शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
2
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
3
टाटा कंपनीचा 'हा' स्टॉक झुनझुनवाला कुटुंबासाठी ठरला मल्टीबॅगर; एका दिवसात ४०० कोटींचा नफा
4
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
5
Rahul Gandhi : राहुल गांधी पोहोचले हरिओम वाल्मिकी यांच्या घरी, कुटुंबाने भेटायला दिला होता नकार; नेमकं प्रकरण काय?
6
गुरुद्वादशी २०२५: श्रीपाद श्रीवल्लभ यांचा स्मरण दिन; ३० वर्षांचे अद्भूत अवतार कार्य! वाचा
7
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
8
Diwali Muhurat Trading 2025 : शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
9
Nissan Magnite CNG : पेट्रोल दरवाढीला 'बाय बाय'! निसानची कार ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह लाँच; किंमत ऐकून खूश व्हाल
10
IRCTC Website Down: आयआरसीटीसीची तिकीट बुकिंग साईट झाली ठप्प! मोबाईल अ‍ॅपवरुनही बुकिंग होईना
11
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
12
Diwali 2025: अश्विन वद्य द्वादशीलाच वसुबारस का? कोणत्या गायीला हा सण समर्पित आहे माहितीय?
13
वयाच्या २५ व्या वर्षी ऑलिंपिक चॅम्पियननं घेतला संन्यास; एरियार्नच्या निर्णयानं चाहते हैराण
14
दिवाळीत शनि प्रदोष: शंकराची पूजा देईल पुण्य-लाभ, ‘असे’ करा व्रत; प्रभावी मंत्रांचे जप कराच
15
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
16
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
17
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
18
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
19
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
20
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?

‘एक वही भावासाठी, एक पुस्तक बहिणीसाठी’; पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 19:00 IST

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा उपक्रम

ठळक मुद्दे शालेय साहित्य कोल्हापूर, सांगली आणि साताराच्या शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल.

औरंगाबाद : सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत सर्वस्व गमावलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. या नागरिकांच्या पाल्यांच्या शाळा येत्या आठ दिवसांत उघडल्या जातील. तेव्हा या बालकांना शाळेत जाण्यासाठी वही, पेन, पुस्तक, कंपास आदी शालेय साहित्य असणार नाही. या तिन्ही जिल्ह्यांतील प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेत येताच हे साहित्य मिळावे, यासाठी औरंगाबाद माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी एक अभिनव उपक्रम सुरूकेला आहे. ‘एक वही भावासाठी, एक पुस्तक बहिणीसाठी’ उपक्रमांतर्गत शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी शालेय साहित्य आणून मुख्याध्यापकांकडे जमा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यात राज्यातील नागरिक, शासनाकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोचविण्यात येत आहे. येत्या आठ-दहा दिवसांत जनजीवन सुरळीत होईल. गावांमधील शाळा उघडल्या जातील. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची घरे आठ दिवसांपासून पाण्यात होती. त्यामुळे घरातील प्रत्येक वस्तू नष्ट झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शालेय साहित्यही पावसाने हिरावून घेतले आहे. अगोदरच या भागातील नागरिकांचे जीवन जगण्याचे वांधे झालेले असल्यामुळे या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळणे कठीण आहे. राज्यभरातून विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याविषयी मदत करण्यात येत नाही. त्यामुळे आपल्या  भावा-बहिणींसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक वही, एक पुस्तक, कंपास साहित्य आणावे. हे साहित्य पुरात शालेय साहित्य वाहून गेलेल्या आपल्या बहीण, भावांसाठी पाठविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आणलेले शालेय साहित्य मुख्याध्यापकांनी एकत्र जमा करून घ्यावे, हे जमलेले साहित्य वस्तूनुसार वेगवेगळे करून माध्यमिक शिक्षणाधिकारी, चेलीपुरा हायस्कूल, स्टेशन रोड येथे आणून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांकडून जमा झालेले हे शालेय साहित्य कोल्हापूर, सांगली आणि साताराच्या शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल. तेथून ते साहित्य प्रत्येक शाळेत पाठविले जाईल, असेही डॉ. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

उपक्रमशील शिक्षणाधिकारी म्हणून नावलौकिकजि.प. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण हे नियमितपणे विविध उपक्रम राबवत असतात. दहावी-बारावी परीक्षेच्या काळात विविध केंद्रांना भेटी देऊन त्यांनी कॉपी रोखण्यावर भर दिला होता. ४यात मोठ्या कारवाईसुद्धा केल्या आहेत. यावर्षी शाळा भरताच त्यांनी मुख्याध्यापक, संस्थाचालकांची बैठक घेत कॉपीमुक्तीसाठी आतापासून प्रयत्न सुरू आहेत.४ तसेच प्रत्येक विद्यार्थी, शिक्षकांना मदत करणे, उपक्रम राबविण्यातही त्यांचा नावलौकिक आहे. यावेळी त्यांनी सामाजिक भान जपत पूरग्रस्तांसाठी साहित्य जमा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत सर्वजण नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करत आहेत. आपण शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे हा उपक्रम सुरू केला आहे. यात समाजातील घटकही सहभागी झाल्यास त्यांचेही स्वागतच करूत. तरी जास्तीत जास्त नागरिक, विद्यार्थ्यांना आपल्या भावा-बहिणींसाठी एक वही, एक पुस्तक घेऊन येतील असा विश्वास आहे.- डॉ. बी.बी. चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी, औरंगाबाद 

टॅग्स :floodपूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबादTeacherशिक्षकStudentविद्यार्थी