शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

पडेगाव, कांचनवाडी कचरा प्रक्रिया प्रकल्प दिवाळीनंतर सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 15:57 IST

शहरात २०१८ मध्ये अभूतपूर्व कचराकोंडी निर्माण झाली होती.

ठळक मुद्दे वीजजोडणीअभावी रखडले होते प्रकल्पाचे काम

औरंगाबाद : शहरात कचराकोंडी दूर करण्यासाठी  महापालिकेने चार ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. चिकलठाणा येथील प्रकल्प सुरू होऊन वर्ष उलटले तरी इतर तीन प्रकल्प रखडलेले होते. आता पडेगाव व कांचनवाडी प्रकल्प सुरू करण्यास दिवाळीनंतरचा मुहूर्त प्रशासनाने काढला आहे. 

शहरात २०१८ मध्ये अभूतपूर्व कचराकोंडी निर्माण झाली होती. नारेगाव येथे कचरा टाकण्यास ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर नवी जागा शोधताना महापालिका व शासनाची दमछाक झाली. त्यामुळे शहरात हजारो टन कचरा पडून राहिला व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. त्यानंतर महापालिकेने धडा घेत कचऱ्याची साठवणूक न करता त्यावर प्रक्रिया करण्यासाठी चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल व कांचनवाडी येथे प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी १४८ कोटींच्या डीपीआरला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. एका वर्षात हे प्रकल्प सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, जागांचे वाद नागरिकांचा विरोध यामुळे चारही प्रकल्प रखडले.

गतवर्षी जून महिन्यात चिकलठाणा येथील प्रकल्प सुरू झाल्यामुळे महापालिकेला दिलासा मिळाला. हर्सूल येथील प्रकल्पाच्या जागेचा वाद अद्याप सुरू आहे. कांचनवाडी येथे हॉटेलमधून निघणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून गॅसनिर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प केवळ वीजजोडणी मिळत नसल्यामुळे आठ ते नऊ महिने ठप्प होता. आता वीजजोडणी मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. पडेगाव येथील प्रकल्पाला अद्याप विरोध सुरूच आहे. येथील कामदेखील अंतिम टप्प्यात असून, दिवाळीनंतर हे दोन्ही प्रकल्प सुरू होतील, असे घन कचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले. 

हर्सूल येथील जागेची मोजणीहर्सूल येथील प्रकल्प निविदेवरून वाद निर्माण झाल्याने रखडला होता. आता जागेवरून वाद पेटला आहे. परिसरातील शेतकरी या जागेवर दावा करीत काम थांबवीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने जागेची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोजणीनंतर प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न