शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

आता सेवा सोसायट्याही सुरू करणार पूरक व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:25 IST

आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे धोरण : पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ९० संस्थांची निवड

रऊफ शेखफुलंब्री : शेतकऱ्यांशी निगडित असलेल्या खरेदी-विक्री संघ व विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने शासनाने पावले उचलली असून, या संस्था पूरक व्यवसाय सुरू करणार आहेत. यासाठी सहकारी विकास महामंडळे व काही वित्तीय संस्था कर्जरूपी मदत करतील. औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ९० संस्था यात भाग घेणार आहेत.ग्रामीण भागात असेलल्या विविध कार्यकारी सेवा सोसायट्या या गाव विकासाचा कणा म्हणून ओळखल्या जातात. यात केवळ शेतकºयांच्या हितासाठी कामकाज होते; परंतु गेल्या काही वर्षांपासून या सहकार संस्थांकडे फारसे लक्ष दिले गेलेले नाही. परिणामी, सहकार संस्था आर्थिकदृष्ट्या डबघाईस आल्या आहेत. शिवाय सोसायटीमधील कार्यरत गटसचिवांचीही वाताहत सुरू असल्याने याचा फटका शेतकºयांना बसत आहे. याला संस्था चालविणारे संचालक मंडळ व सरकार जबाबदार आहे.शासनाच्या नवीन धोरणामुळे आशा वाढल्याराज्य सरकारच्या सहकार व पणन विभागाने काढलेल्या नवीन आदेशानुसार या संस्था सक्षम करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. यासाठी जिल्हा, तालुका व गाव पातळीवर कार्यक्रम घेतले जात आहेत. या संदर्भात शेतकºयांना त्यांच्या गावात जाऊन सहकार विभाग माहिती देताना दिसत आहे. शासनाच्या या नवीन धोरणामुळे सहकार संस्था सक्षम होतील, अशी आशा आहे.१०० टक्के सभासद करणारसहकार संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी प्रथम गावातील सर्व शेतकºयांना सभासद करून घेतले जाणार आहे. त्यांच्यासाठी केवळ दोनशे रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. ही प्रक्रिया प्रत्येक तालुका सहायक निबंधकांकडून सुरू करण्यात आलेली आहे. येत्या वर्षभरात सर्व शेतकरी सहकार संस्थांशी जोडले जातील. प्रत्येक शेतकºयाने आपला व्यवहार संस्थेच्या माध्यमातून करावा, जेणेकरून शेतकरी व संस्था दोघांना याचा लाभ होण्यास मदत होणार आहे.दोन कंपन्या सहभागीशासनाच्या धोरणाला दोन वस्तू उत्पादन कंपन्यांनी सहमती दिली आहे. या कंपन्या आपली विविध प्रकारची उत्पादने सहकारी संस्थांमार्फत माफक दरात विक्री करणार असल्याने याचा फायदा शेतकरी व सहकारी संस्थांना होणार आहे.पहिल्या टप्प्यात ९० संस्था सहभागीसहकार संस्था सक्षमीकरण योजनेत औरंगाबाद जिल्ह्यातील ९० सहकारी सोसायट्या विविध प्रकारचे पूरक व्यवसाय सुरू करणार आहेत. यात रासायनिक, जैविक खतांची विक्री, पशुखाद्य विक्री, कापड विक्री, गांडूळ खत विक्री, तांदूळ विक्री, चहा पावडर विक्री, कृषी औजारे, स्टेशनरी दुकान, पिठाची गिरणी, ट्रॅक्टर भाड्याने देणे, कृषी मालावर प्रक्रिया करून पॅकेजिंग करून विक्री करणे आदी पूरक व्यवसायांचा समावेश आहे. ज्या ९० संस्थांनी यात भाग घेतला त्यातील काही संस्थांनी अनेक व्यवसाय सुरूही केले असून उर्वरित संस्था लवकरच व्यवसाय सुरू करणार आहेत. पूरक व्यवसायामुळे शेतकºयांसह संस्था, सोसायट्या सक्षम होऊन त्यांची आर्थिक भरभराट होण्यास मदत होणार आहे, असे सहायक निबंधक परमेश्वर वरखडे यांनी सांगितले.

टॅग्स :SocialसामाजिकFarmerशेतकरी