शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

पँथर म्हणजे असंतोषातून निर्माण झालेली चळवळ: दिलीप मंडल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 18:27 IST

दलित पँथरच्या सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त परिसंवाद

औरंगाबाद : दलित पँथर म्हणजे असंतोषातून निर्माण झालेली चळवळ आहे. या चळवळीने समाजातील पीडितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सध्याची परिस्थिती अनुकूल नसेलही. मात्र, पूर्वीच्या तुलनेत आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. येणाऱ्या काळात आपल्या आजूबाजूला काय चालले त्याकडे गांभीर्याने बघून वाटचाल करा, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार दिलीप मंडल यांनी केले.

दलित पँथरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहामध्ये रविवारी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात संशोधक डॉ. सूरज येंगडे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप मंडल आणि पोलिस अधिकारी प्रवीण मोरे यांचा सहभाग होता.

या वेळी दिलीप मंडल म्हणाले, स्वातंत्र्याच्या सुरुवातीपासून मागासवर्गीयांनी अनेक स्वप्ने बघितली होती. देश बदलेल. व्यवस्था बदलेल. पण, प्रत्यक्षात तसे घडले नाही. त्यामुळे मागासवर्गीयांनी स्वातंत्र्याची बघितलेली स्वप्ने तुटत गेली. सुरुवातीच्या काळात कमी संख्येने असलेल्या उच्चवर्णीयांनी शासकीय कार्यालयातील सर्व जागांवर कब्जा केला होता. मागासवर्गीयांची मुले शिकली, पण त्यांना नोकरी लागत नव्हती. जातिवाद कमी झाला नव्हता. अन्याय, अत्याचार कमी झाले नव्हते. या असंतोषातूनच दलित पँथरची सुरुवात झाली. अमेरिकेतील ‘ब्लॅक पँथर’ आणि महाराष्ट्रातील ‘दलित पँथर’ यांच्यात एकसारखे वैचारिक साम्य आहे. अमेरिकेत निग्रोंना अधिकारापासून वंचित ठेवले जात होते. त्यामुळे त्यांनी मोठे आंदोलन उभारले. त्यात अनेक लोक मारले गेले. त्यानंतर अमेरिकी प्रशासन आणि उद्योग हादरले. तेथील सरकारने निग्रोंना सवलती देण्यास सुरुवात केली. त्याच पद्धतीने दलित पँथरने चळवळ उभारली.

प्रवीण मोरे म्हणाले, शेड्युल कास्ट फेडरेशनने सर्वप्रथम जातीविरोधी रणशिंग फुंकले होते. त्यातूनच दलित पँथरची बीजे रुजली. या परिसंवादाचे प्रास्ताविक सतीश पट्टेकर यांनी, तर राजेंद्र गोणारकर यांनी सूत्रसंचालन केले.

दलित पँथर ही आग आहेया वेळी सूरज येंगडे म्हणाले, पँथर मोठी होत गेली. नेतेही मोठे होत गेले. जिथे अन्याय-अत्याचार व्हायचे तिथे पँथर जाणार, हे कळताच प्रस्थापितांच्या मनात थरकाप उडायचा. पँथरचा असा धाक होता. मात्र, नंतर वैचारिक मतभेदामुळे पँथर बरखास्त झाली. यामध्ये विरोधकांचा हस्तक्षेप महत्त्वाचा होता. परंतु, दलित पँथर ही आग आहे. ती पिढ्यानपिढ्या जळत राहणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद