शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

आता अगदी मनसोक्त करा प्रार्थनास्थळी फुला-फळांची उधळण, तेही मोफत

By साहेबराव हिवराळे | Updated: July 22, 2023 18:55 IST

सामाजिक वनीकरण विभागाचा अनोखा उपक्रम; १ लाख ३५ हजार विविध फळझाडे, फुलझाडांची होणार लागवड

छत्रपती संभाजीनगर : प्रार्थनास्थळांमध्ये जाऊन प्रार्थना करणाऱ्या भाविकांना आता त्या प्रार्थनास्थळीच, प्रार्थनास्थळांच्या ट्रस्टी, विश्वस्तांद्वारे फुलं, पानं, फळं मिळाली तर किती सोयीचे होईल ना? आणि ही सोयदेखील मोफत मिळाली तर कोणाला नकोय? नक्कीच हवीय. ही अफलातून कल्पना प्रत्यक्षात उतरवणार आहे सामाजिक वनीकरण विभाग. यंदा १ लाख ३५ हजार वेगवेगळी फुलझाडं, फळझाडं आणि भारतीय वंशाची विविध झाडं सामाजिक वनीकरण विभागाद्वारे तालुक्यातील प्रार्थनास्थळांना दिली जाणार आहेत.

या अनोख्या उपक्रमातून औरंगाबाद शहर व तालुक्यातील सर्वच प्रार्थनास्थळी १ लाख ३५ हजार झाडं लावली जाणार आहेत. या सर्व झाडांचे संगोपन त्या त्या प्रार्थनास्थळांच्या ट्रस्टींना (विश्वस्तांना), भाविकांना, सामाजिक संस्थांना करण्यास सांगितले जाणार आहे. यासाठी तसे आवाहन करून तसे आश्रयदाते स्वीकारले जाणार आहेत.

कोणती झाडे असणारतुळस, कवठं, बेल, आंबा, पिंपळ, वड, निंब, लिंबू आदी मोठी भारतीय वंशाची झाडं तसेच गुलाब, मोगरा, स्वस्तिक, जाई, जुई, यासारखी काही फुलझाडे दिली जाणार आहेत. यासाठी बेलवन आणि पंचायत वन अशी नावेदेखील सामाजिक वनीकरण विभागाने दिली आहेत. रोपवाटिकांत या वरील उल्लेखलेल्या रोपांव्यतिरिक्त इतरही भारतीय वंशांची झाडे असतील. ही झाडं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बजेट मंजुरीतून उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कुठे होणार निर्मितीयंदा पावसाळा अतिउशिरा सुरू झाला असला तरी औरंगाबाद तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर शहर, तिसगावजवळ सोलापूर हायवेच्या जागेसह साजापूर, कन्नड, सिल्लोड, खुलताबाद, वैजापूर पानगाव, सोयगाव बनोटी आदी ठिकाणी मंदिर तसेच गायरान जागेवर या वनाची निर्मिती केली जाणार आहे. प्रत्यक्षात एक एकरवरील जागेत हे बेलवन व पंचायत वनची निर्मिती केली जाणार आहे. १०० झाडं एका प्रार्थनास्थळाला १०० झाडांची एका प्रार्थनास्थळाच्या बेलवनात आणि पंचायत वनात लागवड केली जाणार आहे. याची जबाबदारी देण्याचेही नियोजन ठरविण्यात येणार आहे. लागवडीपासून ते त्याच्या देखरेख व संगोपनावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

शहर व तालुक्यातील प्रार्थनास्थळांना आवाहनया मोहिमेसाठी शहर व तालुक्यातील सर्वच प्रार्थनास्थळांना ही रोपवन संकल्पना राबविता येणार आहे. त्यांना या निमित्ताने सामाजिक वनीकरण विभागाशी संपर्क साधून झाडं मिळवावी लागणार आहेत. बेलवन व पंचायत वन अशा दोन संकल्पना राबविण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग जनजागृती करत आहे. परंतु, सामाजिक सेवाभावी संस्थांनी स्वत:हून या उपक्रमात सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी कसा करता येईल, यासाठी विभागातर्फे प्रयत्न करण्यात येत आहे.- कीर्ती जमधडे, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादforestजंगलenvironmentपर्यावरण