शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

आपत्ती व्यवस्थापन विभागास खंडपीठाची नोटीस

By admin | Updated: February 17, 2016 00:43 IST

औरंगाबाद : दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्या सुरू करण्यासंदर्भात शासनाने २०१५ साली घेतलेला निर्णय रद्द करावा.

औरंगाबाद : दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्या सुरू करण्यासंदर्भात शासनाने २०१५ साली घेतलेला निर्णय रद्द करावा. त्याऐवजी प्रत्येक गावात चारा डेपो सुरू करून जनावरांना दावणीवर चारा उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती करणारी याचिका खंडपीठात यापूर्वीच दाखल करण्यात आली आहे. त्या याचिकेवर सोमवारी न्या. एस.व्ही. गंगापूरवाला व न्या. ए.एम. बदर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाला नोटीस बजाविण्याचा आदेश दिला. पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर होईल.सोमवारी उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खंडपीठात शपथपत्र दाखल केले. त्यात त्यांनी म्हटल्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात ७९ चारा छावण्या सुरू केल्या आहेत. आवश्यकतेनुसार पुढेही चारा छावण्या सुरू करण्यात येतील. चारा छावण्यांची ही योजना केंद्र शासनाची आहे. यासाठीचा आर्थिक पुरवठा केंद्र शासनाचा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग करतोे. त्यामुळे त्या विभागाला प्रतिवादी करण्याची मुभा खंडपीठाने दिली.शासनाने बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील टंचाईग्रस्त भागात अंतरिम पर्याय म्हणून २० आॅगस्ट २०१५ रोजी चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. उस्मानाबाद जिल्ह्यात केवळ तीन चारा छावण्या सुरू करण्यात आल्या. अंतरामुळे शेतकऱ्यांना जनावरे छावणीमध्ये नेणे शक्य नाही. प्रत्येक गावात चारा छावण्या सुरू कराव्यात यासाठी शामराव देशमुख यांनी याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. आर.पी. भूमकर, अ‍ॅड. विश्वनाथ भूमकर, अ‍ॅड. महेश धपाटे, तर राज्य सरकारतर्फे सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे आणि केंद्र शासनातर्फे अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल संजीव देशपांडे काम पाहत आहेत.