शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

उद्घाटन वादावरील पडदा उठेना; २३ डिसेंबरचा कार्यक्रमही अनिश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 22:47 IST

१०० कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन, शहर बससेवा, एसटीपीच्या लोकार्पणास शिवसेनेने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना निमंत्रित केल्यामुळे महापालिकेच्या राजकारणात सेना-भाजपमध्ये सुरू असलेल्या वादावरील पडदा अजून काही उठेना.

ठळक मुद्दे रस्त्यांचा नारळ मुख्यमंत्री फोडणार : ठाकरेंच्या हस्ते एसटीपी, बसच्या औपचारिक लोकार्पणाची शक्यता

औरंगाबाद : १०० कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन, शहर बससेवा, एसटीपीच्या लोकार्पणास शिवसेनेने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना निमंत्रित केल्यामुळे महापालिकेच्या राजकारणात सेना-भाजपमध्ये सुरू असलेल्या वादावरील पडदा अजून काही उठेना. शिवसेनेने दोन पावले मागे घेऊन १०० कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि एसटीपी, बससेवेचे लोकार्पण २३ डिसेंबर रोजी ठाकरे यांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेतला असला तरी तो कार्यक्रमही अद्याप अनिश्चित आहे.महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडून शिवसेना आणि भाजप नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते म्हणाले, रस्त्यांच्या भूमिपूजनात तांत्रिक अडचण आली आहे. कंत्राटदारांच्या वादामुळे रस्त्यांचे भूमिपूजन लांबण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांची वेळ आधीच घेतलेली असल्याने रविवारी २३ तारखेला शहर बससेवा व कांचनवाडीतील एसटीपीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते केले जाईल.बुधवारी महापालिकेच्या शिष्टमंडळाची भेट मुख्यमंत्र्यांनी टाळल्याने गुरुवारी दिवसभर सेना विरुद्ध भाजप, असे दोन गट पालिकेत होते. १०० कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन करण्यासाठी जानेवारीत मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तो कार्यक्रम घ्यावा लागेल, अन्यथा मोठ्या आर्थिक विवंचनेला मनपाला सामोरे जावे लागेल, असा गर्भित इशारा भाजपने सेनेला दिला आहे.खा.चंद्रकांत खैरे यांनीच २३ डिसेंबर रोजी तिन्ही कार्यक्रमांचे भूमिपूजन होणार असल्याचे जाहीर करून ठाकरे येणार असल्याचे सांगितले होते. त्याच वेळी मुख्यमंत्र्यांची वेळ घेणे गरजेचे होते. मात्र, शिवसेनेने त्याला महत्त्व दिले नाही. परिणामी भाजप आणि शिवसेनेत राजकीय वाद पेटला. भाजपची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी सेना-भाजपचे शिष्टमंडळ बुधवारी मुंबईला गेले; परंतु ते शिष्टमंडळ मुख्यंमत्र्यांना भेटू शकले नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रस्त्यांचे भूमिपूजन करण्यासाठी येता येईल, असा निरोप मुख्यमंत्र्यांनी महापौरांपर्यंत भाजप नेत्यांपर्यंत पोहोचविला.प्रशासनावर भाजपचा दबाव?जीएसटीचा तिढा सुटेपर्यंत काम सुरू न करण्याची कंत्राटदारांची भूमिका आहे. जीएसटीचे नाव पुढे करून प्रशासनावर भाजप वरिष्ठ पातळीवरून दबाव आणत असल्याची चर्चा आहे. १०० कोटींच्या रस्त्यांत जीएसटीची टक्केवारी अचानक वाढलेली नाही. जीएसटी नियमाप्रमाणेच आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक तरी मोठे भूमिपूजन शहरात व्हावे, अशी भूमिका भाजपची असल्यामुळे कंत्राटदार, जीएसटीचा वाद जन्माला घालण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान महापौर म्हणाले, अद्याप जीएसटीचा वाद मिटला नसल्याचे कळले आहे. त्यामुळे १०० कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या वेळेनुसार होईल.बस येण्यात पासिंगची अडचण२३ तारखेलाच पाच बस मनपात येण्यात पासिंगची अडचण आहे. त्यामुळे बस येण्याची शक्यता कमी आहे. महापौरांनी अतिरिक्त आयुक्त संतोष कवडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत शहरात बस येतील, असे दबावात बोलल्याप्रमाणे सांगितले. जर बस त्या दिवशी उशिराने आल्या तर मोठे संकट उभे राहील. त्यामुळे २२ डिसेंबरपर्यंत बस आल्याच पाहिजेत, असे महापौरांनी कंपनीच्या प्रतिनिधींना फोनवरून सांगितले.प्रदेशाध्यक्षांचे मौनभाजप प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांना १०० कोटींच्या रस्ते कामाचे भूमिपूजन तरी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जावे. याबाबत तुमचे मत काय, यावर खा.दानवे यांनी काहीही प्रतिक्रिया न देता रामनगर येथून काढता पाय घेतला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा