शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 19:13 IST

अतिवृष्टीमुळे ३३% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचे संयुक्तिक पंचनामे करावेत आणि तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या त्रिसदस्यीय समितीने तालुक्यातील एकूण बाधित क्षेत्रासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या व लागणारी आर्थिक मदत याबाबत अहवाल सादर करावा, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

पैठण : अतिवृष्टीमुळे ३३% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचे संयुक्तिक पंचनामे करावेत आणि तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या त्रिसदस्यीय समितीने तालुक्यातील एकूण बाधित क्षेत्रासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या व लागणारी आर्थिक मदत याबाबत अहवाल सादर करावा, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

पैठण तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करून सात दिवसाच्या आत नुकसान अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी प्रशासकीय यंत्रणेस दिले आहेत. पैठण तालुक्यात यंदा २९ सप्टेंबरअखेर सरासरी पेक्षा २७२.७० मिमी जास्त पावसाची नोंद झाली. दहा महसूल मंडळापैकी तीन मंडळात १००० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला.

या पावसामुळे शेतात पाणी साचून उभ्या पिकांचे नुकसान झाले. कापसाच्या कैऱ्यात पाणी जाऊन हातातोंडाशी आलेले पिक वाया गेले.  मुगाच्या  शेंगांना पुन्हा कोंब फुटले, मोसंबीला गळ लागली, उभा असलेला तुर, ऊस शेतातच आडवा झाला. डाळिंब गळून पडले.  यामुळे शेतकरी  मोठ्याच  आर्थिक संकटात सापडले आहेत.

पैठण तालुक्यातील लागवडी खालील क्षेत्रापैकी जवळपास ६५% पिकांचे नुकसान झाले असून पेरणीसाठी केलेला खर्चसुद्धा शेतकऱ्यांच्या पदरात पडणार नाही, अशी परिस्थिती आहे. राज्यशासनाने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. पैठण तालुक्यातील पंचनामे करण्यासाठी नाथमंदीर परिसरातील किर्तन हॉलमध्ये तहसीलदार चंद्रकांत शेळके, गटविकास अधिकारी विजय लोंढे, कृषी अधिकारी संदिप सिरसाठ यांनी ग्रामसेवक, मंडळ कृषी अधिकारी मंडळ अधिकारी, कृषी सहायक, व तलाठी यांची संयुक्त बैठक घेऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊसpaithan-acपैठण