शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आता ओला-सुका कचरा वेगळा करावाच लागेल; अन्यथा ५०० रुपये दंड!

By मुजीब देवणीकर | Updated: July 15, 2023 19:37 IST

 इंदूरपेक्षाही स्वच्छ, सुंदर करण्याचा महापालिकेचा निर्धार

छत्रपती संभाजीनगर : शहराला इंदूरपेक्षाही स्वच्छ, सुंदर करण्याचा विडा महापालिका प्रशासनाने उचलला आहे. त्यासाठी नागरिकांची साथ महत्त्वाची आहे. नागरिक महापालिकेच्या कार्यपद्धतीला मोठ्या प्रमाणात सहकार्यसुद्धा करीत आहेत. १ ऑगस्टनंतर जे नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करून देणार नाहीत, त्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत दिली.

वर्गीकरण केलेलाच कचरा पडेगाव, चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्रावर गेला पाहिजे, असा दंडकच प्रशासनाने घातला आहे. नागरिकांना सवय लागावी, स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी १ हजार कर्मचारी घरोघरी जाऊन प्रबोधन करीत आहेत. नागरिकांकडून प्रश्नावली भरून घेतली जात आहे. ओला-सुका कचरा कसा वेगळा करावा याबाबचे स्टिकर्स घरावर चिकटवणे सुरू झाले आहे. ३१ जुलैपर्यंत १०० टक्के कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वर्गीकृत कचरा मिळाला नाही तर रेड्डी कंपनीचे कंत्राटदाराचे कर्मचारी, वाहनचालक, मनपाचे जवान आणि स्वच्छतानिरीक्षक, वॉर्ड अधिकारी यांचा पगार थांबविण्यात येईल. १ ऑगस्टपासून घराघरांतून कचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा मिळाला नाही तर नागरिकांना ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले. कचरा वर्गीकरण, त्यावर प्रक्रिया करणाऱ्या सोसायट्या, हॉटेल, दुकाने आदींना बक्षिसे दिली जाणार आहेत.

आजपर्यंत काय झाले?१४ जुलैपर्यंत ७ हजार ८०० घरांना भेटी देण्यात आल्या५१ टक्के वर्गीकरण केलेला कचरा घंटागाडीत येत होता.१३ जुलैपर्यंत ७१ टक्के कचरा वर्गीकरण केलेला मिळत आहे

इच्छाशक्तीचा मोठा अभावशहरातील घराघरांतून कचऱ्याचे वर्गीकरण होणे आवश्यक होते. परंतु, मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे वर्गीकरण करून कचरा मिळत नव्हता. जे सुरू आहे, ते सुरू राहू द्या, ही मानसिकता होती. रस्त्यांची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लवकरच स्मार्ट ओळखपत्र दिले जातील. सार्वजनिक जागांवर स्वच्छता दिसून आली नाही तर कार्यालयप्रमुखांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासक यांनी सांगितले.

वॉकीटॉकीचा प्रभावी वापरएका खासगी कंपनीने डेमोसाठी मनपाला १५ वॉकीटॉकी दिले आहेत. याचा वापर घनकचरा, अग्निशमन दलात केला जाईल. स्वच्छतेला सध्या प्राधान्य देण्यात आले असून, कचरा कुठेही अधिक वेळ पडून राहणार नाही. तक्रार येताच पटकन कारवाई केली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न