शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

आता कुठे बदलाचे वातावरण तयार होत आहे : जयंत पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 19:16 IST

आता कुठे बदलाचे वातावरण तयार होत आहे. लोक पर्याय शोधताहेत आणि भविष्यकाळ निधर्मी विचारांना पाठिंबा देणारा असेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 

औरंगाबाद : आता कुठे बदलाचे वातावरण तयार होत आहे. लोक पर्याय शोधताहेत आणि भविष्यकाळ निधर्मी विचारांना पाठिंबा देणारा असेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार पाटील यांच्या हस्ते मसापच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मधुकरअण्णा मुळे यांना मंगळवारी देण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

त्यांनी सांगितले की, आज तरुण पिढी शिक्षणापेक्षा धर्माकडे अधिक ओढली जाते आहे. धर्माधर्मांत तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. राज्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्यानंतर हे घडत असते. दंगली होणार नाहीत, शांतता राहील, असा विश्वास निर्माण करू शकलो, तर आपल्या देशातही विदेशी गुंतवणूक होऊ शकते. हातांना आज काम नाही. त्यामुळे तो आरक्षणासाठी आग्रही दिसतोय. त्यासाठी लाखोंचे मोर्चे निघू लागले आहेत. 

‘नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यासारख्या विचारवंतांच्या हत्या ज्या तरुणांनी केल्या ते तरुण पाहिल्यानंतर आणि अलीकडे नालासोपाऱ्यात ज्या तरुणकडे शस्त्रास्त्रे सापडली त्यावरून असे लक्षात येते की, अशा धाडसाला कुठेतरी पाठबळ मिळतेय. दाभोलकर यांच्या हत्येच्या कटाची पाळेमुळे जालन्यात सापडतात, हे सारेच आश्चर्यजनक असल्याचे ते म्हणाले. पेट्रोलचे दर शंभरच्या वर केल्याशिवाय यांना झोप लागणार नाही, असा टोलाही राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी लगावला. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण