शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

जायकवाडी जलाशयावरील सौरउर्जा प्रकल्पास विरोध; कहार समाजाचा पैठण येथे विराट मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 17:55 IST

सौरउर्जा प्रकल्प रद्द करा अशा घोषणा देत निघालेल्या या मोर्चाने लक्ष वेधून घेतले. 

पैठण: जायकवाडी जलाशयावरील नियोजित सौरउर्जा प्रकल्पास विरोध करण्यासाठी सोमवारी पैठण येथे कहार समाज बांधवांच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून आलेला कहार समाज पैठण येथे एकवटल्याने कहार समाजाचा आतापर्यंत निघालेल्या मोर्च्यापैकी पैठण येथे सोमवारी काढण्यात आलेला  सर्वात मोठा मोर्चा असल्याचे कहार समाज बांधवांनी सांगितले. दरम्यान या मोर्चात अंगावर खेकडे गळ्यात मासे व हातात मासे पकडण्याचे जाळे घेऊन अनेक कहार बांधव सहभागी झाले होते.

सौरउर्जा प्रकल्प रद्द करा अशा घोषणा देत निघालेल्या या मोर्चाने लक्ष वेधून घेतले.  ईको सेन्सिटीव्ह झोन व पक्षी अभयारण्याच्या बंधनात अडकलेल्या जायकवाडी धरणावरील मच्छीमारा समोर प्रस्तावित सौरउर्जा प्रकल्पाचे नवीन संकट येऊ घातले आहे. यामुळे  मासेमारी करणाऱ्या कहार समाजात अस्वस्थता पसरली आहे. नियोजित प्रकल्पास विरोध करण्यासाठी सोमवारी कहार समाजाच्या वतीने पैठण तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, बीड आदी जिल्ह्यातील कहार समाज बांधव पैठण येथे एकवटले होते. आप आपले व्यवसाय बंद ठेवून एक दिवस समाजासाठी देत मुले बाळे व कुटुंबासह समाजातील नागरिकांनी मोर्चात हजेरी लावल्याने सौरउर्जा प्रकल्पा बद्दल कहार समाजाचा मनात असणारी भिती व रोष  मोर्चातून व्यक्त झाला.

रविवारी रात्री पासून कहार समाजातील नागरिक मोठ्या संख्येने पैठण शहरात दाखल होण्यास प्रारंभ झाला होता. सोमवारी दुपारी येथील कै दिगंबरराव कावसानकर स्टेडियम पासून मोर्चाच प्रारंभ करण्यात आला. मोर्चाच्या अग्रभागी महिला भगिनी होत्या. मोर्चा विराट असल्याने सुमारे दोन तास मोर्चा मार्गातील वाहतूक ठप्प झाली होती. बसस्थानक, मार्गे मोर्चा तहसिल कार्यालयात नेण्यात आला तेथे नायब तहसीलदार मंगेश साबळे यांना महिला प्रतिनिधींनी समाजाच्या मागण्याचे निवेदन दिले.

या निवेदनात असे म्हटले आहे की, प्रकल्पातील हजारो हेक्टर पानपसाऱ्यावर अहमदनगर व संभाजीनगर जिल्ह्यातील कहार भिल्ल व भोई समाजासह इतर समाज पारंपारिक पद्धतीने मासेमारी करून उदरनिर्वाह चालवतात. या व्यवसायावर पंचवीस हजार कुटुंबे  व त्यावर अवलंबून असलेल्या एक ते दीड लाख लोकांची उपजीविका चालते. जलाशयावर केंद्र व राज्य शासनाने तरंगता सौर प्रकल्प प्रस्तावित केला आहे. त्यामुळे जलाशयातील पाण्यातील मासेमारी संपुष्टात येऊन मच्छीमारावर कायमस्वरूपी उपासमारीची वेळ येणार आहे. यामुळे सौर पॅनल ऊर्जा प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे. 

पैठण शहरात मोठ्या संख्येने कहार समाज आहे. जायकवाडी धरणाच्या जलाशयावर मासेमारी करने हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. दरम्यान पक्षी अभयारण्य घोषित झाल्यानंतर वन खात्याने बंधने टाकून अनेक वेळा मच्छीमारावर कारवाई केल्याने मासेमारीचा व्यवसायास घरघर लागली आहे. त्यातच सौर उर्जा प्रकल्पाचे संकट येऊ घातल्याने समाजात मोठी अस्वस्थता पसरली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण