शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

शरद पवारांऐवजी वृत्तीला होता विरोध

By admin | Updated: November 14, 2014 00:57 IST

औरंगाबाद : भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केल्यामुळे राज्यात खा. गोपीनाथ मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे.

औरंगाबाद : भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केल्यामुळे राज्यात खा. गोपीनाथ मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. मात्र, ग्रामविकासमंत्री पकंजा मुंडे यांनी राष्ट्रवादीला विरोध करणे आणि सोशल मीडियातील प्रकरणी यू- टर्न घेतला. खा. मुंडे यांचा विरोध राष्ट्रवादीतील व्यक्तीसापेक्ष नव्हता. तो वृत्तीसापेक्ष होता, असे घूमजाव करणारे उत्तरही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. ग्रामीण महिला बचत गटाच्या सिद्धा प्रदर्शनाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. १२ नोव्हेंबरच्या विधानसभेत बहुमत प्रकरणात उडालेल्या गोंधळानंतर पहिल्यांदाच मुंडे यांनी शासकीय कार्यक्रमाला हजेरी लावली. आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध करणे ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही असे मतदान झाले आहे. जे विरोधक होते, त्यांनी प्रक्रियेनंतर गदारोळ केला. भाजपाने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन प्रगल्भता दाखविली आहे. राष्ट्रवादीतील अनेक नेते खा. मुंडे यांच्या विरोधात होते. मग आता आपण राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेल्या सरकारमध्ये आहात, यावर ग्रामविकासमंत्री मुंडे म्हणाल्या की, माझ्यावर बाबांचे संस्कार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे खा. मुंडे यांच्याप्रमाणेच राज्य सांभाळतील. विकासात आड येणाऱ्यांना भाजपा सोडणार नाही. खा. मुंडे यांनी पूर्ण आयुष्य राष्ट्रवादीचा विरोध पत्कारला, यावर ग्रामविकासमंत्री मुंडे म्हणाल्या की, मी राष्ट्रवादीसोबत आहे, असे मुळीच म्हणणार नाही. भाजपाने राष्ट्रवादीला पाठिंबा मागितला नव्हता. मुंडे यांची व्यक्तीसापेक्षऐवजी वृत्तीसापेक्ष अशी लढाई होती. संघर्ष यात्रेत राष्ट्रवादी विरोधी प्रचार आपण केलात, मग आता तर पाठिंबा त्यांचाच आहे. यावर त्या म्हणाल्या की, संषर्घ यात्रेत खा. मुंडे आणि राष्ट्रवादी विरोध असा प्रचार केला नाही. भाजपाने जनतेला धोका दिलेला नाही. स्थिर सरकार भाजपाने दिले आहे. राष्ट्रवादीऐवजी सेनेचा पाठिंबा घेता आला असता असे पत्रकारांनी विचारल्यावर त्या म्हणाल्या त्यांनाही तो देता आला असता.तटकरे, पवार यांच्या चौकशीचे काय?खा. मुंडे म्हणाले होते, राज्यात सत्ता आल्यानंतर सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांची चौकशी करून त्यांना तुरुंगात टाकील. राष्ट्रवादीने तर भाजपाला पाठिंबाच दिला आहे, तटकरे, पवारांच्या चौकशीचे काय होणार, यावर त्या म्हणाल्या, चौकशी केली जाईल. जे दोषी असतील ते तुरुंगात जातील.