शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णसंख्या घटली पण मृत्यूसत्र वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 12:45 IST

जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी घट झाली आहे. त्यामुळे दिलासा मिळत असला तरी काेरोनाग्रस्तांचे रोज होणारे मृत्यू काही केल्या थांबत नसल्याने प्रशासनासमोरची चिंता वाढली आहे. 

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी घट झाली आहे. त्यामुळे दिलासा मिळत असला तरी  काेरोनाग्रस्तांचे रोज होणारे मृत्यू काही केल्या थांबत नसल्याने प्रशासनासमोरची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील एकूण मृत्यूचा आकडा आता हजाराच्या उंबरठ्यात गेला आहे. 

घाटी येथे नुकतीच डेथ ऑडिट संदर्भात बैठक झाली. मृत्यूच्या प्रमाणाविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी होत असलेल्या उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात दि. १३ मे रोजी मृत्यूदर २. ५२ टक्के होता. मंगळवार दि. ६ रोजीचा मृत्यूदर २. ८२ टक्क्यांवर गेला होता. दि. १ ते ६ ऑक्टोबर दरम्यानच तब्बल ३८ मृत्यू जिल्ह्यात नोंदविले गेले आहेत.

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बहुतांश रूग्णांना अन्य आजारही  होते. मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब आदी आजारांमुळे  प्रकृती अधिक गंभीर होते. त्यामुळे उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने रूग्णांचा मृत्यू ओढावतो. गंभीर आजारांमुळे मृत्यूचे प्रमाण अधिक वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू