शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

पँथर म्हणजे असंतोषातून निर्माण झालेली चळवळ: दिलीप मंडल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 18:27 IST

दलित पँथरच्या सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त परिसंवाद

औरंगाबाद : दलित पँथर म्हणजे असंतोषातून निर्माण झालेली चळवळ आहे. या चळवळीने समाजातील पीडितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सध्याची परिस्थिती अनुकूल नसेलही. मात्र, पूर्वीच्या तुलनेत आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. येणाऱ्या काळात आपल्या आजूबाजूला काय चालले त्याकडे गांभीर्याने बघून वाटचाल करा, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार दिलीप मंडल यांनी केले.

दलित पँथरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहामध्ये रविवारी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात संशोधक डॉ. सूरज येंगडे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप मंडल आणि पोलिस अधिकारी प्रवीण मोरे यांचा सहभाग होता.

या वेळी दिलीप मंडल म्हणाले, स्वातंत्र्याच्या सुरुवातीपासून मागासवर्गीयांनी अनेक स्वप्ने बघितली होती. देश बदलेल. व्यवस्था बदलेल. पण, प्रत्यक्षात तसे घडले नाही. त्यामुळे मागासवर्गीयांनी स्वातंत्र्याची बघितलेली स्वप्ने तुटत गेली. सुरुवातीच्या काळात कमी संख्येने असलेल्या उच्चवर्णीयांनी शासकीय कार्यालयातील सर्व जागांवर कब्जा केला होता. मागासवर्गीयांची मुले शिकली, पण त्यांना नोकरी लागत नव्हती. जातिवाद कमी झाला नव्हता. अन्याय, अत्याचार कमी झाले नव्हते. या असंतोषातूनच दलित पँथरची सुरुवात झाली. अमेरिकेतील ‘ब्लॅक पँथर’ आणि महाराष्ट्रातील ‘दलित पँथर’ यांच्यात एकसारखे वैचारिक साम्य आहे. अमेरिकेत निग्रोंना अधिकारापासून वंचित ठेवले जात होते. त्यामुळे त्यांनी मोठे आंदोलन उभारले. त्यात अनेक लोक मारले गेले. त्यानंतर अमेरिकी प्रशासन आणि उद्योग हादरले. तेथील सरकारने निग्रोंना सवलती देण्यास सुरुवात केली. त्याच पद्धतीने दलित पँथरने चळवळ उभारली.

प्रवीण मोरे म्हणाले, शेड्युल कास्ट फेडरेशनने सर्वप्रथम जातीविरोधी रणशिंग फुंकले होते. त्यातूनच दलित पँथरची बीजे रुजली. या परिसंवादाचे प्रास्ताविक सतीश पट्टेकर यांनी, तर राजेंद्र गोणारकर यांनी सूत्रसंचालन केले.

दलित पँथर ही आग आहेया वेळी सूरज येंगडे म्हणाले, पँथर मोठी होत गेली. नेतेही मोठे होत गेले. जिथे अन्याय-अत्याचार व्हायचे तिथे पँथर जाणार, हे कळताच प्रस्थापितांच्या मनात थरकाप उडायचा. पँथरचा असा धाक होता. मात्र, नंतर वैचारिक मतभेदामुळे पँथर बरखास्त झाली. यामध्ये विरोधकांचा हस्तक्षेप महत्त्वाचा होता. परंतु, दलित पँथर ही आग आहे. ती पिढ्यानपिढ्या जळत राहणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद