शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 19:13 IST

अतिवृष्टीमुळे ३३% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचे संयुक्तिक पंचनामे करावेत आणि तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या त्रिसदस्यीय समितीने तालुक्यातील एकूण बाधित क्षेत्रासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या व लागणारी आर्थिक मदत याबाबत अहवाल सादर करावा, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

पैठण : अतिवृष्टीमुळे ३३% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचे संयुक्तिक पंचनामे करावेत आणि तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या त्रिसदस्यीय समितीने तालुक्यातील एकूण बाधित क्षेत्रासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या व लागणारी आर्थिक मदत याबाबत अहवाल सादर करावा, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

पैठण तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करून सात दिवसाच्या आत नुकसान अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी प्रशासकीय यंत्रणेस दिले आहेत. पैठण तालुक्यात यंदा २९ सप्टेंबरअखेर सरासरी पेक्षा २७२.७० मिमी जास्त पावसाची नोंद झाली. दहा महसूल मंडळापैकी तीन मंडळात १००० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला.

या पावसामुळे शेतात पाणी साचून उभ्या पिकांचे नुकसान झाले. कापसाच्या कैऱ्यात पाणी जाऊन हातातोंडाशी आलेले पिक वाया गेले.  मुगाच्या  शेंगांना पुन्हा कोंब फुटले, मोसंबीला गळ लागली, उभा असलेला तुर, ऊस शेतातच आडवा झाला. डाळिंब गळून पडले.  यामुळे शेतकरी  मोठ्याच  आर्थिक संकटात सापडले आहेत.

पैठण तालुक्यातील लागवडी खालील क्षेत्रापैकी जवळपास ६५% पिकांचे नुकसान झाले असून पेरणीसाठी केलेला खर्चसुद्धा शेतकऱ्यांच्या पदरात पडणार नाही, अशी परिस्थिती आहे. राज्यशासनाने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. पैठण तालुक्यातील पंचनामे करण्यासाठी नाथमंदीर परिसरातील किर्तन हॉलमध्ये तहसीलदार चंद्रकांत शेळके, गटविकास अधिकारी विजय लोंढे, कृषी अधिकारी संदिप सिरसाठ यांनी ग्रामसेवक, मंडळ कृषी अधिकारी मंडळ अधिकारी, कृषी सहायक, व तलाठी यांची संयुक्त बैठक घेऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊसpaithan-acपैठण