शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीतून पैठण तालुक्याला वगळले; पालकमंत्री संदीपान भुमरे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 14:17 IST

पैठण तालुक्यासोबत वैजापूरला देखील वगळले; दुसऱ्या टप्प्यात मदत मिळणार असल्याचा शासनाचा दावा 

औरंगाबाद : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सुमारे २ लाख ८६ हजार शेतकऱ्यांच्या १ लाख ९२ हजार ९५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यांच्या भरपाईसाठी २६८ कोटी रुपयांची मदत शासनाने जाहीर केली असून, यात पैठण, वैजापूर तालुका व अप्पर तहसीलअंतर्गत येणाऱ्या नुकसानीचा समावेश नाही. या तालुक्यात सततच्या पावसामुळे नुकसान झाले असून, १५० कोटींहून अधिकचा मदतनिधी या तालुक्यांना जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकऱ्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीत तालुक्यांचा समावेश नसल्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे.

गेल्या आठवड्यात जिल्हा प्रशासनाने २६८ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्याबाबत तालुकानिहाय आदेश दिले आहेत. त्यामध्ये औरंगाबाद तालुक्यात ११ कोटी, फुलंब्रीत १२ कोटी, गंगापूर ५३ कोटी, खुलताबाद २१ कोटी, कन्नड ६३ कोटी, सिल्लोड ५५ कोटी, सोयगाव ४९ कोटी असा २६८ कोटींचा मदतनिधी वितरित करण्यात येणार आहे. दरम्यान, अन्नदाता शेतकरी संघटनेचे जयाजी सूर्यवंशी यांनी सांगितले की, पैठण तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांना मदत न करणे, विद्युतपंप बंद करणे हे ४ डिसेंबरपर्यंत थांबविले नाही तर जलसमाधी घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

पालकमंत्री काय म्हणालेअतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे नुकसानीचे दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात अतिवृष्टीचे नुकसान झालेल्या शेतकरी व क्षेत्रासाठी मदत देण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे पैठण, वैजापूर व अप्पर तहसीलअंतर्गत मदत जाहीर होणारच आहे. पैठण तालुक्यात ९५ कोटी मिळण्याची शक्यता आहे; तसेच वैजापूर व अप्पर तहसीलमध्येही मदत जाहीर होणार आहे. उगाच कुठल्याही गोष्टीचे राजकारण करण्यात काहीही अर्थ नाही.- संदीपान भुमरे, पालकमंत्री

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस