शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सरकारी घोषणांनी प्रवासी वाढले, पण रस्त्यांवर बस झाल्या कमी, नव्या बसची प्रतिक्षाच

By संतोष हिरेमठ | Updated: March 27, 2024 19:25 IST

कमाईत वाढ : जिल्ह्यात ५ वर्षांत ८३ एसटी झाल्या कमी, नव्या बसची प्रतीक्षाच

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने महिलांना प्रवास भाड्यात सवलत देण्याचे जाहीर केल्यानंतर गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील प्रवासी संख्येत तब्बल एक कोटीने वाढ झाली आहे. उत्पन्नातही वाढ झाली. कोरोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षांनंतर प्रथमच विभाग नफ्यात आला. मात्र, नव्या बसची संख्या वाढण्याऐवजी जुन्या बसची संख्या कमी झाल्याची चिंतादायक परिस्थिती आहे. नव्या बसची नुसती प्रतीक्षाच प्रवाशांना करावी लागत आहे.

महाराष्ट्र राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी मोठी घोषणा केली होती. एसटीच्या सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. या सवलतीसह यापूर्वीच्या अनेक सवलतींही एसटी बसमध्ये दिल्या जातात. प्रवासी संख्या वाढल्याने एसटी महामंडळाचा छत्रपती संभाजीनगर विभाग नफ्यात आला आहे; परंतु प्रवाशांना गर्दीतूनच प्रवास करावा लागत आहे. कारण बसची संख्या वाढण्याऐवजी कमीच होत आहे. भंगार बस ‘स्क्रॅब’ करण्यात आल्या.

जिल्ह्यातील बसची स्थिती२०१९ मध्ये एकूण किती बस : ६१३२०२४ मध्ये एकूण किती बस : ५३०

वर्षभरात २३ गेल्या, २५ दिल्यागेल्या वर्षभरात २३ बस ‘स्क्रॅप’ झाल्या. तुलनेत ५ ई- बस, १० ‘लाल’ बस आणि १० एशियाड बस विभागाला मिळाल्या.

प्रवासी संख्या- २०२२ ते २३ : ३ कोटी ९२ लाख ८१ हजार- २०२३ ते २४ : ५ कोटी १ लाख ३७ हजार

उत्पन्नाची स्थिती (छत्रपती संभाजीनगर विभाग)- २०२१-२२ मध्ये ७८ कोटींचा तोटा- २०२२-२३ मध्ये ६९ कोटींचा तोटा- २०२३-२४ मध्ये ११ कोटींचा नफा

ई- बस येणार; पण कधी?छत्रपती संभाजीनगरला २१६ ई- बस प्रस्तावित आहेत. यात पहिल्या टप्प्यात ७८ ई- बस मिळणार असल्याचे सांगण्यात येते. विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर म्हणाले, विभागाला लवकरच पहिल्या टप्प्यातील ई-बस मिळतील. विभाग नफ्यात आला आहे, ही जमेची बाजू आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादstate transportएसटी