शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अरे व्वा! आता गावातही होणार कचरा संकलन, बचत गट घेणार जबाबदारी

By विजय सरवदे | Updated: November 25, 2023 19:24 IST

पहिल्या टप्प्यात जि.प. राबविणार ७७ गावांत उपक्रम

छत्रपती संभाजीनगर : शहराप्रमाणे आता गावेही स्वच्छ दिसावीत, या दिशेने जिल्हा परिषदेने पाऊल उचलले आहे. पहिल्या टप्प्यात ५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ७७ गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून बचतगटांच्या माध्यमातून घरोघरी जावून कचरा संकलित केला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतींच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेसोबत लवकरच करार केला जाणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी विकस मीना यांच्या संकल्पनेतील हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जि.प.तील स्वच्छ भारत मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले व त्यांची टीम परिश्रम घेत आहे. गावात रस्त्यावर अथवा मोकळ्या जागेत कचरा विखुरलेला असतो. सांडपाणी रस्त्यावर पसरलेले असते. त्यामुळे अनेकदा डास, माशा, चिलटे, अळ्यांमुळे आरोग्याची समस्या उद्भवते. गावेही स्वच्छ झाली पाहिजेत. तिथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे, या हेतूने स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ भारत मिशन कक्षाने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनावर भर दिला आहे. सांडपाणी व्यवस्थापनावर बऱ्यापैकी कामे सुरू आहेत. पण, गावातील कचरा इकडे- तिकडे न टाकता तो एकाच ठिकाणी जमा व्हावा व त्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. कचरा संकलित करतानाच ओला व सुका असे वर्गीकरण केले जाईल. १५ डिसेंबरपर्यंत हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावात तो राबविण्यात येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले यांनी सांगितले.

बचत गट करतील कचरा जमाजिल्ह्यात ५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ७७ गावांमध्ये बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन संकलित केला जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत कचरा विलगीकरण शेड उभारले जाणार असून या शेडमध्ये पाच हौद असतील. त्यात काच, रबर, प्लास्टिक, मेडिकल वेस्ट (सॅनिटेरी नॅपकीन वैगरे) व अन्य असे कचऱ्याचे वर्गीकरण करून टाकला जाईल. तो कचरा मनपाच्या प्रक्रिया सेंटरपर्यंत नेण्याचे कामही ग्रामपंचायतीला करावे लागणार आहे. यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी सातत्याने बैठका घेऊन ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व ग्रामसेवकांची मानसिकता तयार केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद