शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

लोकप्रतिनिधी विरुद्ध पदाधिकारी;वैजापूर शिवसेनेतील गटबाजीची ‘मातोश्री’ने घेतली गंभीर दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 16:25 IST

गेल्या महिन्यांतील घटनेप्रकरणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांनी पक्ष सचिवांना पत्र देऊन संघटनेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

औरंगाबाद : वैजापूर तालुका शिवसेनेत गेल्या महिन्यांत झालेल्या राड्याप्रकरणी ‘मातोश्री’ ने गांभीर्याने दखल घेतली आहे. लोकप्रतिनिधी विरुद्ध संघटना पदाधिकारी असे काही चित्र तालुक्यात निर्माण झाल्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेतृत्व याबाबत विचार करू लागले आहे. आगामी जि.प. आणि पं.स. निवडणुकीवर अंतर्गत गटबाजीचा परिणाम होऊ नये, यासाठी पक्षपातळीवरून समज देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

गेल्या महिन्यांतील घटनेप्रकरणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांनी पक्ष सचिवांना पत्र देऊन संघटनेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीमुळेच पक्षाने वैजापूरमधील शिवसेनेतील गटबाजीचे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वाद ‘मातोश्री’पर्यंत गेला आहे. गेल्या महिन्यांत आ.रमेश बोरनारे, माजी तालुकाप्रमुख संजय निकम व उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, माजी जि.प. सदस्य मनाजी मिसाळ यांच्यात वाद झाला होता. जिल्हाप्रमुख आ.दानवे यांनी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीत निकम यांनी काही तक्रारी मांडल्या होत्या. त्यामुळे ती बैठक संपल्यानंतर दोन्ही गटांत वाद झाले होते. त्यानंतर, दोन्ही गटांकडून सारवासारव करत, असे काही घडलेच नसल्याचे सांगण्यात आले.

मात्र, दोन्ही गटांनी परस्परांच्या विरोधात थेट मातोश्रीपर्यंत तक्रारी केल्या. निकम यांनी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. आ.बोरनारे हे पक्षपाती काम करीत आहेत. ते कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे, तर आ.बोरनारे यांनीही जिल्हाप्रमुखांमार्फत निकम यांना पक्षातून निलंबित करावे, अशी मागणी शिवसेना सचिवांकडे केली. दुसरीकडे शिवसेनेचे शिष्टमंडळ खैरे यांना भेटले, त्यांनी या प्रकरणात दोषींवर कारवाईची मागणी केली. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणतीही कारवाई झाली नसली, तरी पक्षपातळीवर चिंतन सुरू असल्याची चर्चा सेनेच्या गोटात आहे.

स्थानिक नेत्यांनी घेतला आढावाजिल्हा प्रमुख आ.अंबादास दानवे यांनी सांगितले, हे प्रकरण वरिष्ठ पातळीवर गेले आहे, याबाबत वरिष्ठच निर्णय घेतील, तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले, संघटनेला हानीकारक असणाऱ्यांवर कारवाईच्या अनुषंगाने मातोश्रीवर पत्र पाठविले आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेChandrakant Khaireचंद्रकांत खैरे