शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

अरे व्वा! आता गावातही होणार कचरा संकलन, बचत गट घेणार जबाबदारी

By विजय सरवदे | Updated: November 25, 2023 19:24 IST

पहिल्या टप्प्यात जि.प. राबविणार ७७ गावांत उपक्रम

छत्रपती संभाजीनगर : शहराप्रमाणे आता गावेही स्वच्छ दिसावीत, या दिशेने जिल्हा परिषदेने पाऊल उचलले आहे. पहिल्या टप्प्यात ५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ७७ गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून बचतगटांच्या माध्यमातून घरोघरी जावून कचरा संकलित केला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतींच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेसोबत लवकरच करार केला जाणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी विकस मीना यांच्या संकल्पनेतील हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जि.प.तील स्वच्छ भारत मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले व त्यांची टीम परिश्रम घेत आहे. गावात रस्त्यावर अथवा मोकळ्या जागेत कचरा विखुरलेला असतो. सांडपाणी रस्त्यावर पसरलेले असते. त्यामुळे अनेकदा डास, माशा, चिलटे, अळ्यांमुळे आरोग्याची समस्या उद्भवते. गावेही स्वच्छ झाली पाहिजेत. तिथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे, या हेतूने स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ भारत मिशन कक्षाने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनावर भर दिला आहे. सांडपाणी व्यवस्थापनावर बऱ्यापैकी कामे सुरू आहेत. पण, गावातील कचरा इकडे- तिकडे न टाकता तो एकाच ठिकाणी जमा व्हावा व त्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. कचरा संकलित करतानाच ओला व सुका असे वर्गीकरण केले जाईल. १५ डिसेंबरपर्यंत हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावात तो राबविण्यात येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले यांनी सांगितले.

बचत गट करतील कचरा जमाजिल्ह्यात ५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ७७ गावांमध्ये बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन संकलित केला जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत कचरा विलगीकरण शेड उभारले जाणार असून या शेडमध्ये पाच हौद असतील. त्यात काच, रबर, प्लास्टिक, मेडिकल वेस्ट (सॅनिटेरी नॅपकीन वैगरे) व अन्य असे कचऱ्याचे वर्गीकरण करून टाकला जाईल. तो कचरा मनपाच्या प्रक्रिया सेंटरपर्यंत नेण्याचे कामही ग्रामपंचायतीला करावे लागणार आहे. यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी सातत्याने बैठका घेऊन ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व ग्रामसेवकांची मानसिकता तयार केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद