शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीतून पैठण तालुक्याला वगळले; पालकमंत्री संदीपान भुमरे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 14:17 IST

पैठण तालुक्यासोबत वैजापूरला देखील वगळले; दुसऱ्या टप्प्यात मदत मिळणार असल्याचा शासनाचा दावा 

औरंगाबाद : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सुमारे २ लाख ८६ हजार शेतकऱ्यांच्या १ लाख ९२ हजार ९५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यांच्या भरपाईसाठी २६८ कोटी रुपयांची मदत शासनाने जाहीर केली असून, यात पैठण, वैजापूर तालुका व अप्पर तहसीलअंतर्गत येणाऱ्या नुकसानीचा समावेश नाही. या तालुक्यात सततच्या पावसामुळे नुकसान झाले असून, १५० कोटींहून अधिकचा मदतनिधी या तालुक्यांना जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकऱ्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीत तालुक्यांचा समावेश नसल्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे.

गेल्या आठवड्यात जिल्हा प्रशासनाने २६८ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्याबाबत तालुकानिहाय आदेश दिले आहेत. त्यामध्ये औरंगाबाद तालुक्यात ११ कोटी, फुलंब्रीत १२ कोटी, गंगापूर ५३ कोटी, खुलताबाद २१ कोटी, कन्नड ६३ कोटी, सिल्लोड ५५ कोटी, सोयगाव ४९ कोटी असा २६८ कोटींचा मदतनिधी वितरित करण्यात येणार आहे. दरम्यान, अन्नदाता शेतकरी संघटनेचे जयाजी सूर्यवंशी यांनी सांगितले की, पैठण तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांना मदत न करणे, विद्युतपंप बंद करणे हे ४ डिसेंबरपर्यंत थांबविले नाही तर जलसमाधी घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

पालकमंत्री काय म्हणालेअतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे नुकसानीचे दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात अतिवृष्टीचे नुकसान झालेल्या शेतकरी व क्षेत्रासाठी मदत देण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे पैठण, वैजापूर व अप्पर तहसीलअंतर्गत मदत जाहीर होणारच आहे. पैठण तालुक्यात ९५ कोटी मिळण्याची शक्यता आहे; तसेच वैजापूर व अप्पर तहसीलमध्येही मदत जाहीर होणार आहे. उगाच कुठल्याही गोष्टीचे राजकारण करण्यात काहीही अर्थ नाही.- संदीपान भुमरे, पालकमंत्री

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस