शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

जायकवाडीच्या मृतसाठ्यातून आता पाणीपुरवठा; धरणात फक्त ७ टक्के पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 18:54 IST

जायकवाडी धरणात मागील वर्षी मे महिन्यात ८ मे रोजी ४८.०४ टक्के पाणीसाठा होता.

पैठण : येथील जायकवाडी धरणातून दररोज १.१६ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असून धरणात सध्या फक्त ७.२७ टक्केच पाणीसाठा राहिला आहे. त्यामुळे यापुढे धरणाच्या मृतसाठ्यातून विविध योजनांसाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

जायकवाडी धरणात मागील वर्षी मे महिन्यात ८ मे रोजी ४८.०४ टक्के पाणीसाठा होता. यावर्षी बुधवारी फक्त ७.२८ टक्के पाणीसाठा राहिला आहे. येणाऱ्या काळात या धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या योजनांना धरणाच्या मृतसाठ्यातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. धरणाच्या ४९ वर्षात केवळ सहा वेळेसच धरण १०० टक्के भरले आहे तर ५० टक्क्यांच्या पुढे १३ वेळेस पाणी धरणात आले आहे. २०१८ मध्येही मृतसाठ्यातून पाणीपुरवठा करण्यात आला होता. आता कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडले जाणार नसून केवळ पिण्यासाठीच पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे, असे शाखा अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच जायकवाडी धरणाचे दोन्ही कालवे बंद करण्यात आले आहेत.

दरम्यान, जायकवाडीतून छत्रपती संभाजीनगर शहर, डीएमआयसी, एमआयडीसी पैठण, वाळूज, चितेगाव, शेंद्रा, बिडकीनसह विविध पाणीपुरवठा योजनांसाठी दररोज ०.२९ दलघमी पाणी उपसा केला जातो. धरणातून दररोज १.१६ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.

यावर्षांमध्ये केला मृतसाठ्यातून पाणीपुरवठा१९७५-७६, ८०-८१, ८६-८७, ८७-८८, ९५-९६, २००१-२००२, २००२-२००३, २००४-२००५, २००९ -२०१०, २०१२-२०१३, २०१५-२०१६, २०१८-२०१९ असे ४९ वर्षात १२ वेळेस मृतसाठ्यातून पाणीपुरवठा करण्यात आला आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद