शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता बारावीच्या परीक्षेत घोटाळा; चारशे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षर जुळेना

By विजय सरवदे | Updated: May 10, 2023 15:38 IST

कॉपीमुक्त परीक्षेचे फज्जा; परीक्षा एकाची अन् उत्तरे मात्र दुसऱ्यानेच दिली लिहून

छत्रपती संभाजीनगर : कॉपीमुक्त परीक्षेची टिमकी बजावणाऱ्या बोर्डाचे पितळ उघडे पडले आहे. बारावी परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाच्या सुमारे चारशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत दुसऱ्याचेच हस्ताक्षर असल्याचे आढळून आल्यामुळे विभागीय शिक्षण मंडळ हादरून गेले असून, मंगळवारपासून शिक्षण मंडळाने संबंधित परीक्षार्थी विद्यार्थ्यांची चौकशी सुरू केली आहे.

फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या दहावी-बारावी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची यापूर्वीच विभागीय शिक्षण मंडळात चौकशी झाली. यात दहावीच्या २९ आणि बारावीच्या १०२ कॉपी केसेसमध्ये विद्यार्थी त्यांचे पालक आणि गरज पडलेल्या प्रकरणात केंद्रावरील पर्यवेक्षकांची समितीसमोर सुनावणी झाली.मंगळवारी, ९ मेपासून बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत काही प्रश्नांच्या उत्तरात हस्ताक्षर बदल असलेल्या विद्यार्थ्यांना बोर्डाने चौकशीसाठी बोलाविले होते. यासंदर्भात मॉडरेटरकडून या घटनेबाबत बोर्डाला अहवाल प्राप्त झाला असून, भौतिकशास्त्र विषयाच्याच उत्तरपत्रिकेत हा प्रकार घडला आहे, हे विशेष. दुसरीकडे, बीड आणि हिंगोली या दोनच जिल्ह्यांत सुमारे चारशेहून अधिक उत्तरपत्रिकांत हा प्रकार घडला असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे डोके चक्रावले आहे.

तो मी नव्हेच!ही चौकशी आजपासून १२ मेपर्यंत चालणार आहे. मंगळवारी बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. चौकशीसाठी बोर्डात विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही उपस्थित होते. चौकशी समितीने विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकेत काही उत्तरांत हस्तक्षर बदल कसा झाला, कोणी उत्तरे लिहिली, मास कॉपी झाली का, अशा प्रश्नांची सरबत्ती केली. पण, हा सारा प्रकार आमच्या अपरोक्ष झाला आहे. आमच्या उत्तरपत्रिकेत दुसऱ्याने कोणी व का लिहिले, यामुळे आम्हालाच आश्चर्य वाटत आहे, असा खुलासा अनेक विद्यार्थ्यांनी केला.

गरज पडली तर केंद्रप्रमुखांचीही चौकशीयासंदर्भात विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे यांनी सांगितले की, फक्त बारावी परीक्षेत फक्त भौतिकशास्त्र विषयातच हा गंभीर प्रकार घडल्याचे आमच्या निदर्शनात आले आहे. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार विद्यार्थ्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले. १२ मेपर्यंत दोन जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची चौकशी होईल. विद्यार्थ्यांकडून लेखी म्हणणे घेतले आहे. गरज पडली तर संबंधित केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांनाही चौकशीसाठी बोलाविण्यात येईल. बोर्डाच्या नियमावलीनुसार यासंदर्भात शिक्षेचा निर्णय घेतला जाईल.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद