शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

.... अन्यथा दहा दिवसांत औरंगाबाद शहर चकाचक करून दाखवले असते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:22 IST

दि. ११ आॅक्टोबरपासून शहरातील सर्व कचरा उचलायला सुरुवात करून पुढील दहा दिवसांत संपूर्ण शहर चकाचक करण्याची योजना मी आखली होती.

ठळक मुद्देकायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कचरा उचलण्यास तूर्त स्थगिती

औरंगाबाद : दि. ११ आॅक्टोबरपासून शहरातील सर्व कचरा उचलायला सुरुवात करून पुढील दहा दिवसांत संपूर्ण शहर चकाचक करण्याची योजना मी आखली होती. यासाठी शहरातील झोनवार यंत्रणा तयार ठेवली होती; परंतु कन्नड येथे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हा कचरा पिशोर येथे आणून टाकण्यास विरोध केला. यात मी हीरो होईल व श्रेय मला मिळेल, हा द्वेष अधिक दिसतो. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहरातील कचरा उचलण्यास मी तूर्त स्थगिती देत आहे, असे बुधवारी येथे कन्नडचे आमदार व शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर केले.महापालिका स्वत: कचरा उचलण्यास असमर्थ ठरली आहे. मी कचरा उचलण्याचे नियोजन करण्यास तयार आहे किंबहुना माझ्याकडे हे नियोजन तयार आहे; परंतु मला हे काम करू दिले जात नाही. बरे असेही नाही की, मध्येच उठून मी हे काम करायला मागतोय. एक प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. पिशोर या गावी लोकवस्तीपासून ६ कि. मी. दूर असलेल्या एका निर्मनुष्य ठिकाणी कचरा आणून टाकण्याचे आवाहन केले होते, तसेच महिन्याच्या आत त्यांना तसे शक्य न झाल्यास मला स्वखर्चाने कचरा उचलू देण्यासाठी मनपाचा ठराव करून परवानगी देण्यासंदर्भात विनंती केली होती; मात्र या माझ्या उपक्रमास शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस यांनी आंदोलन करून पुन्हा विरोध केला आहे, तसेच मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक हे मला अजिबात प्रतिसाद देत नाहीत. माझा फोनसुद्धा उचलत नाहीत. ८ आॅक्टोबर रोजी सविस्तर पत्र पाठवून मी त्यांना कचरा उचलण्याची परवानगी मागितली होती; पण त्यावर काहीही निर्णय झालेला नाही, अशी माहिती हर्षवर्धन जाधव यांनी दिली.

त्यांनी आणखी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी औरंगाबादचा काही कचरा नेऊन त्यावर प्रक्रिया करून खत तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले आहे. त्यावेळेला औरंगाबादच्या कचऱ्याने कोणाच्याही आरोग्याला इजा न पोहोचता शेतक-यांना त्यातून खत निर्माण होते, हे मी सिद्ध करून दाखवलेले आहे. असे असताना मी जर औरंगाबाद शहर दहा दिवसांत कचरामुक्त केले, तर मनपाची नाचक्की होईल म्हणून मुद्दाम राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन सर्व पक्ष आज मला पुन्हा कचरा नेण्यासाठी विरोध करीत आहेत. एक तर स्वत: काही करायचे नाही आणि जो करतो त्यालाही करू द्यायचे नाही, असा उद्दामपणा हे लोक करीत आहेत. एकीकडे राज्य व केंद्र सरकार स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी धडपड करा, असे सांगते, तर दुसरीकडे त्या सरकारमध्ये सामील असलेले प्रमुख पक्ष म्हणजेच शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते त्याला विरोध करतात, हे खरेच दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नPoliticsराजकारणHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका