शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
2
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
3
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
4
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
5
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
6
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
7
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
8
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार
9
खळबळजनक! T20 World Cup मध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, वेगवेगळ्या नंबरवरून आले फोन
10
ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री
11
फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
12
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी
13
सुख-शांती हिरावून घेऊ शकतं स्मार्टफोनचं व्यसन; 'या' आजारांचा धोका, काय आहे Nomophobia?
14
पश्चिम बंगालमध्ये नवा ट्विस्ट! CM ममता बॅनर्जी भाजपा खासदाराच्या घरी; चर्चांना उधाण
15
"पप्पा फक्त एकदा परत या आणि..."; शहीद वडिलांना आजही व्हॉईस मेसेज पाठवतो ७ वर्षांचा लेक
16
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ जुलैला मतदान आणि निकाल लागणार
17
'भाजपशासित राज्ये पेपरफुटीची केंद्रे बनली', NEET परीक्षेतील गोंधळावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
18
Paras Defence And Space Technologies : एका दिवसात २० टक्क्यांचे रिटर्न; 'या' स्मॉलकॅप डिफेन्स कंपनीचे शेअर्स का बनलेत रॉकेट?
19
'मला न्याय द्या...', स्वाती मालीवाल यांचे शरद पवार, राहुल गांधींना पत्र; भेटीची वेळ मागितली!
20
वयानुसार किती वेळ आणि कोणता प्रकारचा करावा व्यायाम?; WHO ने दिल्या गाइडलाईन्स

पार्किंगप्रश्नी समितीचे निव्वळ नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:11 AM

शहरात पार्किंगचा प्रश्न गंभीर बनत आहे. यामध्ये महापालिकेने लवकरात लवकर धोरण निश्चित करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मागील महिन्यात दिले. खंडपीठाच्या आदेशानंतर मनपाने युद्धपातळीवर पार्किंगसाठी नियुक्त समितीच्या दोनदा बैठका घेतल्या. बैठकीत ठोस कोणताच निर्णय झाला नाही, हे विशेष.

ठळक मुद्देखंडपीठाच्या आदेशाला बगल : दोन वेळेस औपचारिक बैठका घेतल्या

औरंगाबाद : शहरात पार्किंगचा प्रश्न गंभीर बनत आहे. यामध्ये महापालिकेने लवकरात लवकर धोरण निश्चित करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मागील महिन्यात दिले. खंडपीठाच्या आदेशानंतर मनपाने युद्धपातळीवर पार्किंगसाठी नियुक्त समितीच्या दोनदा बैठका घेतल्या. बैठकीत ठोस कोणताच निर्णय झाला नाही, हे विशेष.महापालिकेने मागील काही वर्षांमध्ये शहरात कुठेच पार्किंगची सोय केली नाही. विविध भागात व्यावसायिक इमारती, रहिवासी इमारती मोठ्या प्रमाणात उभारण्यात आल्या आहेत. बांधकाम परवानगी घेताना कागदावर असलेली पार्किंग नंतर गायब झाली आहे. त्यामुळे शहरात पार्किंगचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. दरवर्षी शहरात वाहनांची संख्या वाढत आहे. रस्ते ३० वर्षे जुने अरुंद आहेत. दिवसा, रात्री असंख्य नागरिक रस्त्यांवरच वाहने उभी करीत आहेत. महापालिकेच्या मालकीच्या जेवढ्या खुल्या जागा आहेत, त्यांचा वापर रात्री पार्किंगसाठीच होतोय. गुंठेवारी भागातील वसाहतींमध्ये तर अनेक नागरिक आपल्या घरासमोरच चारचाकी उभी करतात. त्यामुळे १० फुटांच्या रस्त्यात ये-जा करण्यासाठी जागाच शिल्लक राहत नाही. या सर्व परिस्थितीवर ‘लोकमत’ने वारंवार प्रकाश टाकला. एका जनहित याचिकेच्या सुनावणीत खंडपीठाने महापालिकेला पार्किंगचे धोरण निश्चित करण्याचे आदेश दिले. खंडपीठाच्या आदेशानुसार मागील महिन्यात अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक घेण्यात आली होती. समितीची दुसरी बैठकही घेण्यात आली. वाहतूक पोलिसांनी अद्याप मनपाला पार्किंग कोणत्या भागात हवी याचा अहवाल दिलेला नाही. त्यामुळे पुढील निर्णय झाला नाही.स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेने ज्या पद्धतीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर देत १०० बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्याच पद्धतीने स्मार्ट सिटीच्या निधीतून शहरात ठिकठिकाणी मल्टी स्टोअरेज पार्किंगची व्यवस्था केली जाऊ शकते. मात्र, प्रशासनाच्या अनास्थेसोबत राजकीय अनास्था या विषयात बरीच आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाCourtन्यायालय