शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीतून पैठण तालुक्याला वगळले; पालकमंत्री संदीपान भुमरे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 14:17 IST

पैठण तालुक्यासोबत वैजापूरला देखील वगळले; दुसऱ्या टप्प्यात मदत मिळणार असल्याचा शासनाचा दावा 

औरंगाबाद : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सुमारे २ लाख ८६ हजार शेतकऱ्यांच्या १ लाख ९२ हजार ९५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यांच्या भरपाईसाठी २६८ कोटी रुपयांची मदत शासनाने जाहीर केली असून, यात पैठण, वैजापूर तालुका व अप्पर तहसीलअंतर्गत येणाऱ्या नुकसानीचा समावेश नाही. या तालुक्यात सततच्या पावसामुळे नुकसान झाले असून, १५० कोटींहून अधिकचा मदतनिधी या तालुक्यांना जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकऱ्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीत तालुक्यांचा समावेश नसल्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे.

गेल्या आठवड्यात जिल्हा प्रशासनाने २६८ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्याबाबत तालुकानिहाय आदेश दिले आहेत. त्यामध्ये औरंगाबाद तालुक्यात ११ कोटी, फुलंब्रीत १२ कोटी, गंगापूर ५३ कोटी, खुलताबाद २१ कोटी, कन्नड ६३ कोटी, सिल्लोड ५५ कोटी, सोयगाव ४९ कोटी असा २६८ कोटींचा मदतनिधी वितरित करण्यात येणार आहे. दरम्यान, अन्नदाता शेतकरी संघटनेचे जयाजी सूर्यवंशी यांनी सांगितले की, पैठण तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांना मदत न करणे, विद्युतपंप बंद करणे हे ४ डिसेंबरपर्यंत थांबविले नाही तर जलसमाधी घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

पालकमंत्री काय म्हणालेअतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे नुकसानीचे दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात अतिवृष्टीचे नुकसान झालेल्या शेतकरी व क्षेत्रासाठी मदत देण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे पैठण, वैजापूर व अप्पर तहसीलअंतर्गत मदत जाहीर होणारच आहे. पैठण तालुक्यात ९५ कोटी मिळण्याची शक्यता आहे; तसेच वैजापूर व अप्पर तहसीलमध्येही मदत जाहीर होणार आहे. उगाच कुठल्याही गोष्टीचे राजकारण करण्यात काहीही अर्थ नाही.- संदीपान भुमरे, पालकमंत्री

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस