शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

बापरे! पैठण रोडवर २० किमी रस्त्याच्या खाली जलवाहिनी; फुटली तर ५० मीटर उंच उडेल वाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 19:48 IST

पैठण रोडवर २० किमी रस्त्याच्या खाली जलवाहिनी

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेल्या जलवाहिनीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. जर भविष्यात ही जलवाहिनी फुटली तर तेथून जाणारे वाहन किमान ४० ते ५० मीटरपर्यंत उडण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविली. त्यामुळे २७४० कोटी रुपयांच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतचे अंतर ३९ किमी आहे. २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी ३४ किमीपर्यंत टाकण्यात आली. मुख्य रस्ता सोडून नॅशनल हायवेने ठरवून दिलेल्या ७ मीटर बाजूला जलवाहिनी टाकण्यात आली. आता जलवाहिनीच्या वर २० किमी कॅरेज वे येत आहे. या रस्त्याच्या खाली आलेल्या जलवाहिनीवरून वाहतूक सुरू राहील. भविष्यात जलवाहिनी फुटली तर पाण्याच्या दाबाने एखादे वाहन ५० मीटर उंच फेकले जाईल. ही परिस्थिती आता अधिकाऱ्यांच्या लक्षात आली आहे. आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कॅरेज वे रस्ता शिफ्ट करण्याची मागणी न्यायालयात केली आहे. यावरून नॅशनल हायवे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यात समन्वय नाही, असे स्पष्ट होते. मार्च २०२५ पर्यंत शहरात पाणी येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. हा अंदाज चुकीचा होता.

या प्रश्नांची उत्तरे कोण देणार?-२५०० मिमी व्यासाची मोठी जलवाहिनी टाकताना नॅशनल हायवेला ती चुकीच्या ठिकाणी टाकली, हे लक्षात आले नाही का?- मुख्य रस्त्याच्या बाजूला ७ मीटर अंतर सोडून जलवाहिनी टाकण्याची परवानगी नॅशनल हायवेने का दिली?-जलवाहिन्या कॅरेज वे खाली येत असल्याचे लक्षात येताच काम का थांबविण्यात आले नाही?- आता २० किमी अंतरावरील जलवाहिन्या हलवणे मजीप्राला शक्य आहे का? कारण जलवाहिन्यांना वेल्डिंग केलेली आहे.-शहरात पाणी येण्यास आणखी बराच विलंब होईल, याला जबाबदार कोण?

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणी