शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची १७० कोटी थकबाकी देणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 3:51 PM

यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना सुरू होणे शक्य

औरंगाबाद : राज्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांच्या वीजबिलाची १७० कोटी रुपये थकबाकी देण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना सुरू होणे शक्य होणार आहे, असे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर निंबाळकर यांनी बुधवारी सांगितले. 

जूनपर्यंत वीजबिल भरण्यात येणार आहे. वीजबिल थकल्यामुळे महावितरण कंपनीने ग्रामीण पुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे पाणी असूनही विजेअभावी ग्रामपंचायतींना उपसा करणे शक्य नव्हते. थकबाकी देण्याचा निर्णय झाल्यामुळे ग्रामीण भागांना दिलासा मिळणार आहे. विभागातील दुष्काळ, जलसाठा, चाराटंचाईच्या अनुषंगाने निंबाळकर यांनी आढावा बैठक घेतली. मराठवाड्यात चाराटंचाई जाणवणार नाही, असे सांगून निंबाळकर म्हणाले, जायकवाडी सध्या मृत साठ्यात आलेले आहे. विभागात ४ टक्के जलसाठा आहे. 

३०० ते ३ हजारांपर्यंत जनावरे चारा छावणीत राहतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या काही योजनांचा विचार केला जात आहे. चारा आहे; परंतु त्याची वाहतूक करावी लागणार आहे. त्या दृष्टीने नियोजन केले आहे. तात्पुरती पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय झाला आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे लाईटबिल थकले होते. त्यासाठी १७० कोटी रुपये शासनाने देऊ केले आहेत. दुष्काळ अनुदान वाटपाच्या अनुषंगाने निर्णय झाला आहे. सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. 

मराठवाड्यात रबीत पेरणी कमी मराठवाड्यात एक, दोन जिल्हे वगळता रबी हंगामात पेरणी झालेली नाही. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, पुणे व साताऱ्यात रबी हंगामाची माहिती जाहीर करण्यात येणार आहे. खरिपामध्ये जे तालुके दोन्ही ट्रिगरमध्ये होते. त्यानुसार विभागातील ४१ तालुक्यांचा विचार झाला. खरीप हंगाम हातातून गेलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप केले आहे. वाड्या, वस्त्यांवर  पाणीपुरवठा करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.अनुदान वाटपाची सॉफ्टवेअरवरून माहिती मिळते, असे निंबाळकर यांनी  सांगितले. 

टॅग्स :fundsनिधीState Governmentराज्य सरकारelectricityवीजgram panchayatग्राम पंचायत