शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आता मुलींचे ९ वे वर्ष काळजी करण्याचे, वयात येण्याचे वय १६ वर्षांवरून आले खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2021 19:08 IST

जीवनशैलीतील बदलाबरोबर सोशल मीडियाच्या प्रभावामुळे ही हार्मोन्समध्ये बदल होत आहे.

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : पहिली मासिक पाळी येणे, हा कोणत्याही मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतो. पहिली मासिक पाळी आल्यानंतर मुलगी वयात आली, असे म्हटले जाते. साधारणपणे वयाच्या १६ व्या वर्षी पहिली मासिक पाळी येते. परंतु गेल्या काही वर्षांत बदलती जीवनशैली, केमिकलयुक्त आहाराचा समावेश, वाढते वजन आणि या सगळ्यातून हार्मोन्समध्ये होणारे बदलाने मासिक पाळी येण्याचे वय कमी होत आहे. अगदी इयत्ता चौथीत म्हणजे वयाच्या ९ व्या वर्षी पाळी आल्याचे निरीक्षण घाटीतील तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

अशा ९ ते १६ वयोगटातील मुलींचे घाटीतील अर्श क्लिनिकद्वारे मासिक पाळी संदर्भात समुपदेशन केले जात आहे. आहार आणि बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर वेगवेगळा परिणाम होत आहे. मासिक पाळी येण्याच्या बाबतीत गेल्या काही वर्षात बदल होत आहे. कमी वयातच येणाऱ्या पाळीमुळे लहान वयातच मुलींची शारीरिक वाढ जलद गतीने होते. मात्र त्यांची मानसिक आणि भावनिक समज सक्षम होत नाही. शिवाय प्रत्येक मुलींना वेगवेगळ्या वयात पाळी येते. त्यामुळे ‘ माझ्या मैत्रिणीला असे काही होत नाही, मला का ? ’ असा प्रश्न पडतो. अशा वेळी आईची मोठी जबाबदारी ठरते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

खेळण्या- बागडण्याच्या वयात मासिक पाळीसाधारणपणे वयाच्या १६ वर्षी पहिल्यांदा पाळी येते. मात्र, अलिकडे अनेकांना इयत्ता चौथीत असताना म्हणजे वयाच्या ९ व्या वर्षीच पाळी येत असल्याचे पहायला मिळते. जीवनशैलीतील बदलाबरोबर सोशल मीडियाच्या प्रभावामुळे ही हार्मोन्समध्ये बदल होत आहे. त्यातूनच खेळण्या-बागडण्याच्या वयात मासिक पाळी आल्याने मुलींना नैराश्य येते. कारण तिच्या बरोबरच्या मुलींना तसे झालेले नसते. अशांचे घाटीत अर्श क्लिनिकद्वारे समुपदेशन केले जाते.- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख

जीवनशैलीत बदलाचा परिणामपूर्वी १६ वर्षी मुलींना मासिक पाळी येत असे. परंतु बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, केमिकलयुक्त पदार्थांचा आहारात होणारा समावेश इ. कारणांनी हार्मोन्समध्ये बदल होतो. त्यामुळे मासिक पाळी येण्याचे वय अलीकडे कमी झाले आहे.- डाॅ. निलेश लोमटे, मधुमेह व हार्मोन्स तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद