शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

टोलनाका कर्मचाऱ्यांच्या जेवणाचे बिल थकवले, मेसवाल्याने थेट समृद्धी महामार्गाच बंद पाडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 20:55 IST

वेळ वाचवणाऱ्या समृद्धी महामार्गावर वाहतूक खोळंबा झाल्याने वाहनधारक संतप्त

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांना जेवणाचे डब्बे आणि चारचाकी वाहने पुरवणाऱ्या संस्थेचे पैसे थकवल्याने त्या संस्थेशी संबंधित लोकांनी वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील टोल नाका बंद पाडल्याची धक्कादायक घटना आज दुपारी १२ वाजता घडली. यामुळे महामार्गावर मोठ्याप्रमाणावर वाहनांचा खोळंबा झाला होता. मात्र, यावर टोलनाका व्यवस्थापक काहीही माहिती देत नसल्याने वाहनधारक संतप्त झाले. 

वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील टोल नाक्यावर कामाला असलेल्या कर्मचारी आणि अधिकारी यांना काही संस्थेकडून जेवणाचा डब्बा पुरवला जातो. सोबतच येण्याजाण्यासाठी चारचाकी वाहने देखील कंपनीकडून देण्यात आल्या आहेत. मात्र या दोन्ही संस्थांचे बिल मागील काही दिवसांपासून थकीत आहे, अनकेदा मागणी करून देखील बिल मिळत नव्हते. यामुळे दोन्ही संस्थेंच्या संबंधित लोकांनी आज दुपारी टोलनाक्यासमोर गाड्या आडव्या लावून थेट समृद्धी महामार्गच बंद पाडला. यामुळे वाहनांची मोठी रांग येथे लागली. वेळे वाचण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर अशी परिस्थिती निर्माण झाल्याने वाहनधारक संतप्त झाले. वाहतूक खोळंबा का झाला असा जाब वाहनधारकाने विचारातच टोलनाका व्यवस्थापकास उत्तर देऊ शकला नाही. यामुळे समृद्धी महामार्गावर प्रशासकीय कोणतेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले. तब्बल चार तास हा गोंधळ सुरु असल्याची माहिती आहे. मुख्य व्यवस्थापकाने धाव घेऊन थकीत बिल देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आडवी लावलेली वाहने बाजूला काढण्यात आली, त्यानंतर वाहतूक सुरु झाली.  

संतप्त वाहन चालकांनी गेट तोडलेदरम्यान, दोन तास पेक्षा अधिक थांबल्यावर देखील रस्ता सुरु होत नसल्याने वाहनधारकांमध्ये संताप पाहायला मिळाला. तर एका ट्रक चालकाने पुढे जाण्याची विनंती केली मात्र प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे ट्रकचालकाने थेट टोलनाक्याचे गेट तोडले. त्याच्यामागे अनेक गाड्या पुढे निघून गेल्या.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादtollplazaटोलनाका