शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

‘चेक बाऊन्स’ झाल्यास दीड हजार दंड; महावितरणचा ग्राहकांना झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 20:06 IST

वीजग्राहकांना यापूर्वी ३५० रुपये दंड आकारला जात होता. 

औरंगाबाद : वीज दरवाढीनंतर आता वीजबिलाचा भरणा केलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे अनादर (चेक बाऊन्स) झाल्यास ३५० रुपयांऐवजी दीड हजार रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड लावण्यात येणार आहे. महावितरणने ग्राहकांंना दिलेला दुसरा झटका आहे. 

वीजदराच्या निश्चितीकरणासाठी दाखल केलेल्या मध्यावधी आढावा याचिकेच्या सुधारित आदेशामध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नुकताच हा आदेश दिला असून १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणीही सुरू केली आहे. औरंगाबाद परिमंडळातील औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांत जवळपास ९ हजार लघुदाब वीजग्राहक हे दरमहा धनादेशाद्वारे वीज बिल भरणा करतात; परंतु यातील सुमारे साडेतीनशे धनादेश दरमहा विविध कारणांमुळे बाऊन्स होत आहेत. त्यासाठी वीजग्राहकांना यापूर्वी ३५० रुपये दंड आकारला जात होता. 

वीजबिल भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी ग्राहकांनी दिलेला धनादेश वटणे आवश्यक आहे. त्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद महामंडळाच्या दप्तरी होते; परंतु अनेक वीजग्राहक हे अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीज बिलाची रक्कम भरतात. धनादेश वटण्यास तीन ते चार दिवस लागू शकतात. त्यामुळे मुदतीनंतर वीज बिलाचा भरणा झाल्यास  ग्राहकांना धनादेशाद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात येते .

ग्राहकांचा कल वाढतोय आॅनलाईन पेमेंटकडेअलीकडच्या काळात आॅनलाईन वीज बिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळांतर्गत सध्या जवळपास दीड लाख वीजग्राहक हे धनादेशाऐवजी दरमहा सुमारे ३० कोटी रुपयांचा वीज बिलाचा भरणा इंटरनेट तसेच मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून करीत आहेत. 

टॅग्स :electricityवीजbillबिलMONEYपैसा