शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
2
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
3
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
4
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
5
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
6
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
7
Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन
8
जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
9
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
10
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
11
सोनं, चांदी, रोख रक्कम नाही तर हुंड्यात मागितली किडनी, नकार दिला तेव्हा...
12
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!
13
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
14
Austria Shooting: बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा मृत्यू, स्वतःलाही संपवलं
15
ICICI आणि HDFC बँकेचा ग्राहकांना धक्का! एका निर्णयामुळे होणार लाखो रुपयांचे नुकसान?
16
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
17
Inspirational: 'या' तीन गोष्टी आजपासून फॉलो करा, पाच वर्षांनी लोक तुम्हाला फॉलो करतील!
18
भारतीयांनी ज्या देशाला 'बॉयकॉट' केलं, त्याचीच ग्लोबल ब्रँड अँबेसिडर बनली कतरिना कैफ
19
अनिल अंबानींच्या कंपनीनं तोडला १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, एकाच महिन्यात कमावले हजारो कोटी

आता अगदी मनसोक्त करा प्रार्थनास्थळी फुला-फळांची उधळण, तेही मोफत

By साहेबराव हिवराळे | Updated: July 22, 2023 18:55 IST

सामाजिक वनीकरण विभागाचा अनोखा उपक्रम; १ लाख ३५ हजार विविध फळझाडे, फुलझाडांची होणार लागवड

छत्रपती संभाजीनगर : प्रार्थनास्थळांमध्ये जाऊन प्रार्थना करणाऱ्या भाविकांना आता त्या प्रार्थनास्थळीच, प्रार्थनास्थळांच्या ट्रस्टी, विश्वस्तांद्वारे फुलं, पानं, फळं मिळाली तर किती सोयीचे होईल ना? आणि ही सोयदेखील मोफत मिळाली तर कोणाला नकोय? नक्कीच हवीय. ही अफलातून कल्पना प्रत्यक्षात उतरवणार आहे सामाजिक वनीकरण विभाग. यंदा १ लाख ३५ हजार वेगवेगळी फुलझाडं, फळझाडं आणि भारतीय वंशाची विविध झाडं सामाजिक वनीकरण विभागाद्वारे तालुक्यातील प्रार्थनास्थळांना दिली जाणार आहेत.

या अनोख्या उपक्रमातून औरंगाबाद शहर व तालुक्यातील सर्वच प्रार्थनास्थळी १ लाख ३५ हजार झाडं लावली जाणार आहेत. या सर्व झाडांचे संगोपन त्या त्या प्रार्थनास्थळांच्या ट्रस्टींना (विश्वस्तांना), भाविकांना, सामाजिक संस्थांना करण्यास सांगितले जाणार आहे. यासाठी तसे आवाहन करून तसे आश्रयदाते स्वीकारले जाणार आहेत.

कोणती झाडे असणारतुळस, कवठं, बेल, आंबा, पिंपळ, वड, निंब, लिंबू आदी मोठी भारतीय वंशाची झाडं तसेच गुलाब, मोगरा, स्वस्तिक, जाई, जुई, यासारखी काही फुलझाडे दिली जाणार आहेत. यासाठी बेलवन आणि पंचायत वन अशी नावेदेखील सामाजिक वनीकरण विभागाने दिली आहेत. रोपवाटिकांत या वरील उल्लेखलेल्या रोपांव्यतिरिक्त इतरही भारतीय वंशांची झाडे असतील. ही झाडं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बजेट मंजुरीतून उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कुठे होणार निर्मितीयंदा पावसाळा अतिउशिरा सुरू झाला असला तरी औरंगाबाद तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर शहर, तिसगावजवळ सोलापूर हायवेच्या जागेसह साजापूर, कन्नड, सिल्लोड, खुलताबाद, वैजापूर पानगाव, सोयगाव बनोटी आदी ठिकाणी मंदिर तसेच गायरान जागेवर या वनाची निर्मिती केली जाणार आहे. प्रत्यक्षात एक एकरवरील जागेत हे बेलवन व पंचायत वनची निर्मिती केली जाणार आहे. १०० झाडं एका प्रार्थनास्थळाला १०० झाडांची एका प्रार्थनास्थळाच्या बेलवनात आणि पंचायत वनात लागवड केली जाणार आहे. याची जबाबदारी देण्याचेही नियोजन ठरविण्यात येणार आहे. लागवडीपासून ते त्याच्या देखरेख व संगोपनावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

शहर व तालुक्यातील प्रार्थनास्थळांना आवाहनया मोहिमेसाठी शहर व तालुक्यातील सर्वच प्रार्थनास्थळांना ही रोपवन संकल्पना राबविता येणार आहे. त्यांना या निमित्ताने सामाजिक वनीकरण विभागाशी संपर्क साधून झाडं मिळवावी लागणार आहेत. बेलवन व पंचायत वन अशा दोन संकल्पना राबविण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग जनजागृती करत आहे. परंतु, सामाजिक सेवाभावी संस्थांनी स्वत:हून या उपक्रमात सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी कसा करता येईल, यासाठी विभागातर्फे प्रयत्न करण्यात येत आहे.- कीर्ती जमधडे, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादforestजंगलenvironmentपर्यावरण