शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

लोकप्रतिनिधी विरुद्ध पदाधिकारी;वैजापूर शिवसेनेतील गटबाजीची ‘मातोश्री’ने घेतली गंभीर दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 16:25 IST

गेल्या महिन्यांतील घटनेप्रकरणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांनी पक्ष सचिवांना पत्र देऊन संघटनेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

औरंगाबाद : वैजापूर तालुका शिवसेनेत गेल्या महिन्यांत झालेल्या राड्याप्रकरणी ‘मातोश्री’ ने गांभीर्याने दखल घेतली आहे. लोकप्रतिनिधी विरुद्ध संघटना पदाधिकारी असे काही चित्र तालुक्यात निर्माण झाल्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेतृत्व याबाबत विचार करू लागले आहे. आगामी जि.प. आणि पं.स. निवडणुकीवर अंतर्गत गटबाजीचा परिणाम होऊ नये, यासाठी पक्षपातळीवरून समज देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

गेल्या महिन्यांतील घटनेप्रकरणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांनी पक्ष सचिवांना पत्र देऊन संघटनेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीमुळेच पक्षाने वैजापूरमधील शिवसेनेतील गटबाजीचे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वाद ‘मातोश्री’पर्यंत गेला आहे. गेल्या महिन्यांत आ.रमेश बोरनारे, माजी तालुकाप्रमुख संजय निकम व उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, माजी जि.प. सदस्य मनाजी मिसाळ यांच्यात वाद झाला होता. जिल्हाप्रमुख आ.दानवे यांनी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीत निकम यांनी काही तक्रारी मांडल्या होत्या. त्यामुळे ती बैठक संपल्यानंतर दोन्ही गटांत वाद झाले होते. त्यानंतर, दोन्ही गटांकडून सारवासारव करत, असे काही घडलेच नसल्याचे सांगण्यात आले.

मात्र, दोन्ही गटांनी परस्परांच्या विरोधात थेट मातोश्रीपर्यंत तक्रारी केल्या. निकम यांनी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. आ.बोरनारे हे पक्षपाती काम करीत आहेत. ते कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे, तर आ.बोरनारे यांनीही जिल्हाप्रमुखांमार्फत निकम यांना पक्षातून निलंबित करावे, अशी मागणी शिवसेना सचिवांकडे केली. दुसरीकडे शिवसेनेचे शिष्टमंडळ खैरे यांना भेटले, त्यांनी या प्रकरणात दोषींवर कारवाईची मागणी केली. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणतीही कारवाई झाली नसली, तरी पक्षपातळीवर चिंतन सुरू असल्याची चर्चा सेनेच्या गोटात आहे.

स्थानिक नेत्यांनी घेतला आढावाजिल्हा प्रमुख आ.अंबादास दानवे यांनी सांगितले, हे प्रकरण वरिष्ठ पातळीवर गेले आहे, याबाबत वरिष्ठच निर्णय घेतील, तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले, संघटनेला हानीकारक असणाऱ्यांवर कारवाईच्या अनुषंगाने मातोश्रीवर पत्र पाठविले आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेChandrakant Khaireचंद्रकांत खैरे