शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

आता गुन्हेगारांवर बसेल वचक, जिल्ह्यातील ११३ गावांवर २ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कवच

By सुमित डोळे | Updated: October 21, 2023 12:45 IST

पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या प्रयत्नांना यश, दाेन महिन्यांत गावे झाली सतर्क

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ११३ गावांमध्ये ७३४ ठिकाणी २ हजार ७८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यात गावांचे अंतर्गत रस्ते, तालुक्याचे प्रमुख मार्ग, धार्मिक स्थळांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक मनीष कलवानीया यांनी ‘एक सीसीटीव्ही गावासाठी’ हा उपक्रम हाती घेतला होता. सलग एक महिना कलवानीया यांनी मान्यवर, तरुणांशी चर्चा केली. त्यांच्या आवाहनाला जिल्ह्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यासाठी पुढाकार घेतलेल्या नागरिक, ग्रामस्थांचा शुक्रवारी अधीक्षक कार्यालयात विशेष पोलिस महानिरीक्षक चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ही माहिती समोर आली.

कुठल्याही शासकीय यंत्रणेपेक्षा सीसीटीव्ही कॅमेरे चोवीस तास, १२ महिने अहोरात्र सक्रिय असतात. भक्कम पुरावाही देतात. विशेष म्हणजे ते नि:पक्ष असतात. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे हे सुजाण समाजाचे लक्षण आहे. गाव, तालुका पातळीवर आता वाढदिवस, उत्सवामध्ये प्रत्येकाने एक तरी सीसीटीव्ही कॅमेरा गावाला देण्याची मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले.

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांविषयी अपेक्षित जनजागृती नव्हती. ग्रामीण भागातील मिरवणुका, गावातील वाद, विनयभंगासारख्या घटनांमध्ये अनेकदा आरोपी निसटतात. पुराव्याअभावी गुन्हा सिद्ध करण्यात अडचणी येतात. बाजारपेठांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्याप्ती मर्यादित हाेती. त्यामुळे चव्हाण यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. गावांमध्ये पहिल्यांदाच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांविषयी जनजागृती झाली. टवाळखोर, समाजकंटकांमध्ये याचा योग्य संदेश जाईल, असे प्रतिपादन अतिरिक्त अधीक्षक सुनील लांजेवार यांनी केले. यावेळी उपअधीक्षक महेक स्वामी, उपअधीक्षक जयदत्त भवर, दिनेश कोल्हे, पूजा नांगरे यांची उपस्थिती होती.

गुन्हा करण्याआधी गुन्हेगार घाबरेलप्रत्येक ठिकाणी पोलिसांना पोहोचणे शक्य होत नाही. सीसीटीव्ही कॅमेरे पाहून अनेक अनुचित प्रकार घडण्यापासून टळतात. कॅमेरे पाहूनच विनयभंग, वाद, हाणामारी, लूटमार, धार्मिक प्रकरणांत गुन्हा करण्याआधीच गुन्हेगार घाबरतो. गुन्हेगारीला आळा बसून गावे सुरक्षित होतील. हे सुरक्षेचे कवच चिरकाल टिकणारे असेल, असे प्रतिपादन कलवानीया यांनी केले. एखाद्या प्रकरणात पोलिसांना फुटेज हवे असेल तरी कोणालाही त्रास न देता ते घेतले जाईल, असे आश्वासनदेखील त्यांनी ग्रामस्थांना दिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीcctvसीसीटीव्ही