शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

शरद पवारांऐवजी वृत्तीला होता विरोध

By admin | Updated: November 14, 2014 00:57 IST

औरंगाबाद : भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केल्यामुळे राज्यात खा. गोपीनाथ मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे.

औरंगाबाद : भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केल्यामुळे राज्यात खा. गोपीनाथ मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. मात्र, ग्रामविकासमंत्री पकंजा मुंडे यांनी राष्ट्रवादीला विरोध करणे आणि सोशल मीडियातील प्रकरणी यू- टर्न घेतला. खा. मुंडे यांचा विरोध राष्ट्रवादीतील व्यक्तीसापेक्ष नव्हता. तो वृत्तीसापेक्ष होता, असे घूमजाव करणारे उत्तरही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. ग्रामीण महिला बचत गटाच्या सिद्धा प्रदर्शनाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. १२ नोव्हेंबरच्या विधानसभेत बहुमत प्रकरणात उडालेल्या गोंधळानंतर पहिल्यांदाच मुंडे यांनी शासकीय कार्यक्रमाला हजेरी लावली. आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध करणे ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही असे मतदान झाले आहे. जे विरोधक होते, त्यांनी प्रक्रियेनंतर गदारोळ केला. भाजपाने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन प्रगल्भता दाखविली आहे. राष्ट्रवादीतील अनेक नेते खा. मुंडे यांच्या विरोधात होते. मग आता आपण राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेल्या सरकारमध्ये आहात, यावर ग्रामविकासमंत्री मुंडे म्हणाल्या की, माझ्यावर बाबांचे संस्कार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे खा. मुंडे यांच्याप्रमाणेच राज्य सांभाळतील. विकासात आड येणाऱ्यांना भाजपा सोडणार नाही. खा. मुंडे यांनी पूर्ण आयुष्य राष्ट्रवादीचा विरोध पत्कारला, यावर ग्रामविकासमंत्री मुंडे म्हणाल्या की, मी राष्ट्रवादीसोबत आहे, असे मुळीच म्हणणार नाही. भाजपाने राष्ट्रवादीला पाठिंबा मागितला नव्हता. मुंडे यांची व्यक्तीसापेक्षऐवजी वृत्तीसापेक्ष अशी लढाई होती. संघर्ष यात्रेत राष्ट्रवादी विरोधी प्रचार आपण केलात, मग आता तर पाठिंबा त्यांचाच आहे. यावर त्या म्हणाल्या की, संषर्घ यात्रेत खा. मुंडे आणि राष्ट्रवादी विरोध असा प्रचार केला नाही. भाजपाने जनतेला धोका दिलेला नाही. स्थिर सरकार भाजपाने दिले आहे. राष्ट्रवादीऐवजी सेनेचा पाठिंबा घेता आला असता असे पत्रकारांनी विचारल्यावर त्या म्हणाल्या त्यांनाही तो देता आला असता.तटकरे, पवार यांच्या चौकशीचे काय?खा. मुंडे म्हणाले होते, राज्यात सत्ता आल्यानंतर सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांची चौकशी करून त्यांना तुरुंगात टाकील. राष्ट्रवादीने तर भाजपाला पाठिंबाच दिला आहे, तटकरे, पवारांच्या चौकशीचे काय होणार, यावर त्या म्हणाल्या, चौकशी केली जाईल. जे दोषी असतील ते तुरुंगात जातील.