शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

जायकवाडी जलाशयावरील सौरउर्जा प्रकल्पास विरोध; कहार समाजाचा पैठण येथे विराट मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 17:55 IST

सौरउर्जा प्रकल्प रद्द करा अशा घोषणा देत निघालेल्या या मोर्चाने लक्ष वेधून घेतले. 

पैठण: जायकवाडी जलाशयावरील नियोजित सौरउर्जा प्रकल्पास विरोध करण्यासाठी सोमवारी पैठण येथे कहार समाज बांधवांच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून आलेला कहार समाज पैठण येथे एकवटल्याने कहार समाजाचा आतापर्यंत निघालेल्या मोर्च्यापैकी पैठण येथे सोमवारी काढण्यात आलेला  सर्वात मोठा मोर्चा असल्याचे कहार समाज बांधवांनी सांगितले. दरम्यान या मोर्चात अंगावर खेकडे गळ्यात मासे व हातात मासे पकडण्याचे जाळे घेऊन अनेक कहार बांधव सहभागी झाले होते.

सौरउर्जा प्रकल्प रद्द करा अशा घोषणा देत निघालेल्या या मोर्चाने लक्ष वेधून घेतले.  ईको सेन्सिटीव्ह झोन व पक्षी अभयारण्याच्या बंधनात अडकलेल्या जायकवाडी धरणावरील मच्छीमारा समोर प्रस्तावित सौरउर्जा प्रकल्पाचे नवीन संकट येऊ घातले आहे. यामुळे  मासेमारी करणाऱ्या कहार समाजात अस्वस्थता पसरली आहे. नियोजित प्रकल्पास विरोध करण्यासाठी सोमवारी कहार समाजाच्या वतीने पैठण तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, बीड आदी जिल्ह्यातील कहार समाज बांधव पैठण येथे एकवटले होते. आप आपले व्यवसाय बंद ठेवून एक दिवस समाजासाठी देत मुले बाळे व कुटुंबासह समाजातील नागरिकांनी मोर्चात हजेरी लावल्याने सौरउर्जा प्रकल्पा बद्दल कहार समाजाचा मनात असणारी भिती व रोष  मोर्चातून व्यक्त झाला.

रविवारी रात्री पासून कहार समाजातील नागरिक मोठ्या संख्येने पैठण शहरात दाखल होण्यास प्रारंभ झाला होता. सोमवारी दुपारी येथील कै दिगंबरराव कावसानकर स्टेडियम पासून मोर्चाच प्रारंभ करण्यात आला. मोर्चाच्या अग्रभागी महिला भगिनी होत्या. मोर्चा विराट असल्याने सुमारे दोन तास मोर्चा मार्गातील वाहतूक ठप्प झाली होती. बसस्थानक, मार्गे मोर्चा तहसिल कार्यालयात नेण्यात आला तेथे नायब तहसीलदार मंगेश साबळे यांना महिला प्रतिनिधींनी समाजाच्या मागण्याचे निवेदन दिले.

या निवेदनात असे म्हटले आहे की, प्रकल्पातील हजारो हेक्टर पानपसाऱ्यावर अहमदनगर व संभाजीनगर जिल्ह्यातील कहार भिल्ल व भोई समाजासह इतर समाज पारंपारिक पद्धतीने मासेमारी करून उदरनिर्वाह चालवतात. या व्यवसायावर पंचवीस हजार कुटुंबे  व त्यावर अवलंबून असलेल्या एक ते दीड लाख लोकांची उपजीविका चालते. जलाशयावर केंद्र व राज्य शासनाने तरंगता सौर प्रकल्प प्रस्तावित केला आहे. त्यामुळे जलाशयातील पाण्यातील मासेमारी संपुष्टात येऊन मच्छीमारावर कायमस्वरूपी उपासमारीची वेळ येणार आहे. यामुळे सौर पॅनल ऊर्जा प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे. 

पैठण शहरात मोठ्या संख्येने कहार समाज आहे. जायकवाडी धरणाच्या जलाशयावर मासेमारी करने हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. दरम्यान पक्षी अभयारण्य घोषित झाल्यानंतर वन खात्याने बंधने टाकून अनेक वेळा मच्छीमारावर कारवाई केल्याने मासेमारीचा व्यवसायास घरघर लागली आहे. त्यातच सौर उर्जा प्रकल्पाचे संकट येऊ घातल्याने समाजात मोठी अस्वस्थता पसरली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण