शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधी विरुद्ध पदाधिकारी;वैजापूर शिवसेनेतील गटबाजीची ‘मातोश्री’ने घेतली गंभीर दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 16:25 IST

गेल्या महिन्यांतील घटनेप्रकरणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांनी पक्ष सचिवांना पत्र देऊन संघटनेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

औरंगाबाद : वैजापूर तालुका शिवसेनेत गेल्या महिन्यांत झालेल्या राड्याप्रकरणी ‘मातोश्री’ ने गांभीर्याने दखल घेतली आहे. लोकप्रतिनिधी विरुद्ध संघटना पदाधिकारी असे काही चित्र तालुक्यात निर्माण झाल्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेतृत्व याबाबत विचार करू लागले आहे. आगामी जि.प. आणि पं.स. निवडणुकीवर अंतर्गत गटबाजीचा परिणाम होऊ नये, यासाठी पक्षपातळीवरून समज देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

गेल्या महिन्यांतील घटनेप्रकरणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांनी पक्ष सचिवांना पत्र देऊन संघटनेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीमुळेच पक्षाने वैजापूरमधील शिवसेनेतील गटबाजीचे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वाद ‘मातोश्री’पर्यंत गेला आहे. गेल्या महिन्यांत आ.रमेश बोरनारे, माजी तालुकाप्रमुख संजय निकम व उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, माजी जि.प. सदस्य मनाजी मिसाळ यांच्यात वाद झाला होता. जिल्हाप्रमुख आ.दानवे यांनी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीत निकम यांनी काही तक्रारी मांडल्या होत्या. त्यामुळे ती बैठक संपल्यानंतर दोन्ही गटांत वाद झाले होते. त्यानंतर, दोन्ही गटांकडून सारवासारव करत, असे काही घडलेच नसल्याचे सांगण्यात आले.

मात्र, दोन्ही गटांनी परस्परांच्या विरोधात थेट मातोश्रीपर्यंत तक्रारी केल्या. निकम यांनी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. आ.बोरनारे हे पक्षपाती काम करीत आहेत. ते कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे, तर आ.बोरनारे यांनीही जिल्हाप्रमुखांमार्फत निकम यांना पक्षातून निलंबित करावे, अशी मागणी शिवसेना सचिवांकडे केली. दुसरीकडे शिवसेनेचे शिष्टमंडळ खैरे यांना भेटले, त्यांनी या प्रकरणात दोषींवर कारवाईची मागणी केली. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणतीही कारवाई झाली नसली, तरी पक्षपातळीवर चिंतन सुरू असल्याची चर्चा सेनेच्या गोटात आहे.

स्थानिक नेत्यांनी घेतला आढावाजिल्हा प्रमुख आ.अंबादास दानवे यांनी सांगितले, हे प्रकरण वरिष्ठ पातळीवर गेले आहे, याबाबत वरिष्ठच निर्णय घेतील, तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले, संघटनेला हानीकारक असणाऱ्यांवर कारवाईच्या अनुषंगाने मातोश्रीवर पत्र पाठविले आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेChandrakant Khaireचंद्रकांत खैरे