शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

औट्रम घाट जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद;शेतकरी,पेट्रोलपंप,हॉटेल,गॅरेजच्या व्यवसायावर गदा!

By विकास राऊत | Updated: September 14, 2023 13:16 IST

कन्नडमार्गे चाळीसगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील औट्रम ११ कि.मी.च्या घाटात वाहतूक खोळंबत असल्याने तो बंद केला आहे.

छत्रपती संभाजीनगर : नॅशनल हायवे क्र. २११ (५२) सोलापूर ते धुळे या महामार्गावर असलेल्या कन्नड व चाळीसगावच्या मधील औट्रम घाटातील बोगद्याचे काम रद्द करण्याचा निर्णय होऊन वर्ष झाले आहे. महिनाभरापासून तो घाटही जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद आहे. यामुळे मार्गावरील पेट्रोल पंप, हॉटेल, गॅरेजच्या व्यवसायावर गदा आली आहे. घाट बंद आणि अर्थकारण ठप्प, अशी परिस्थिती आहे.

कन्नडमार्गे चाळीसगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील औट्रम ११ कि.मी.च्या घाटात वाहतूक खोळंबत असल्याने तो बंद केला आहे. मागील काही वर्षांपासून त्या घाटाला पर्यायी मार्ग नाही. रोज १२ हजारांहून अधिक वाहनांच्या राबत्यावर पेट्रोल पंप, हॉटेल, गॅरेजच्या व्यवसायाची रोजी-रोटी अवलंबून होती. घाट जड वाहतुकीला बंद असल्यामुळे हे अर्थकारण बंद पडले. आता ही वाहतूक धुळे ते मनमाड, अहमदनगर, पुणे ते सोलापूर व दक्षिण भारताकडे जात असल्याने घाटामागील व पुढील महामार्गावरील व्यावसायिक हताश आहेत.

शेतकऱ्यांचेही नुकसान....घाटाच्या पलीकडून येणारा भाजीपाला शेतकरी कन्नड व छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आणतात. परंतु ती वाहने देखील इतर मार्गाने जात आहेत. परिणामी, शेतकऱ्यांचे अर्थकारणही कोलमडले आहे. तर वाहतूक लांबून होत असल्यामुळे भाजीपाला महागला आहे.

घाट एक, संकटे अनेक....साडेपाच ते ६ हजार कोटींवर औट्रम बोगद्याच्या कामाचा खर्च गेल्यामुळे खर्चात कपात करण्याचा ‘घाट’ एनएचएआयने घातला. नवीन पर्याय शोधण्याच्या डीपीआरलाही एजन्सीअभावी ग्रहण लागले. पर्याय शोधण्यासाठी तीन वेळा डीपीआरसाठी निविदा मागविल्या. परंतु कुठलीही एजन्सी पुढे न आल्यामुळे औट्रम घाटामागे लागलेले संकट कायम आहे.

आम्ही गुंतवणूक करून चूक केली का...?सोलापूर-धुळे हायवे बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या सेवेसाठी असलेले हॉटेल्स, गॅरेज, पेट्रोलपंप चालकांचे सध्या हाल सुरू आहेत. घाट बंद असून जड वाहनांसह इतर वाहनेदेखील औरंगाबाद जिल्ह्याच्या हद्दीतून येत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहेच; शिवाय ६ हजारांवरून २ हजार लिटर इंधन विक्री झाली आहे. गॅरेज, हॉटेल्स चालकांचे तर प्रचंड नुकसान होत आहे. महामार्गावर गुंतवणूक करून चूक केल्यासारखे वाटते आहे.-विश्वदीप करंजीकर, पेट्रोल पंपचालक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग