शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आता सेवा सोसायट्याही सुरू करणार पूरक व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:25 IST

आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे धोरण : पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ९० संस्थांची निवड

रऊफ शेखफुलंब्री : शेतकऱ्यांशी निगडित असलेल्या खरेदी-विक्री संघ व विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने शासनाने पावले उचलली असून, या संस्था पूरक व्यवसाय सुरू करणार आहेत. यासाठी सहकारी विकास महामंडळे व काही वित्तीय संस्था कर्जरूपी मदत करतील. औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ९० संस्था यात भाग घेणार आहेत.ग्रामीण भागात असेलल्या विविध कार्यकारी सेवा सोसायट्या या गाव विकासाचा कणा म्हणून ओळखल्या जातात. यात केवळ शेतकºयांच्या हितासाठी कामकाज होते; परंतु गेल्या काही वर्षांपासून या सहकार संस्थांकडे फारसे लक्ष दिले गेलेले नाही. परिणामी, सहकार संस्था आर्थिकदृष्ट्या डबघाईस आल्या आहेत. शिवाय सोसायटीमधील कार्यरत गटसचिवांचीही वाताहत सुरू असल्याने याचा फटका शेतकºयांना बसत आहे. याला संस्था चालविणारे संचालक मंडळ व सरकार जबाबदार आहे.शासनाच्या नवीन धोरणामुळे आशा वाढल्याराज्य सरकारच्या सहकार व पणन विभागाने काढलेल्या नवीन आदेशानुसार या संस्था सक्षम करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. यासाठी जिल्हा, तालुका व गाव पातळीवर कार्यक्रम घेतले जात आहेत. या संदर्भात शेतकºयांना त्यांच्या गावात जाऊन सहकार विभाग माहिती देताना दिसत आहे. शासनाच्या या नवीन धोरणामुळे सहकार संस्था सक्षम होतील, अशी आशा आहे.१०० टक्के सभासद करणारसहकार संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी प्रथम गावातील सर्व शेतकºयांना सभासद करून घेतले जाणार आहे. त्यांच्यासाठी केवळ दोनशे रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. ही प्रक्रिया प्रत्येक तालुका सहायक निबंधकांकडून सुरू करण्यात आलेली आहे. येत्या वर्षभरात सर्व शेतकरी सहकार संस्थांशी जोडले जातील. प्रत्येक शेतकºयाने आपला व्यवहार संस्थेच्या माध्यमातून करावा, जेणेकरून शेतकरी व संस्था दोघांना याचा लाभ होण्यास मदत होणार आहे.दोन कंपन्या सहभागीशासनाच्या धोरणाला दोन वस्तू उत्पादन कंपन्यांनी सहमती दिली आहे. या कंपन्या आपली विविध प्रकारची उत्पादने सहकारी संस्थांमार्फत माफक दरात विक्री करणार असल्याने याचा फायदा शेतकरी व सहकारी संस्थांना होणार आहे.पहिल्या टप्प्यात ९० संस्था सहभागीसहकार संस्था सक्षमीकरण योजनेत औरंगाबाद जिल्ह्यातील ९० सहकारी सोसायट्या विविध प्रकारचे पूरक व्यवसाय सुरू करणार आहेत. यात रासायनिक, जैविक खतांची विक्री, पशुखाद्य विक्री, कापड विक्री, गांडूळ खत विक्री, तांदूळ विक्री, चहा पावडर विक्री, कृषी औजारे, स्टेशनरी दुकान, पिठाची गिरणी, ट्रॅक्टर भाड्याने देणे, कृषी मालावर प्रक्रिया करून पॅकेजिंग करून विक्री करणे आदी पूरक व्यवसायांचा समावेश आहे. ज्या ९० संस्थांनी यात भाग घेतला त्यातील काही संस्थांनी अनेक व्यवसाय सुरूही केले असून उर्वरित संस्था लवकरच व्यवसाय सुरू करणार आहेत. पूरक व्यवसायामुळे शेतकºयांसह संस्था, सोसायट्या सक्षम होऊन त्यांची आर्थिक भरभराट होण्यास मदत होणार आहे, असे सहायक निबंधक परमेश्वर वरखडे यांनी सांगितले.

टॅग्स :SocialसामाजिकFarmerशेतकरी