शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

आता अगदी मनसोक्त करा प्रार्थनास्थळी फुला-फळांची उधळण, तेही मोफत

By साहेबराव हिवराळे | Updated: July 22, 2023 18:55 IST

सामाजिक वनीकरण विभागाचा अनोखा उपक्रम; १ लाख ३५ हजार विविध फळझाडे, फुलझाडांची होणार लागवड

छत्रपती संभाजीनगर : प्रार्थनास्थळांमध्ये जाऊन प्रार्थना करणाऱ्या भाविकांना आता त्या प्रार्थनास्थळीच, प्रार्थनास्थळांच्या ट्रस्टी, विश्वस्तांद्वारे फुलं, पानं, फळं मिळाली तर किती सोयीचे होईल ना? आणि ही सोयदेखील मोफत मिळाली तर कोणाला नकोय? नक्कीच हवीय. ही अफलातून कल्पना प्रत्यक्षात उतरवणार आहे सामाजिक वनीकरण विभाग. यंदा १ लाख ३५ हजार वेगवेगळी फुलझाडं, फळझाडं आणि भारतीय वंशाची विविध झाडं सामाजिक वनीकरण विभागाद्वारे तालुक्यातील प्रार्थनास्थळांना दिली जाणार आहेत.

या अनोख्या उपक्रमातून औरंगाबाद शहर व तालुक्यातील सर्वच प्रार्थनास्थळी १ लाख ३५ हजार झाडं लावली जाणार आहेत. या सर्व झाडांचे संगोपन त्या त्या प्रार्थनास्थळांच्या ट्रस्टींना (विश्वस्तांना), भाविकांना, सामाजिक संस्थांना करण्यास सांगितले जाणार आहे. यासाठी तसे आवाहन करून तसे आश्रयदाते स्वीकारले जाणार आहेत.

कोणती झाडे असणारतुळस, कवठं, बेल, आंबा, पिंपळ, वड, निंब, लिंबू आदी मोठी भारतीय वंशाची झाडं तसेच गुलाब, मोगरा, स्वस्तिक, जाई, जुई, यासारखी काही फुलझाडे दिली जाणार आहेत. यासाठी बेलवन आणि पंचायत वन अशी नावेदेखील सामाजिक वनीकरण विभागाने दिली आहेत. रोपवाटिकांत या वरील उल्लेखलेल्या रोपांव्यतिरिक्त इतरही भारतीय वंशांची झाडे असतील. ही झाडं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बजेट मंजुरीतून उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कुठे होणार निर्मितीयंदा पावसाळा अतिउशिरा सुरू झाला असला तरी औरंगाबाद तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर शहर, तिसगावजवळ सोलापूर हायवेच्या जागेसह साजापूर, कन्नड, सिल्लोड, खुलताबाद, वैजापूर पानगाव, सोयगाव बनोटी आदी ठिकाणी मंदिर तसेच गायरान जागेवर या वनाची निर्मिती केली जाणार आहे. प्रत्यक्षात एक एकरवरील जागेत हे बेलवन व पंचायत वनची निर्मिती केली जाणार आहे. १०० झाडं एका प्रार्थनास्थळाला १०० झाडांची एका प्रार्थनास्थळाच्या बेलवनात आणि पंचायत वनात लागवड केली जाणार आहे. याची जबाबदारी देण्याचेही नियोजन ठरविण्यात येणार आहे. लागवडीपासून ते त्याच्या देखरेख व संगोपनावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

शहर व तालुक्यातील प्रार्थनास्थळांना आवाहनया मोहिमेसाठी शहर व तालुक्यातील सर्वच प्रार्थनास्थळांना ही रोपवन संकल्पना राबविता येणार आहे. त्यांना या निमित्ताने सामाजिक वनीकरण विभागाशी संपर्क साधून झाडं मिळवावी लागणार आहेत. बेलवन व पंचायत वन अशा दोन संकल्पना राबविण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग जनजागृती करत आहे. परंतु, सामाजिक सेवाभावी संस्थांनी स्वत:हून या उपक्रमात सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी कसा करता येईल, यासाठी विभागातर्फे प्रयत्न करण्यात येत आहे.- कीर्ती जमधडे, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादforestजंगलenvironmentपर्यावरण