शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

चौथ्या दिवशीही सकल मराठा समाजाचे आंदोलन सुरूच

By बापू सोळुंके | Updated: May 4, 2023 19:36 IST

मराठा आरक्षणाची मागणी: विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी आंदोलकांशी घेतली भेट

छत्रपती संभाजीनगर : मराठा  आणि ओबीसीमध्ये असलेले कुणबी मराठा एकच असून मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी १ मे पासून सकल मराठा समाजाने क्रांतीचौकात सुरू केलेले ठिय्या आंदोलन आज चौथ्या दिवशीही ४ मे रोजी सुरू होते. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी गुरूवारी सकल मराठा समाजाच्या आंदोलकाची घेतली भेट घेतली.

पश्चिम महाराष्ट्रातील दोन-तीन जिल्हे वगळता अन्य राज्यभरातील मराठा समाजाला कुणबी मराठा हे ओबीसीचे प्रमाणपत्र दिले जाते. राज्यसरकारने नेमलेल्या विविध आयेाग आणि समित्यांनी कुणबी मराठा आणि मराठा समाज एकच असल्याचा आणि मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचा अहवाल दिलेला आहे. तरीही सुद्धा मराठा समाजाला आरक्षणापासून वंचीत का  ठेवलं जात आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत ४३ बांधवांनी आत्मबलिदान दिले. तसेच ५८ मोर्चे काढण्यात आले होते. यानंतर २०१९मध्ये तत्कालीन राज्यसरकारने दिलेले एसईबीसी हे आरक्षण सर्वेाच्च न्यायालयाने रद्द केले. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश हाच अंतिम पर्याय आहे, असे नमूद करीत प्रा.चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, सतीश वेताळ, रेखा वाहटूळे, दिव्या पाटील,सुकन्या भोसले, मनोज गायके, रविंद्र वाहटूळे आदींसह मराठा कार्यकर्त्यांनी १ मे पासून क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

५ मे रोजी आत्मदहनाचा इशारा१ मे पासून सुरू केलेल्या आंदोलनाची राज्यसरकारने दखल घेतली नाही. यामुळे संतप्त महिला आंदोलकांनी  ५ मे रोजी आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. तसेच शिंदे फडणवीस सरकार टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जात आहे परंतु मराठा आरक्षणासाठी ते काहीही करत नसल्याचा आरोप आंदोलकानी लावला.

मराठा आरक्षणावर सरकारचा वेळकाढूपणा- अंबादास दानवेसर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची याचिका फेटाळल्यानंतर. शिंदे - फडणवीस सरकार फक्त वेळ काढू पणा करत असल्याचा आरोप आ. अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.  ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळू नाही अशी केंद्र आणि राज्य सरकारची भावना आहेत. फडणवीस  यांनी विरोधी विरोधी पक्षात असताना आमचे सरकार आल्याबरोबर मराठा मराठा समाजाला आरक्षण दिले, जाईल असे म्हटले होते, ते आश्वासन त्यांनी पाळले नसल्याचा आरोप दानवेंनी केला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादAmbadas Danweyअंबादास दानवे