शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

आपली नदी खाम नदी स्वच्छता अभियान; खामनदीत २४९ ठिकाणी सोडले जाते सांडपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 15:45 IST

घाण, कचऱ्यामुळे अत्यंत अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त आणि प्रदूषित झालेले नदीचे पात्र 'आपली नदी खाम नदी स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ करून नदीला गतकालीन महत्त्व प्राप्त करून देण्याचे महत्त्वाकांक्षी अभियान औरंगाबाद महापालिका, छावणी परिषद , काही सामाजिक आणि अशासकीय संस्था आणि सुजाण नागरिकांच्या सहकार्याने सुरु आहे.

ठळक मुद्देसातारा पर्वतरांगा आणि जटवाडा टेकड्यांच्यामध्ये दुधना नदीच्या खोऱ्यात खाम नदीचा उगम होतो.

- प्रभुदास पाटोळेऔरंगाबाद : नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि पिण्यालायक पाणी असल्यामुळे सुमारे चार शतकापूर्वी ज्या नदीच्या तीरावर तत्कालीन 'खडकी' गाव आणि आजचे 'औरंगाबाद' शहर वसले , त्या खाम नदीच्या पात्रातून सध्या पाण्याऐवजी सांडपाणीच वाहते आहे. तब्बल २४९ ठिकाणी या नदीपात्रात मलयुक्त पाणी सोडले जात असल्याचे एका पाहणीतून समोर आले.

घाण, कचऱ्यामुळे अत्यंत अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त आणि प्रदूषित झालेले नदीचे पात्र 'आपली नदी खाम नदी स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ करून नदीला गतकालीन महत्त्व प्राप्त करून देण्याचे महत्त्वाकांक्षी अभियान औरंगाबाद महापालिका, छावणी परिषद , काही सामाजिक आणि अशासकीय संस्था आणि सुजाण नागरिकांच्या सहकार्याने सुरु आहे. २५ जानेवारीपासून सुरु केलेल्या या अभियानांतर्गत ७ फेब्रुवारी आणि ६ मार्च २०२१ ला दर शनिवारी सकाळी ७:३० ते १०:३० दरम्यान पहिल्या टप्प्यात आयकर कार्यालयालगत लोखंडी पुलाजवळील नदी पात्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भिंत चित्रीकरण आणि बारापुल्ला पुलाखाली पाणी अनुकूल अर्जुन, अश्वगंधा , शिरीष , कांचन , करंज , खैर , अडुळसा आदी ३४ भारतीय जातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. येथे गुलमोहरसारख्या वृक्षांचे रोपण केल्यास परिसरातील निसर्ग सौंदर्यात भर पडेल, असे निसर्ग प्रेमींचे म्हणणे आहे. मात्र, सध्या कोविडच्या उद्रेकामुळे शहरात जमावबंदी लागू असल्याने हे अभियान तूर्तास स्थगित झाले आहे. परिस्थिती निवळताच पुन्हा अभियान सुरु होणार आहे .

दुधना नदीच्या खोऱ्यात नदीचा उगमसातारा पर्वतरांगा आणि जटवाडा टेकड्यांच्यामध्ये दुधना नदीच्या खोऱ्यात खाम नदीचा उगम होतो. सध्याच्या औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती भागातून गंगापूर तालुक्यातील येसगाव येथपर्यंत ७२ किमीच्या पट्ट्यातून वाहत जाऊन खाम नदी गोदावरी नदीत नाथसागरात जाऊन मिळते. या ७२ किमीच्या दरम्यान औरंगाबादेतील विविध वसाहती, आस्थापना आणि औद्योगिक वसाहती मधून २४९ ठिकाणी सांडपाणी, रसायनयुक्त पाणी, घनकचरा, मलमूत्र आणि इतर घाण नदी पात्रात सोडली जाते, असे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात आढळले आहे.

टॅग्स :riverनदीAurangabadऔरंगाबाद