शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आता औरंगाबादच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात असणार एक कम्युनिटिंग अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 16:14 IST

जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विविध उपक्रम हाती घेतले असून, याअंतर्गत शहरातील प्रत्येक ठाण्यात कम्युनिटी पोलिसिंगसाठी एका पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केली.

औरंगाबाद : जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विविध उपक्रम हाती घेतले असून, याअंतर्गत शहरातील प्रत्येक ठाण्यात कम्युनिटी पोलिसिंगसाठी एका पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केली. या कम्युनिटी पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी गुरुवारी बैठक घेऊन त्यांना विविध सूचना केल्या. 

पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी शहर पोलिसांनी कम्युनिटी पोलिसिंगवर भर द्यावा, असे आदेशित केले आहे. एवढेच नव्हे तर शहरातील १७ पोलीस ठाण्यांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे १७ पोलीस उपनिरीक्षकांना कम्युनिटी पोलीस अधिकारी म्हणून काम पाहण्याचे आदेश दिले. कम्युनिटी पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध जाती-धर्माच्या लोकांच्या बैठका घेणे, त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आदेश गुरुवारी झालेल्या बैठकीत देण्यात आले.

पोलीस अधिकाऱ्यांच्या विविध स्तरावर ओळखी असतात. या ओळखीतून बेरोजगारांना नोकरी मिळवून देणे, व्यवसाय करण्यासाठी त्यांना बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देणे, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणे, कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत त्यांना  व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणे, आदी कामे आता कम्युनिटी पोलीस अधिकाऱ्यांना करावी लागणार आहेत. मनपा अथवा अन्य सरकारी कार्यालयाने अडवून धरलेली कायदेशीर कामे  संबंधित अधिकाऱ्यांकडून करून घेण्यासाठी हे अधिकारी पुढाकार घेणार आहेत. 

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादSocialसामाजिक