शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

शहरातील १७ लाख नागरिकांसाठी हिवताप कर्मचारी १६५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 17:14 IST

मागील अनेक वर्षांपासून रिक्त पदे भरण्यातच आलेली नाहीत.

औरंगाबाद : डेंग्यूने शहरात सात जणांचा बळी घेतला. डेंग्यूचा थैमान नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेची यंत्रणा तोकडी पडत आहे. शहरातील तब्बल १७ लाख नागरिकांसाठी हिवताप विभागात केवळ १६५ कर्मचारी कार्यरत आहेत. मागील अनेक वर्षांपासून रिक्त पदे भरण्यातच आलेली नाहीत. विविध साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी हिवताप विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात साथरोगांनी डोके वर काढले. आता डेंग्यूने थैमान घातले आहे. महिनाभरात तब्बल सात जणांचा डेंग्यूने मृत्यू झाला. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत धूरफवारणी, औषधफवारणी, अ‍ॅबेट वाटप, नागरिकांमध्ये जनजागृती, आरोग्य तपासणी, कोरडा दिवस पाळणे आदी कामे करण्यात येतात. महापालिकेने अतिजोखमीच्या भागात विशेष मोहिमा सुरू केल्या आहेत. डेंग्यूवर पाहिजे तसे नियंत्रण अद्याप मिळालेले नाही. खाजगी रुग्णालये आजही हाऊसफुल आहेत. शहराची लोकसंख्या विचारात घेता मनपाच्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. महापालिकेच्या हिवताप विभागात केवळ १६५ कर्मचारी कार्यरत आहेत. १७ लाख लोकसंख्येसाठी ही कर्मचारी संख्या अपुरी आहे. 

तीन दशकांत ९७ पदे वाढली१९७८ मध्ये शासनाने शंभर टक्के अनुदानावर नागरी हिवताप योजना लागू केली. त्यात ६८ पदे मंजूर करण्यात आली. सध्या या विभागात १६५ कर्मचारी कार्यरत आहेत. मागील ३१ वर्षांत केवळ ९७ पदे वाढली आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य सांभाळताना आरोग्य विभागाला कसरत करावी लागत आहे. 

आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त महापालिकेच्या आरोग्य विभागात सध्या जीवशास्त्रज्ञ, मलेरिया सुपरवायझर, कीटक संमाहरक या पदांवर एकही अधिकारी कार्यरत नाही. त्यामुळे या पदांसाठी पाठपुरावा सुरू आहे. 

नवीन आकृतिबंधात पदांची अपेक्षाजीवशास्त्रज्ञ ०१ आरोग्य सहायक १०कीटक संमाहरक ०४श्रेत्र कर्मचारी २०४वाहनचालक ०४मलेरिया पर्यवेक्षक ०३वरिष्ठ क्षेत्र कर्मचारी ६८

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdengueडेंग्यूHealthआरोग्यAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका