शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

परभणी-मनमाड दुहेरीकरण थंडबस्त्यात गेल्याने मराठवाड्यावर अन्याय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 19:24 IST

हा मार्ग नजीकच्या काळात होणे आता अशक्य आहे.

ठळक मुद्देपरळी-नगर आणि दौंड-मनमाड रेल्वेमार्गाच्या कामामुळे सर्वेक्षणाचा अहवाल ठेवला बाजूला

औरंगाबाद : परभणी- औरंगाबाद- मनमाड रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचा प्रस्ताव थंडबस्त्यात गेला आहे. परळी- नगर आणि दौंड- मनमाड रेल्वेमार्गाच्या कामामुळे रेल्वे बोर्डाने दुहेरीकरणाच्या सर्वेक्षणाचा अहवाल बाजूला ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे हा मार्ग नजीकच्या काळात होणे आता अशक्य आहे. वर्षानुवर्षे मराठवाड्यावर अन्याय होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. 

परभणी ते मुदखेड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम ५० टक्क्यांवर पूर्ण झालेले आहे. उर्वरित काम मार्च, एप्रिल-२०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. परभणी ते मुदखेड दुहेरीकरण मार्गी लागल्याने अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या परभणी-मनमाड मार्गाचेही दुहेरीकरण होईल, अशी अपेक्षा मराठवाड्यातून व्यक्त होत होती. दक्षिण मध्य रेल्वेकडून परभणी- औरंगाबाद- मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्तावदेखील रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. 

या प्रस्तावाला कधी मंजुरी मिळते, याकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागलेले असताना सध्यातरी त्याला रेल्वे बोर्डाकडून प्राधान्य नसल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. स्वानंद सोळंके यांनी माहितीच्या अधिकारात मनमाड- औरंगाबाद- परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या परिस्थितीची विचारणा केली. यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून बुधवारी माहिती देण्यात आली. परभणी- औरंगाबाद- मनमाड हा २९१ कि.मी.चा मार्ग आहे. यासाठी २,१९९.४१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे; परंतु सध्या मराठवाड्यात परळी- नगर आणि दौंड- मनमाड या रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असल्यामुळे सर्वेक्षण झालेल्या परभणी- मनमाड या मार्गाच्या दुहेरीकरणाचा सध्या कोणताही विचार नसल्याचे बोर्डाने म्हटले आहे. बोर्डाच्या माहितीनुसार यंदाच्या अर्थसंकल्पातही दुहेरीकरणाला हिरवा कंदिल मिळणार नाही.

महाव्यवस्थापक म्हणाले होते...औरंगाबाद दौऱ्यात १२ डिसेंबर २०१८ रोजी तत्कालीन दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव म्हणाले होते, दुहेरीकरणाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविलेला आहे. आगामी अर्थसंकल्पात मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. मंजुरी मिळाल्यानंतर प्लॅन तयार करून तीन वर्षांत दुहेरीकरण होईल. मंजुरी मिळाल्यानंतर नियोजन केले जाईल, असे ते म्हणाले होते. त्यामुळे मंजुरी कधी मिळणार आणि नियोजन कधी होणार, हा प्रश्न आहे.

मुख्यमंत्री काही बोलत नाहीतमुदखेड- परभणी या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम आधीच लांबणीवर पडले आहे. त्यात आता मनमाड- परभणी दुहेरीकरणही २०२२ पर्यंत अशक्य दिसते. मराठवाड्यातील रेल्वेमार्गासंदर्भात नुसती बनवाबनवी सुरू आहे; परंतु मुख्यमंत्री काहीही बोलत नाहीत. दुहेरीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे.-ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती

प्रवाशांची सतत गैरसोयएकेरी रुळावरून क्षमतेपेक्षा अधिक रेल्वे सध्या धावत आहेत. त्याची रेल्वे प्रशासनाला कल्पना आहे. तरीही दुहेरीकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. फक्त कोट्यवधींचे उत्पन्न घेण्यावरच भर दिला जात आहे. दुहेरीकरणाअभावी प्रवाशांना सतत गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे.-संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सेना

टॅग्स :railwayरेल्वेMarathwadaमराठवाडाpassengerप्रवासी