शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘चेक बाऊन्स’ झाल्यास दीड हजार दंड; महावितरणचा ग्राहकांना झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 20:06 IST

वीजग्राहकांना यापूर्वी ३५० रुपये दंड आकारला जात होता. 

औरंगाबाद : वीज दरवाढीनंतर आता वीजबिलाचा भरणा केलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे अनादर (चेक बाऊन्स) झाल्यास ३५० रुपयांऐवजी दीड हजार रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड लावण्यात येणार आहे. महावितरणने ग्राहकांंना दिलेला दुसरा झटका आहे. 

वीजदराच्या निश्चितीकरणासाठी दाखल केलेल्या मध्यावधी आढावा याचिकेच्या सुधारित आदेशामध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नुकताच हा आदेश दिला असून १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणीही सुरू केली आहे. औरंगाबाद परिमंडळातील औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांत जवळपास ९ हजार लघुदाब वीजग्राहक हे दरमहा धनादेशाद्वारे वीज बिल भरणा करतात; परंतु यातील सुमारे साडेतीनशे धनादेश दरमहा विविध कारणांमुळे बाऊन्स होत आहेत. त्यासाठी वीजग्राहकांना यापूर्वी ३५० रुपये दंड आकारला जात होता. 

वीजबिल भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी ग्राहकांनी दिलेला धनादेश वटणे आवश्यक आहे. त्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद महामंडळाच्या दप्तरी होते; परंतु अनेक वीजग्राहक हे अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीज बिलाची रक्कम भरतात. धनादेश वटण्यास तीन ते चार दिवस लागू शकतात. त्यामुळे मुदतीनंतर वीज बिलाचा भरणा झाल्यास  ग्राहकांना धनादेशाद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात येते .

ग्राहकांचा कल वाढतोय आॅनलाईन पेमेंटकडेअलीकडच्या काळात आॅनलाईन वीज बिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळांतर्गत सध्या जवळपास दीड लाख वीजग्राहक हे धनादेशाऐवजी दरमहा सुमारे ३० कोटी रुपयांचा वीज बिलाचा भरणा इंटरनेट तसेच मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून करीत आहेत. 

टॅग्स :electricityवीजbillबिलMONEYपैसा