शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

आईवडिलांनी मोबाईल खेळण्यास नकार दिला, अल्पवयीन मुलगी घर सोडून गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 11:59 IST

रात्रभर सर्वत्र शोध घेऊनही मिळून न आल्याने घाबरलेल्या पालकांनी वेदांतनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

छत्रपती संभाजीनगर : आईवडिलांनी मोबाईल खेळण्यास नकार दिल्याच्या कारणावरून १५ वर्षांच्या मुलीने थेट घर सोडले. वेदांतनगर पोलिसांनी शोध घेतल्यानंतर गुरुवारी दुपारी ती जालना शहरात सापडली. यानंतर तिला शहरात आणण्यात आले.

१५ वर्षीय कल्पना (नाव बदलले आहे) आईवडिलांना एकुलती एक मुलगी आहे. आईवडील दोघेही खासगी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. कल्पनाने अभ्यास करावा, असे त्यांना कायम वाटते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कल्पनाचा सातत्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते. त्यातच शिवाय मोबाईलचा वापर वाढला होता. आईवडिलांनी तिला रागावणे सुरू केले होते. २९ जुलै रोजी कल्पना पुन्हा मोबाईल मध्ये गुंग झाल्याने आईवडिलांनी तिला खडे बोल सुनावले. त्याचा कल्पनाला राग आला. मैत्रिणीकडे चालल्याचे सांगून तिने सायंकाळी ६ वाजता घर सोडले. नेहमीप्रमाणे काही तासांनी घरी येईल, असे आईवडिलांना वाटले. मात्र, रात्र उलटूनही कल्पना घरीच न परतल्याने ते पुरते घाबरून गेले होते.

रात्रभर सर्वत्र कल्पनाचा शोध घेऊनही मिळून न आल्याने घाबरलेल्या पालकांनी वेदांतनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. निरीक्षक प्रविणा यादव यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे यांना तपास सुरू केला. तिच्या जवळच्या मैत्रिणींची चौकशी केल्यावर ती सिडको बसस्थानकाच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. निरीक्षक प्रविणा यादव, उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे यांनी तांत्रिक तपास केल्यावर कल्पना जालन्याच्या दिशेने गेल्याचे कळाले. मुंडे सहकाऱ्यांसह जालन्याला रवाना झाले. तेथील तिच्या मैत्रिणीचे घर गाठताच कल्पना सुरक्षित मिळून आली. त्यानंतर तिने आईवडिलांचे सततचे रागावणे, मोबाईल खेळण्यास नकार दिल्याच्या कारणातून घर सोडल्याची कबुली दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMobileमोबाइल