शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आता ओला-सुका कचरा वेगळा करावाच लागेल; अन्यथा ५०० रुपये दंड!

By मुजीब देवणीकर | Updated: July 15, 2023 19:37 IST

 इंदूरपेक्षाही स्वच्छ, सुंदर करण्याचा महापालिकेचा निर्धार

छत्रपती संभाजीनगर : शहराला इंदूरपेक्षाही स्वच्छ, सुंदर करण्याचा विडा महापालिका प्रशासनाने उचलला आहे. त्यासाठी नागरिकांची साथ महत्त्वाची आहे. नागरिक महापालिकेच्या कार्यपद्धतीला मोठ्या प्रमाणात सहकार्यसुद्धा करीत आहेत. १ ऑगस्टनंतर जे नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करून देणार नाहीत, त्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत दिली.

वर्गीकरण केलेलाच कचरा पडेगाव, चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्रावर गेला पाहिजे, असा दंडकच प्रशासनाने घातला आहे. नागरिकांना सवय लागावी, स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी १ हजार कर्मचारी घरोघरी जाऊन प्रबोधन करीत आहेत. नागरिकांकडून प्रश्नावली भरून घेतली जात आहे. ओला-सुका कचरा कसा वेगळा करावा याबाबचे स्टिकर्स घरावर चिकटवणे सुरू झाले आहे. ३१ जुलैपर्यंत १०० टक्के कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वर्गीकृत कचरा मिळाला नाही तर रेड्डी कंपनीचे कंत्राटदाराचे कर्मचारी, वाहनचालक, मनपाचे जवान आणि स्वच्छतानिरीक्षक, वॉर्ड अधिकारी यांचा पगार थांबविण्यात येईल. १ ऑगस्टपासून घराघरांतून कचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा मिळाला नाही तर नागरिकांना ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले. कचरा वर्गीकरण, त्यावर प्रक्रिया करणाऱ्या सोसायट्या, हॉटेल, दुकाने आदींना बक्षिसे दिली जाणार आहेत.

आजपर्यंत काय झाले?१४ जुलैपर्यंत ७ हजार ८०० घरांना भेटी देण्यात आल्या५१ टक्के वर्गीकरण केलेला कचरा घंटागाडीत येत होता.१३ जुलैपर्यंत ७१ टक्के कचरा वर्गीकरण केलेला मिळत आहे

इच्छाशक्तीचा मोठा अभावशहरातील घराघरांतून कचऱ्याचे वर्गीकरण होणे आवश्यक होते. परंतु, मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे वर्गीकरण करून कचरा मिळत नव्हता. जे सुरू आहे, ते सुरू राहू द्या, ही मानसिकता होती. रस्त्यांची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लवकरच स्मार्ट ओळखपत्र दिले जातील. सार्वजनिक जागांवर स्वच्छता दिसून आली नाही तर कार्यालयप्रमुखांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासक यांनी सांगितले.

वॉकीटॉकीचा प्रभावी वापरएका खासगी कंपनीने डेमोसाठी मनपाला १५ वॉकीटॉकी दिले आहेत. याचा वापर घनकचरा, अग्निशमन दलात केला जाईल. स्वच्छतेला सध्या प्राधान्य देण्यात आले असून, कचरा कुठेही अधिक वेळ पडून राहणार नाही. तक्रार येताच पटकन कारवाई केली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न