शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

पैठण शहरास सलग दोन दिवस गूढ आवाजाचे हादरे; प्रशासनाने मौन बाळगल्याने नागरिक भयभीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 19:48 IST

ढ आवाजाचा हादरा व तीव्रतेत सातत्याने वाढ  होत असल्याने नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पैठण: शहरात मंगळवारी ( दि ११) रोजीच्या गूढ आवाजाने बसलेल्या हादऱ्याची चर्चा ओसरत नाही तोच शुक्रवार व शनिवार असे सलग दोन दिवस पुन्हा गूढ आवाजाच्या दणक्याने शहर हादरले. विशेष म्हणजे, भूगर्भातून येणाऱ्या या गूढ आवाजाची तीव्रता शहराच्या दक्षिण भागास जास्त जाणवते असे अनुभवास आले आहे. गूढ आवाजाबाबत प्रशासनाने मौन धारण केल्याने जनतेच्या मनात भितीने घर केले आहे. प्रशासनाने या गूढ आवाजा बाबत खुलासा करावा अशी मागणी होत आहे. 

पैठण शहर मंगळवारी दुपारी १.४७ वा जोरदार गुढ आवाजाने हादरले, यानंतर दि १४ रोजी सायंकाळी ६.०२ वा पुन्हा गूढ आवाजाचा दणका बसला. शनिवारी ४.१६ वा परत शक्तीशाली आवाजाचा दणका बसला. गूढ आवाजाच्या दणक्याने नागरीक भयभीत झाले आहेत. या अगोदर बसलेल्या भूगर्भातील गूढ आवाजाची नोंद जायकवाडी धरणावरील भूकंपमापण यंत्रावर झालेली नाही परंतु सध्या जायकवाडी धरणावरील भूकंपमापण यंत्र बंद असल्याने गेल्या पाच दिवसात झालेले गूढ आवाज व भूगर्भातील हालचालीची नोंद होणार नसल्याने सगळेच रामभरोसे सुरू आहे. सततच्या गूढ आवाजाने नागरीकांची भितीने गाळण उडालेली आहे. 

आठ वर्षात ३५ गुढ आवाजाचे दणकेगेल्या ८ वर्षात आजचा ३५ वा गुढ आवाज होता. दरम्यान गूढ आवाजाचा हादरा व तीव्रतेत सातत्याने वाढ  होत असल्याने नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भुगर्भशास्त्रज्ञांनी गूढ आवाजाचा व भूगर्भातील हालचालीचा काही संबंध नाही असा अहवाल दिलेला आहे. शास्रज्ञांच्या म्हणण्यानुसार गूढ आवाज भूगर्भातील नाही हे मानले तर भूपृष्ठावर हा आवाज कोण कसा करतो याचाही तपास होणे गरजेचे आहे. परंतु, वारंवार असे धक्के बसत असताना जिल्हा प्रशासन मात्र  मौन बाळगून आहे प्रशासनाकडून कसलाच खुलासा होत नसल्याने या आवाजाचे गूढ दिवसोंदिवस वाढतच चालले आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण