शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

औट्रम घाट जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद;शेतकरी,पेट्रोलपंप,हॉटेल,गॅरेजच्या व्यवसायावर गदा!

By विकास राऊत | Updated: September 14, 2023 13:16 IST

कन्नडमार्गे चाळीसगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील औट्रम ११ कि.मी.च्या घाटात वाहतूक खोळंबत असल्याने तो बंद केला आहे.

छत्रपती संभाजीनगर : नॅशनल हायवे क्र. २११ (५२) सोलापूर ते धुळे या महामार्गावर असलेल्या कन्नड व चाळीसगावच्या मधील औट्रम घाटातील बोगद्याचे काम रद्द करण्याचा निर्णय होऊन वर्ष झाले आहे. महिनाभरापासून तो घाटही जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद आहे. यामुळे मार्गावरील पेट्रोल पंप, हॉटेल, गॅरेजच्या व्यवसायावर गदा आली आहे. घाट बंद आणि अर्थकारण ठप्प, अशी परिस्थिती आहे.

कन्नडमार्गे चाळीसगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील औट्रम ११ कि.मी.च्या घाटात वाहतूक खोळंबत असल्याने तो बंद केला आहे. मागील काही वर्षांपासून त्या घाटाला पर्यायी मार्ग नाही. रोज १२ हजारांहून अधिक वाहनांच्या राबत्यावर पेट्रोल पंप, हॉटेल, गॅरेजच्या व्यवसायाची रोजी-रोटी अवलंबून होती. घाट जड वाहतुकीला बंद असल्यामुळे हे अर्थकारण बंद पडले. आता ही वाहतूक धुळे ते मनमाड, अहमदनगर, पुणे ते सोलापूर व दक्षिण भारताकडे जात असल्याने घाटामागील व पुढील महामार्गावरील व्यावसायिक हताश आहेत.

शेतकऱ्यांचेही नुकसान....घाटाच्या पलीकडून येणारा भाजीपाला शेतकरी कन्नड व छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आणतात. परंतु ती वाहने देखील इतर मार्गाने जात आहेत. परिणामी, शेतकऱ्यांचे अर्थकारणही कोलमडले आहे. तर वाहतूक लांबून होत असल्यामुळे भाजीपाला महागला आहे.

घाट एक, संकटे अनेक....साडेपाच ते ६ हजार कोटींवर औट्रम बोगद्याच्या कामाचा खर्च गेल्यामुळे खर्चात कपात करण्याचा ‘घाट’ एनएचएआयने घातला. नवीन पर्याय शोधण्याच्या डीपीआरलाही एजन्सीअभावी ग्रहण लागले. पर्याय शोधण्यासाठी तीन वेळा डीपीआरसाठी निविदा मागविल्या. परंतु कुठलीही एजन्सी पुढे न आल्यामुळे औट्रम घाटामागे लागलेले संकट कायम आहे.

आम्ही गुंतवणूक करून चूक केली का...?सोलापूर-धुळे हायवे बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या सेवेसाठी असलेले हॉटेल्स, गॅरेज, पेट्रोलपंप चालकांचे सध्या हाल सुरू आहेत. घाट बंद असून जड वाहनांसह इतर वाहनेदेखील औरंगाबाद जिल्ह्याच्या हद्दीतून येत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहेच; शिवाय ६ हजारांवरून २ हजार लिटर इंधन विक्री झाली आहे. गॅरेज, हॉटेल्स चालकांचे तर प्रचंड नुकसान होत आहे. महामार्गावर गुंतवणूक करून चूक केल्यासारखे वाटते आहे.-विश्वदीप करंजीकर, पेट्रोल पंपचालक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग