शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! पैठण रोडवर २० किमी रस्त्याच्या खाली जलवाहिनी; फुटली तर ५० मीटर उंच उडेल वाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 19:48 IST

पैठण रोडवर २० किमी रस्त्याच्या खाली जलवाहिनी

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेल्या जलवाहिनीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. जर भविष्यात ही जलवाहिनी फुटली तर तेथून जाणारे वाहन किमान ४० ते ५० मीटरपर्यंत उडण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविली. त्यामुळे २७४० कोटी रुपयांच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतचे अंतर ३९ किमी आहे. २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी ३४ किमीपर्यंत टाकण्यात आली. मुख्य रस्ता सोडून नॅशनल हायवेने ठरवून दिलेल्या ७ मीटर बाजूला जलवाहिनी टाकण्यात आली. आता जलवाहिनीच्या वर २० किमी कॅरेज वे येत आहे. या रस्त्याच्या खाली आलेल्या जलवाहिनीवरून वाहतूक सुरू राहील. भविष्यात जलवाहिनी फुटली तर पाण्याच्या दाबाने एखादे वाहन ५० मीटर उंच फेकले जाईल. ही परिस्थिती आता अधिकाऱ्यांच्या लक्षात आली आहे. आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कॅरेज वे रस्ता शिफ्ट करण्याची मागणी न्यायालयात केली आहे. यावरून नॅशनल हायवे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यात समन्वय नाही, असे स्पष्ट होते. मार्च २०२५ पर्यंत शहरात पाणी येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. हा अंदाज चुकीचा होता.

या प्रश्नांची उत्तरे कोण देणार?-२५०० मिमी व्यासाची मोठी जलवाहिनी टाकताना नॅशनल हायवेला ती चुकीच्या ठिकाणी टाकली, हे लक्षात आले नाही का?- मुख्य रस्त्याच्या बाजूला ७ मीटर अंतर सोडून जलवाहिनी टाकण्याची परवानगी नॅशनल हायवेने का दिली?-जलवाहिन्या कॅरेज वे खाली येत असल्याचे लक्षात येताच काम का थांबविण्यात आले नाही?- आता २० किमी अंतरावरील जलवाहिन्या हलवणे मजीप्राला शक्य आहे का? कारण जलवाहिन्यांना वेल्डिंग केलेली आहे.-शहरात पाणी येण्यास आणखी बराच विलंब होईल, याला जबाबदार कोण?

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणी