शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

एक कर्मचारी छत्रपती संभाजीनगरातील ४५० चौकांमधील वाहतूक कोंडी सोडवू शकतो; पण...

By मुजीब देवणीकर | Updated: December 18, 2023 19:01 IST

स्मार्ट सिटीने लावलेल्या सीसीटीव्ही पोलवरच स्पीकर्स बसविण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटी प्रशासनाने जवळपास १७५ कोटी रुपये खर्च करून शहरात ७५० सीसीटीव्ही, ४५० चौकांमध्ये अत्याधुनिक स्पीकर्स बसविले. मात्र, मागील वर्षभरापासून स्पीकर्सचा अजिबात वापर होत नाही. पोलिस आयुक्तालय, स्मार्ट सिटीच्या कमांड सेंटरमध्ये बसून केवळ एक कर्मचारी सारी वाहतूक कोंडी सोडवू शकतो.

शहरातील प्रमुख चौकांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. चारचाकी वाहनधारक, दुचाकीस्वार, रिक्षा चालक रस्त्याच्या कडेला बिनधास्तपणे वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. वाहनधारकांना अनावश्यक वाहतूक कोंडीत वेळ घालवावा लागतो. वाहतूक सुरळीत राहावी, शहरातील कायदा सुव्यवस्थेला मदत व्हावी या हेतूने सेफ सिटीअंतर्गत सीसीटीव्ही प्रकल्प चार वर्षांपूर्वी हाती घेण्यात आला. हा प्रकल्प पूर्णही झाला. विविध गुन्ह्यांमध्ये सीसीटीव्ही मोलाची भूमिका बजावत आहेत. मुख्य रस्त्यांवर मंगळसूत्र चोरीच्या घटनाही यामुळेच कमी झाल्या आहेत. स्मार्ट सिटीने शहरात जेथे सीसीटीव्ही बसविले, त्यातील महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ४०० रस्त्यांची निवड करण्यात आली. या ठिकाणी मोठे ४५० स्पीकर्स बसविण्यात आले आहेत. शहरात आणीबाणीची परिस्थिती असेल तर नागरिकांना सूचना देण्यासाठी महागडे स्पीकर्स बसविण्यात आले आहेत.

दोन कमांड सेंटरसीसीटीव्ही, स्पीकर्स नियंत्रणाचे अधिकार पोलिस आयुक्तालय आणि स्मार्ट सिटीतील कमांड सेंटरला देण्यात आले आहेत. कमांड सेंटरमधून एक कर्मचारी सीसीटीव्ही पाहून रस्त्यात उभी असलेली रिक्षा पटकन काढा, अशी सूचना केल्यानंतर वाहनधारक पटकन वाहन काढून घेतात. अत्यंत प्रभावी असलेली ही यंत्रणा वापरली जात नाही.

पोलिस वापर करतातपोलिस आयुक्तालयातील कमांड सेंटरमधून सीसीटीव्ही बघून स्पीकर्सवर वारंवार सूचना दिली जाते. एखाद्याने वाहन बाजूला न केल्यास त्याच्या वाहनांच्या नंबरची नोंद केली जाते. जिथे सूचना दिली, त्याची नोंदही एका रजिस्टरमध्ये केली जात आहे.- फैज अली, प्रोजेक्ट मॅनेजर आयटी, स्मार्ट सिटी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTrafficवाहतूक कोंडी