शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

शहरातील कचरा संकलनासाठी केवळ तारीख पे तारीख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 16:03 IST

५ जानेवारीपासून काम सुरू करण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते. 

औैरंगाबाद : शहरातील सर्व मालमत्ताधारकांकडून कचरा जमा करण्याचे काम बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला देण्यात आले आहे. मागील चार महिन्यांपासून कंपनी काम सुरू करण्याच्या मुद्यावर महापालिकेला हुलकावणी देत आहे. १ डिसेंबर, ५ जानेवारीनंतर आता १५ जानेवारीचा मुहूर्त काढण्यात आला आहे. 

शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यासाठी महापालिका कंपनीला दरवर्षी किमान ३० ते ३२ कोटी रुपये देणार आहे. सध्या कचरा उचलण्याचा खर्च वार्षिक ६८ कोटींपर्यंत पोहोचला आहे. बंगळुरू येथील कंपनीने एक टन कचरा उचलला तर महापालिका १८६३ रुपये देणार आहे. शहरात साधारणपणे ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कामासाठी कंपनीने इन्दूर पॅटर्नप्रमाणे अत्याधुनिक रिक्षा आणाव्यात, कॉम्पॅक्टर, हायड्रोलिक वाहने आणावीत, असे सांगितले आहे. ही सर्व वाहने नवीन असावीत, कंपनीच्या नावावर असावीत, अशीही अट आहे. कंपनीला वर्कआॅर्डर देऊन चार महिने उलटले तरी अद्याप सर्व वाहने आलेली नाहीत. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी १ डिसेंबर २०१८ पासून कंपनीने किमान ३ झोनमध्ये काम सुरू करावे, अशी आॅर्डर काढली होती. आजपर्यंत कंपनीने कामच सुरू केले नाही. ५ जानेवारीपासून काम सुरू करण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते. 

आता १५ जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. शहरात एकाच वेळी काम सुरू करण्याचा मानस कंपनीचा आहे. शहराची भौगोलिक परिस्थिती कंपनीला माहीत नाही. एकाचवेळी काम सुरू करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री, कामगार कंपनीकडे उपलब्ध नाहीत. कंपनीने आतापर्यंत १० पैकी ५ कॉम्पॅक्टर आणले आहेत. ३०० रिक्षांपैकी १८ आणल्या आहेत. मनुष्यबळ फक्त ५० ते ६० उपलब्ध आहे. कंपनीच्या या नियोजनाचा फटका दरमहा महापालिकेला बसत आहे. महापालिकेचा खर्च कमी करण्यासाठी कंपनीला काम देण्यात आले आहे. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाHealthआरोग्य