शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

जुन्या वादातून तरुणाला भोसकले, लक्ष्मी कॉलनीतील घटना

By राम शिनगारे | Updated: October 7, 2022 21:50 IST

आरोपीला १० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

औरंगाबाद : जुन्या वादात एका तरुणाला भोसकल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास लक्ष्मीनगर, प्रज्ञानगर भागात घडली. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला १० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

हेमंत गंगावणे (रा. अशोकनगर, लक्ष्मी कॉलनी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी किरण सुनील साळवे (रा. मिलकॉर्नर, कोतवालपुरा) याने फिर्यादीचा मावस भाऊ अतुल रमेश लोखंडे यास भोसकले. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मित्रांनी दुर्गा देवीचे कायगाव येथे गोदावरी नदीत विसर्जन केले. त्यानंतर रात्री ११ च्या सुमारास लक्ष्मी कॉलनी येथे परतले. त्यानंतर फिर्यादीसह अमोल बोर्डे, उमेश महिरे आणि जखमी अतुल लोखंडे हे चारचाकी गाडीतून विद्यापीठ परिसरातील लेणीकडे फिरण्यासाठी गेले होते. तेथून साडेबाराच्या सुमारास परत आल्यानंतर सर्वजण प्रज्ञानगर येथील शंकराच्या मंदिराच्या बाजूच्या मोकळ्या जागेत गप्पा मारीत बसले. तेव्हा त्याठिकाणी आरोपी किरण साळवे हा आला. ‘तू परवा माझ्या सोबत का भांडण केले,’ असे म्हणून त्याने अतुल लोखंडे यास शिवीगाळ केली. त्याच वेळी त्याने हातातील चाकूने अतुलच्या पोटात उजव्या बाजूला दोन वार करून पळ काढला.

गंभीर जखमी झालेल्या अतुलला मित्रांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. तपास अधिकारी सहायक निरीक्षक पांडुरंग भागिले यांनी आरोपीस अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर १० ऑक्टोबरपर्यंत पोलीस काेठडी मंजूर करण्यात आली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी