शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

एकच उपाय, पदाधिकाऱ्यांनो राजीनामे द्या !

By सुमेध उघडे | Updated: January 31, 2019 12:12 IST

धुमसता कचरा : कचऱ्याचा प्रश्न कधी सुटणार या प्रश्नाने चिंताग्रस्त असलेल्या औरंगाबादकरांच्या मनात काय आहे, यासंदर्भात ‘लोकमत’ ने शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण करून कचराकोंडीसंदर्भात त्यांची मते जाणून घेतली. 

- सुमेध उघडे 

कचराकोंडीने त्रस्त झालेल्या औरंगाबादकरांना आणि न्यायालयाला महापालिकेने अनेक आश्वासने दिली. कचऱ्याचा प्रश्न निर्माण होऊन आता वर्ष होत आले. मात्र, कोंडी फुटलेली नाही. उलट कचरा अधिकच धुमसतोय. कचऱ्याचा प्रश्न कधी सुटणार या प्रश्नाने चिंताग्रस्त असलेल्या औरंगाबादकरांच्या मनात काय आहे, यासंदर्भात ‘लोकमत’ ने शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण करून कचराकोंडीसंदर्भात त्यांची मते जाणून घेतली.

‘लोकमत’ने ऑनलाईन घेतलेल्या या सर्व्हेला नागरिकांना जोरदार प्रतिसाद दिला. या सर्वेक्षणात नागरिकांना केवळ तीनच प्रश्न विचारण्यात आले होते. १९ वर्षांच्या तरुणांबरोबरच ७० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांनी आपली मते सर्वेक्षणात नोंदविली आहेत. ही मते नोंदविताना पदाधिकाऱ्यांनी राजिनामे द्यावेत, अशी भूमिका नागरिकांनी घेतली; त्याचबरोबर महापालिकेच्या कारभारावर आसूडही ओढले. अनेक नागरिकांनी कचरा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेला चांगल्या सूचनाही केल्या...

कचरा प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांनी महापालिकेला केलेल्या सूचना :- वेळ, पैसा वाया न घालता निस्वार्थीपणे काम करावे.- पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी इच्छाशक्ती दाखवावी.  - ओमप्रकाश बकोरिया किंवा सुनील केंद्रेकर आयुक्त हवेत.- राजकारणापलीकडे जाऊन शहराचा विकास कसा होईल यावर लक्ष द्यावे- महापालिका बरखास्त करा.- तात्काळ निर्णय घ्या, नागरिकांच्या आरोग्याचा खेळ मांडू नका.- मनपाने कितीही कचरा उचलला, तरीही नागरीक सुधारणार नाहीत.- कचऱ्यात पैसे खाऊ नका.- एवढे बेसिक प्रश्न सोडविता येत नसतील तर राजीनामे देऊन सत्ता सोडावी.- नवीन कल्पक विद्यार्थी आणि नागरिकांना कचरा व्यवस्थापन करण्यासाठी आमंत्रित करायला हवे. कचरा प्रश्नांची जनजागृतीसुद्धा आवश्यक आहे.- स्वत:च्या कचऱ्याची स्वत: विल्हेवाट लावायला पाहिजे.- आपली महापालिका सूचना देण्यापलीकडे आहे...सत्ताबद्दल झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही.- केवळ महापालिकेच्या इमारतीत बसून चर्चा करून कचराकोंडी सुटणार नाही.- पालिकेने कचरा प्रश्न सोडविण्यासाठी आलेल्या सर्व फंड प्रामाणिकपणे वापरावा. पारदर्शीपणे आपले काम करावे. जनतेचीसुद्धा आवश्यक ठिकाणी मदत घ्यावी.- एक वर्षापासून फक्त कचरा प्रश्न सुटत नसेल तर जनतेचे बाकीचे प्रश्न काय सोडवणार ? तुम्ही जनतेसमोर स्पष्ट सांगा आमच्याकडून हा प्रश्न सुटणार नाही, मग काय करायचे ते जनताच ठरवेल.- कचरा विघटन मशीन आणल्या पाहिजेत, ही काळाची गरज आहे, कचरा समस्या फार गंभीर होत चालली आहे. लवकरात लवकर कचरा व्यवस्थापन करावे.- जमत नसेल तर दुसऱ्यांना संधी द्या.- आपल्या कुटुंबाचे काम असल्यासारखे करा. जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करा. सर्वच कामात 'कट प्रॅक्टिस' गरजेची नाही. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद