शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

केवळ वर्णनावरून पोलिसांनी काढला माग, सुपरवायझरला लुटणारे चौघे गजाआड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 18:36 IST

कामगारांचे वेतन करण्यासाठी जाणा-या एका कंपनीच्या सुपरवायझरवर चाकूहल्ला करून २ लाख ९५ हजार रुपये लुटणा-या चौघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

ठळक मुद्देआरोपींकडून १ लाख ७५ हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली. या कामगिरीबद्दल आयुक्तांनी पोलिसांच्या पथकाला ३० हजार रुपये बक्षीस दिले.

औरंगाबाद: कामगारांचे वेतन करण्यासाठी जाणा-या एका कंपनीच्या सुपरवायझरवर चाकूहल्ला करून २ लाख ९५ हजार रुपये लुटणा-या चौघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या आरोपींकडून १ लाख ७५ हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली. या कामगिरीबद्दल आयुक्तांनी पोलिसांच्या पथकाला ३० हजार रुपये बक्षीस दिले.

लुटमारीचा कट रचणारा मुख्य आरोपी विष्णू सानप, सतीश पांडुरंग चव्हाण (१९,रा.जयभवानीनगर, वडगाव कोल्हाटी), महेश भाऊसाहेब वेताळ (रा.बालाजीनगर, रांजणगाव शे.पूं.) आणि एका विधीसंघर्षग्रस्त मुलाचा (अल्पवयीन) आरोपीमध्ये समावेश आहे. यातील विष्णू सानप याला डॉ. अनुपम टाकळकर यांना पिस्तूलचा धाक दाखवून २५ लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी पकडले होते. या गुन्ह्यात जामीन झाल्यानंतर तो जेलमधून बाहेर आला होता.

याविषयी अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे म्हणाले की, वाळूज एमआयडीसीमधील अजिंक्य इंटरप्रायजेस या कंपनीच्या लेबर काँट्रक्टरकडे सुपवायझर असलेले दीपक रत्नाकर तौर हे १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कंपनीतील कामगारांचे वेतन करण्यासाठी रोख २ लाख ९५ हजार रुपये घेऊन दुचाकीने जात होते. यावेळी मराठवाडा अ‍ॅटो कंपनीमागील मोकळया जागेवर दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी तौर यांना अडविले आणि अचानक त्यांच्यावर चाकूहल्ला करून त्यांनी त्यांच्या गळ्यातील पैशाची बॅग हिसकावून नेली होती. 

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त ज्ञानोबा मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोहेकाँ वसंत शेळके, कारभारी देवरे, प्रकाश गायकवाड, मनमोहनमुरली कोलमी, बंडू गोरे, सुधीर सोनवणे यांनी तपास सुरू केला. 

वर्णनावरून संशयिताचे घर गाठणे अन..आरोपींच्या वर्णनावरून एका संशयिताचे पोलिसांनी घर गाठले तेव्हा संशयित घरी नव्हता. यावेळी त्याच्या आईने त्याला फोनवरून घरी पोलीस आल्याचे सांगताच त्याने मोबाईल बंद केला. यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. यानंतर त्याच्यासोबत कोण असते त्यांचा शोध घेतला असता अन्य तिन जणही घरातून गायब असल्याचे समोर आले. हिंगोली, वाशिम, परभणी आदी ठिकाणी संशयितांचा शोध घेतला. दरम्यान ते आज रांजणगाव येथे येणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचून पोलिसांनी तीन जणांना पकडले. त्यांच्याकडून रोख पावणे दोन लाखासह दुचाकी जप्त केली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादvalujवाळूज