शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

पँथर म्हणजे असंतोषातून निर्माण झालेली चळवळ: दिलीप मंडल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 18:27 IST

दलित पँथरच्या सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त परिसंवाद

औरंगाबाद : दलित पँथर म्हणजे असंतोषातून निर्माण झालेली चळवळ आहे. या चळवळीने समाजातील पीडितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सध्याची परिस्थिती अनुकूल नसेलही. मात्र, पूर्वीच्या तुलनेत आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. येणाऱ्या काळात आपल्या आजूबाजूला काय चालले त्याकडे गांभीर्याने बघून वाटचाल करा, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार दिलीप मंडल यांनी केले.

दलित पँथरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहामध्ये रविवारी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात संशोधक डॉ. सूरज येंगडे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप मंडल आणि पोलिस अधिकारी प्रवीण मोरे यांचा सहभाग होता.

या वेळी दिलीप मंडल म्हणाले, स्वातंत्र्याच्या सुरुवातीपासून मागासवर्गीयांनी अनेक स्वप्ने बघितली होती. देश बदलेल. व्यवस्था बदलेल. पण, प्रत्यक्षात तसे घडले नाही. त्यामुळे मागासवर्गीयांनी स्वातंत्र्याची बघितलेली स्वप्ने तुटत गेली. सुरुवातीच्या काळात कमी संख्येने असलेल्या उच्चवर्णीयांनी शासकीय कार्यालयातील सर्व जागांवर कब्जा केला होता. मागासवर्गीयांची मुले शिकली, पण त्यांना नोकरी लागत नव्हती. जातिवाद कमी झाला नव्हता. अन्याय, अत्याचार कमी झाले नव्हते. या असंतोषातूनच दलित पँथरची सुरुवात झाली. अमेरिकेतील ‘ब्लॅक पँथर’ आणि महाराष्ट्रातील ‘दलित पँथर’ यांच्यात एकसारखे वैचारिक साम्य आहे. अमेरिकेत निग्रोंना अधिकारापासून वंचित ठेवले जात होते. त्यामुळे त्यांनी मोठे आंदोलन उभारले. त्यात अनेक लोक मारले गेले. त्यानंतर अमेरिकी प्रशासन आणि उद्योग हादरले. तेथील सरकारने निग्रोंना सवलती देण्यास सुरुवात केली. त्याच पद्धतीने दलित पँथरने चळवळ उभारली.

प्रवीण मोरे म्हणाले, शेड्युल कास्ट फेडरेशनने सर्वप्रथम जातीविरोधी रणशिंग फुंकले होते. त्यातूनच दलित पँथरची बीजे रुजली. या परिसंवादाचे प्रास्ताविक सतीश पट्टेकर यांनी, तर राजेंद्र गोणारकर यांनी सूत्रसंचालन केले.

दलित पँथर ही आग आहेया वेळी सूरज येंगडे म्हणाले, पँथर मोठी होत गेली. नेतेही मोठे होत गेले. जिथे अन्याय-अत्याचार व्हायचे तिथे पँथर जाणार, हे कळताच प्रस्थापितांच्या मनात थरकाप उडायचा. पँथरचा असा धाक होता. मात्र, नंतर वैचारिक मतभेदामुळे पँथर बरखास्त झाली. यामध्ये विरोधकांचा हस्तक्षेप महत्त्वाचा होता. परंतु, दलित पँथर ही आग आहे. ती पिढ्यानपिढ्या जळत राहणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद