शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

पैठण तालुक्यात ४५ हजार हेक्टरवरील पिकांना परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 15:13 IST

तहसील प्रशासनाने पंचनामा करण्यासाठी प्रत्येक गावासाठी एक पथक तयार केले आहे

ठळक मुद्देबाधित क्षेत्रापैकी ३६१२० हेक्टर क्षेत्र कापुस पिकाखालील आहे.फळबागांच्या बाधित क्षेत्राची आकडेवारी अद्याप आलेली नाही. 

पैठण : परतीच्या पावसाने पैठण तालुक्यातील ४४९७८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून ६३०३४ ईतक्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तहसील प्रशासनाने पंचनामा करण्यासाठी प्रत्येक गावासाठी एक पथक तयार केले असून शेतकऱ्यांनी शेतात उपस्थित राहून नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत असे आवाहन पैठणचे प्रभारी तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी केले आहे.

पैठण तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने  प्रामुख्याने शेतातील कापुस,  सोयाबीन, बाजरी, मका व फळबागांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. तहसील प्रशासन व कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक नुकसान अंदाज अहवालात ४४९७८ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे म्हटले आहे. बाधित क्षेत्रापैकी ३६१२० हेक्टर क्षेत्र कापुस पिकाखालील आहे. सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असून जवळपास १२९० हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. फळबागांच्या बाधित क्षेत्राची आकडेवारी अद्याप आलेली नाही. 

पैठण तालुक्यातील १९१ गावासाठी तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामसेवक अशा त्रीसदस्यीय पथकाची निर्मिती करण्यात आली असून पंचनाम्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी  दिली. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला असेल अशा शेतकऱ्यांनी पंचनामा करतांना नोंद करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी केले आहे.

४० गावांचे पंचनामे पूर्ण......पैठण तालुक्यात गतीने पंचनामे करण्यात येत असून ४० गावातील बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असल्याचे तहसीलदार भारस्कर यांनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादagricultureशेतीFarmerशेतकरीRevenue Departmentमहसूल विभाग