकडे पाण्याचे कोणतेच स्रोत नाही. महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर संपूर्ण रुग्णालयाची भिस्त अवलंबून आहे. मागील तीन महिन्यांपासून घाटी प्रशासन अपुºया पाणीपुरवठ्यासंदर्भात महापालिकेला वारंवार विचारणा करीत आहे. मागील आठवड्यात महापौर नंदकुमार घोडेले यांनीही स्वत: रुग्णालयात जाऊन पाहणी केली. पाणी प्रश्न त्वरित सोडविण्याचे आश्वासनही दिले. त्यानंतरही पाणीपुरवठ्यात किंचितही सुधारणा झालेली नाही.बुधवार ते शुक्रवारपर्यंत रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डात पाण्याचा अक्षरश: ठणठणाट होता. वॉर्डात मिळणारे पाणी एवढे गरम असते की, ते एक घोटही कोणी पिऊ शकणार नाही, अशा परिस्थितीत रुग्ण, नातेवाईक पाणी पीतचहोते. विविध विकासकामांवर कोट्यवधी रुपये खर्च करणाºया प्रशासनाने प्रत्येक आठ ते दहा वॉर्डांसाठी एक वॉटर कूलरही बसविला नाही. घाटीच्या मेडिसीन बिल्डिंगमध्ये वॉटर कूलरमुळे रुग्ण, नातेवाईकांना किमान थंड पाणी तरी पिण्यासाठी मिळते.रमजान महिन्यात अनेक रुग्णांचे नातेवाईक उपवास ठेवतात. त्यांना पहाटे चार वाजता पाणीच मिळत नसल्याने बरेच हाल होतात. सायंकाळीही उपवास सोडण्यासाठी बाजारातून दहा रुपयांची पाण्याची बाटली आणण्याशिवाय पर्याय नसतो.प्रचंड उकाडा तरी...घाटीतील अनेक वॉर्डांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल होतात. त्यामुळे वॉर्डांमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. रुग्णांचा हा प्रचंड भार प्रशासन कसाबसा सोसत आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे अनेक वॉर्डांमध्ये उकाडाही तेवढाच वाढला आहे. रुग्णांसह नातेवाईकांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रुग्णांनी आपला वैयक्तिक पंखा आणला तरी प्रशासन ते लावू देत नाही. नवजात शिशूंना या उकाड्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. प्रत्येक वॉर्डात प्रशासनाने कूलर लावले आहेत. हे कूलर फक्त डॉक्टर, नर्सच वापरू शकतात. रुग्णांसाठी एकाही ठिकाणी कू लरची व्यवस्था नाही.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबादwater shortageपाणीकपात