शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

जीप उलटल्याने एकाचा मृत्यू

By admin | Updated: May 15, 2014 00:28 IST

वाळूज महानगर : पुण्याहून औरंगाबादकडे भरधाव वेगाने येणारी सुमो जीपचालकाचे नियंत्रण सुटून उलटल्यामुळे एकाचा मृत्यू, तर चालकासह चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटे जिकठाण फाट्यावर घडली.

वाळूज महानगर : पुण्याहून औरंगाबादकडे भरधाव वेगाने येणारी सुमो जीपचालकाचे नियंत्रण सुटून उलटल्यामुळे एकाचा मृत्यू, तर चालकासह चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटे जिकठाण फाट्यावर घडली. औरंगाबाद येथील आयटीआयचे कर्मचारी टाटा सुमो जीप (क्र. एमएच-४४, बी-२८४९) मध्ये मुंबईहून पुणेमार्गे औरंगाबादकडे येत होते. जिकठाण फाट्यावर आज (१४ मे रोजी) पहाटे ५ वाजेच्या सुमारास जीपचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही जीप रोडच्या खाली जाऊन उलटली. या अपघातात टाटा सुमोमधील हर्षवर्धन बाहुबली शहा (५२, रा. परभणी) हा गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच ठार झाला. दरम्यान, याच मार्गावर वाळूज पोलीस ठाण्याचे पोहेकॉ. नंदकुमार आव्हाळे, पोकॉ. अमजद पटेल, पोकॉ. लोखंडे, वाहनचालक खंडागळे हे रात्रीची गस्त घालत असताना त्यांना या अपघाताची माहिती मिळाली. पथकाने अपघातस्थळी धाव घेऊन जीपमधील चालक दादाराव जोखाजी जाधव (५८, रा. पवनगर, सिडको) तसेच प्रवासी आर.आर. आंबेकर, ए.यू. उसळे, नागरे (सर्व रा. औरंगाबाद) यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केले. भरधाव वेगाने येत असताना जीपचालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोहेकॉ. नंदुकमार आव्हाळे यांच्या तक्रारीवरून जीपचालक दादाराव जाधव याच्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संजय निकुंभ करीत आहेत. अपघात सत्र सुरूच वाळूज परिसरात गत चार दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरूच आहे. विविध चार अपघातांत पाच जण ठार झाले असून, आठ जण जखमी झाले आहेत. ११ मे रोजी मुंबई- नागपूर हायवेवर खोजेवाडी शिवारात बीअर घेऊन जाणार्‍या ट्रकने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे किशोर जाधव व आकाश जाधव (रा. नागरे बाभूळगाव, ता. गंगापूर) या दोघा पिता-पुत्राचा मृत्यू झाला होता, तर संगीता जाधव व एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला होता. याच महामार्गावर १२ मे रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शिर्डीहून लग्न समारंभ उरकून औरंगाबादकडे येणारी कार टेम्पोवर पाठीमागून धडकली होती. या अपघातात पवन राठी हा ठार झाला असून, कारमधील प्रा. नंदकिशोर राठी, गीता राठी, कमल खटोड हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. काल १३ मे रोजी कामगार चौकात अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे गणेश पुंडलिक भोकरे हा ठार झाला होता, तर गजानंद काकडे हा जखमी झाला होता. गेल्या चार दिवसांत वेगवेगळ्या अपघातांत आतापर्यंत पाच जणांना आपला प्राण गमवावा लागला असून, आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात सत्र थांबत नसल्यामुळे ये-जा करणार्‍या वाहनधारक व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.