शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

पर्यटन नगरी औरंगाबादहून आता दुबई कनेक्टिव्हिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 12:44 IST

इंडिगोचे विमान देणार हवाईसेवा

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात मुंबईमार्गे सेवाथेट विमानसेवेसाठीही पाठपुरावापर्यटन आणि उद्योगवाढीला हातभार लागेल

औरंगाबाद : औरंगाबादहून अखेर बहुप्रतीक्षित ‘इंडिगो’ची ५ फेब्रुवारीपासून विमानसेवा सुरू होत आहे. मुंबईसाठी सकाळच्या वेळेत या कंपनीकडून विमानसेवा सुरू केली जात आहे. मुंबईमार्गे इंडिगोकडून दुबईसाठी सेवा दिली जाणार आहे. त्यामुळे औरंगाबादहून दुबईला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सुविधा होणार आहे.

दीड वर्षापूर्वी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून औरंगाबाद ते थेट दुबई विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव ‘फ्लाय दुबई’ने दिलेला आहे. फ्लाय दुबईने केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या सचिवांना वर्षभरापूर्वी हा प्रस्ताव सादर केला होता. पर्यटन आणि उद्योगाच्या दृष्टीने ही विमानसेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. औरंगाबादसह नागपूर, पुणे ही शहरे दुबई आणि भारत यांच्यातील विमानसेवा कराराबाहेरील आहेत; परंतु विशेष बाब म्हणून या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या विमानसेवांमुळे रोजगारदेखील उपलब्ध होईल. पर्यटन आणि उद्योगवाढीला हातभार लागेल. दुबईत राहणाऱ्या महाराष्ट्रातील रहिवाशांना थेट कनेक्टिव्हिटी मिळेल, असे प्रस्तावात नमूद केले होते; परंतु या विमानसेवेची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यासाठी प्राधिकरणाकडून पाठपुरावा केला जात आहे.हा पाठपुरावा होताना इंडिगोकडून आता कनेक्टिटिंग फ्लाईटद्वारे औरंगाबाद शहर दुबईशी जोडले जाणार आहे. किमान कनेक्टिंग फ्लाईटने का होईना, औरंगाबाद दुबईशी हवाई सेवेने जोडले जाणार असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

शहरातील प्रवाशांची सुविधामुंबईमार्गे इंडिगोकडून सेवा दिली जात आहे. औरंगाबादहून दुबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी फायदा होईल. शहरातून सकाळी मुंबईला जाऊन दुबईला जाणे शक्य होईल, असे विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDubaiदुबईairplaneविमान