शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
2
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
3
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
4
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
5
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
6
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
7
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
8
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
9
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
10
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
11
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
12
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
13
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
14
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
15
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
16
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
17
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
18
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
19
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
20
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात एक लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:01 IST

महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण जाहीर केले आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यात २५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य गाठण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

ठळक मुद्देसुभाष देसाई : पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘एनर्जी कॉन्क्लेव्ह २०१८’मध्ये प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण जाहीर केले आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यात २५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य गाठण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या (पीईएस) अभियांत्रिकी महाविद्यालयात चेम्बर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज आणि अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआयए)च्या सहकार्याने चौथ्या ‘एनर्जी कॉन्क्लेव्ह २०१८’चे आयोजन केले आहे. या कॉन्क्लेव्हला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर ‘पीईएस’चे प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, ‘सीएमआयए’चे अध्यक्ष प्रकाश कोकीळ, डॉ. बी.एन. चौधरी, राहुल देशपांडे यांची उपस्थिती होती. यावेळी देसाई म्हणाले की, सध्या राज्यात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातून प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे केंद्र सरकारने २०३० पर्यंत इलेक्ट्रिक व्हेईकल नेशन घडविण्याचा निर्धार केला आहे. या धोरणाची अंमलबजावणी राज्यात केली जात आहे. राज्यात नोंदणी झालेल्या पहिल्या एक लाख इलेक्ट्रिक वाहनांसाठी खाजगी वाहतूक आणि वाहतूक खरेदीदारांना धोरणाच्या कालावधीत अंतिम वापरकर्ता अनुदान देण्यात येणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, सीएआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनीही मनोगत व्यक्त केले. परिषदेसाठी आयआयटीचे प्रोफेसर के. मुन्शी, इलेक्ट्रिक कारचे संस्थापक डॉ. रुशेन चेहल, मिताली मिश्रा आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन समन्वयक राहुल देशपांडे यांनी केले.आॅरिक सिटी भारतात सर्वोत्कृष्ट असेलमराठवाड्यात अधिकाधिक चांगले उद्योग येण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. औरंगाबादेत उभारण्यात येत असलेली आॅरिक सिटी ही भारतातील सर्वोत्कृष्ट उद्योगनगरी असेल, असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.