शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

आता बारावीच्या परीक्षेत घोटाळा; चारशे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षर जुळेना

By विजय सरवदे | Updated: May 10, 2023 15:38 IST

कॉपीमुक्त परीक्षेचे फज्जा; परीक्षा एकाची अन् उत्तरे मात्र दुसऱ्यानेच दिली लिहून

छत्रपती संभाजीनगर : कॉपीमुक्त परीक्षेची टिमकी बजावणाऱ्या बोर्डाचे पितळ उघडे पडले आहे. बारावी परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाच्या सुमारे चारशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत दुसऱ्याचेच हस्ताक्षर असल्याचे आढळून आल्यामुळे विभागीय शिक्षण मंडळ हादरून गेले असून, मंगळवारपासून शिक्षण मंडळाने संबंधित परीक्षार्थी विद्यार्थ्यांची चौकशी सुरू केली आहे.

फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या दहावी-बारावी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची यापूर्वीच विभागीय शिक्षण मंडळात चौकशी झाली. यात दहावीच्या २९ आणि बारावीच्या १०२ कॉपी केसेसमध्ये विद्यार्थी त्यांचे पालक आणि गरज पडलेल्या प्रकरणात केंद्रावरील पर्यवेक्षकांची समितीसमोर सुनावणी झाली.मंगळवारी, ९ मेपासून बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत काही प्रश्नांच्या उत्तरात हस्ताक्षर बदल असलेल्या विद्यार्थ्यांना बोर्डाने चौकशीसाठी बोलाविले होते. यासंदर्भात मॉडरेटरकडून या घटनेबाबत बोर्डाला अहवाल प्राप्त झाला असून, भौतिकशास्त्र विषयाच्याच उत्तरपत्रिकेत हा प्रकार घडला आहे, हे विशेष. दुसरीकडे, बीड आणि हिंगोली या दोनच जिल्ह्यांत सुमारे चारशेहून अधिक उत्तरपत्रिकांत हा प्रकार घडला असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे डोके चक्रावले आहे.

तो मी नव्हेच!ही चौकशी आजपासून १२ मेपर्यंत चालणार आहे. मंगळवारी बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. चौकशीसाठी बोर्डात विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही उपस्थित होते. चौकशी समितीने विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकेत काही उत्तरांत हस्तक्षर बदल कसा झाला, कोणी उत्तरे लिहिली, मास कॉपी झाली का, अशा प्रश्नांची सरबत्ती केली. पण, हा सारा प्रकार आमच्या अपरोक्ष झाला आहे. आमच्या उत्तरपत्रिकेत दुसऱ्याने कोणी व का लिहिले, यामुळे आम्हालाच आश्चर्य वाटत आहे, असा खुलासा अनेक विद्यार्थ्यांनी केला.

गरज पडली तर केंद्रप्रमुखांचीही चौकशीयासंदर्भात विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे यांनी सांगितले की, फक्त बारावी परीक्षेत फक्त भौतिकशास्त्र विषयातच हा गंभीर प्रकार घडल्याचे आमच्या निदर्शनात आले आहे. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार विद्यार्थ्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले. १२ मेपर्यंत दोन जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची चौकशी होईल. विद्यार्थ्यांकडून लेखी म्हणणे घेतले आहे. गरज पडली तर संबंधित केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांनाही चौकशीसाठी बोलाविण्यात येईल. बोर्डाच्या नियमावलीनुसार यासंदर्भात शिक्षेचा निर्णय घेतला जाईल.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद