शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

लोकप्रतिनिधी विरुद्ध पदाधिकारी;वैजापूर शिवसेनेतील गटबाजीची ‘मातोश्री’ने घेतली गंभीर दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 16:25 IST

गेल्या महिन्यांतील घटनेप्रकरणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांनी पक्ष सचिवांना पत्र देऊन संघटनेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

औरंगाबाद : वैजापूर तालुका शिवसेनेत गेल्या महिन्यांत झालेल्या राड्याप्रकरणी ‘मातोश्री’ ने गांभीर्याने दखल घेतली आहे. लोकप्रतिनिधी विरुद्ध संघटना पदाधिकारी असे काही चित्र तालुक्यात निर्माण झाल्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेतृत्व याबाबत विचार करू लागले आहे. आगामी जि.प. आणि पं.स. निवडणुकीवर अंतर्गत गटबाजीचा परिणाम होऊ नये, यासाठी पक्षपातळीवरून समज देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

गेल्या महिन्यांतील घटनेप्रकरणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांनी पक्ष सचिवांना पत्र देऊन संघटनेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीमुळेच पक्षाने वैजापूरमधील शिवसेनेतील गटबाजीचे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वाद ‘मातोश्री’पर्यंत गेला आहे. गेल्या महिन्यांत आ.रमेश बोरनारे, माजी तालुकाप्रमुख संजय निकम व उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, माजी जि.प. सदस्य मनाजी मिसाळ यांच्यात वाद झाला होता. जिल्हाप्रमुख आ.दानवे यांनी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीत निकम यांनी काही तक्रारी मांडल्या होत्या. त्यामुळे ती बैठक संपल्यानंतर दोन्ही गटांत वाद झाले होते. त्यानंतर, दोन्ही गटांकडून सारवासारव करत, असे काही घडलेच नसल्याचे सांगण्यात आले.

मात्र, दोन्ही गटांनी परस्परांच्या विरोधात थेट मातोश्रीपर्यंत तक्रारी केल्या. निकम यांनी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. आ.बोरनारे हे पक्षपाती काम करीत आहेत. ते कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे, तर आ.बोरनारे यांनीही जिल्हाप्रमुखांमार्फत निकम यांना पक्षातून निलंबित करावे, अशी मागणी शिवसेना सचिवांकडे केली. दुसरीकडे शिवसेनेचे शिष्टमंडळ खैरे यांना भेटले, त्यांनी या प्रकरणात दोषींवर कारवाईची मागणी केली. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणतीही कारवाई झाली नसली, तरी पक्षपातळीवर चिंतन सुरू असल्याची चर्चा सेनेच्या गोटात आहे.

स्थानिक नेत्यांनी घेतला आढावाजिल्हा प्रमुख आ.अंबादास दानवे यांनी सांगितले, हे प्रकरण वरिष्ठ पातळीवर गेले आहे, याबाबत वरिष्ठच निर्णय घेतील, तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले, संघटनेला हानीकारक असणाऱ्यांवर कारवाईच्या अनुषंगाने मातोश्रीवर पत्र पाठविले आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेChandrakant Khaireचंद्रकांत खैरे