शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आम्हाला काही होत नाही, असे म्हणून दुखणे अंगावर काढू नका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:05 IST

औरंगाबाद : शहरापेक्षा ग्रामीणची लोकसंख्या दुप्पट आहे. तपासणी वाढवल्याने रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. तो आकडा शहरापेक्षा अधिक ...

औरंगाबाद : शहरापेक्षा ग्रामीणची लोकसंख्या दुप्पट आहे. तपासणी वाढवल्याने रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. तो आकडा शहरापेक्षा अधिक असला तरी हा स्ट्रॅटेजीचा भाग आहे. तपासणी वाढवून बाधितांना शोधून त्यांना वेळेवर उपचार देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. कोरोनाचे संक्रमण केवळ वयस्कांनाच नाही तर युवक, बालकांतही मोठ्या प्रमाणावर होतेय. आम्हाला काही होत नाही म्हणून दुखणे अंगावर काढू नका आणि निर्बंधांचे पालन करून नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्क व हाताच्या स्वच्छतेवर लक्ष द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी केले.

गेल्या आठवडाभरात कोरोनाचे संक्रमण शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक दिसून येत आहे. असे का होते आहे याविषयी डाॅ. गोंदावले म्हणाले, अंशतः लाॅकडाऊन, ब्रेक द चेन या काळात निर्बंध अधिक कडक असतानाच्या काळात जास्तीत जास्त रुग्णांचा शोध घेऊन वेळेवर उपचार देण्याची स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे रुग्णांचा आकडा वाढलेला दिसत असला तरी त्या तुलनेत ग्रामीणमध्ये १७ डीसीएचसी सुरू करण्यात आल्या. योग्य उपचार योग्य वेळी सुरू करण्यासाठी ग्रामीण डाॅक्टरांचे आज प्रशिक्षण घेतले. कोविड केअर सेंटरमध्येही आवश्यकतेपेक्षा अधिक खाटांची उपलब्धता आहे. याशिवाय होम आयसोलेशनमध्येही उपचार रुग्णांना ग्रामीण भागात दिले जात आहेत. जेणेकरून ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात यावे लागणार नाही. याशिवाय कोरोना रोखण्यासाठी नागरिकांत जनजागृती करण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केला. त्यानुसार ग्रामदक्षता समित्यांच्या माध्यमातून लसीकरणाला गती दिली. लसींच्या पुरवठ्यात अडचणी आल्या, तो प्रश्नही लवकरच सुरळीत होईल. सध्या २० टक्के लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसूत्रीसोबत जागरुक राहून प्रशासनाला सहकार्य करावे.

----

बाहेरून आलेल्यांची माहिती द्या

गावात बाहेरगावाहून आलेले. बाधितांच्या संपर्कातील, कुंभमेळ्याहून आलेल्यांची माहिती प्रशासनाला देऊन त्या नागरिकांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. हे जागरूक ग्रामस्थांच्या मदतीनेच शक्य होईल. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. दुसऱ्या लाटेत केवळ वयस्क नव्हे, तर युवक आणि बालकांतही संसर्ग होतोय. तरीही मुले ट्रिपलसीट फिरताहेत. घोळक्यात खेळताहेत. आम्हाला काही होत नाही ही मानसिकता बदलून कोरोनाकडे गांभीर्याने बघायला हवे, असे डाॅ. गोंदावले म्हणाले.

---

तालुक्यातील अधिकारी म्हणतात.....

ग्रामीण भागातील रुग्ण तपासणी करून घेण्यासाठी लवकर येत नाहीत. पाच ते सहा दिवस खासगी डॉक्टरांकडे उपचार घेऊन दुखणे अंगावर काढतात. शेवटी तपासणीसाठी येतात. अशावेळी रुग्ण पॉझिटिव्ह येतो. मात्र पाच-सहा दिवसांत संपर्क आल्याने अख्खे कुटुंब पॉझिटिव्ह निघते, अशा पद्धतीने ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढत आहे.

- डॉ. हेमंत गावंडे, तालुका आरोग्य अधिकारी, कन्नड

--

सामाजिक अंतर न पाळल्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. शासनाने कडक निर्बंध लादूनही नागरिक नियम पाळत नाहीत. मास्कचा वापर न करणे, तसेच हात धुण्यासारखे साधे उपायही नागरिक विसरले आहेत. नागरिकांनी शासनाचे नियम न पाळल्याने, गर्दी वाढल्याने, तसेच वारंवार हात न धुता वावरल्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत.

- डॉ. गजानन टारपे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, वैजापूर

---

दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर असून दुप्पट वेगाने पसरत आहे. शिवाय 'कम्युनिटी स्प्रेड'मुळे व नागरिकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्याने तालुक्यात रुग्णवाढ होत आहे. कडक निर्बंधांची अंमलबजावणी होत असून रुग्णवाढ लवकरच आटोक्यात येईल.

- सारिका शिंदे, प्रभारी तहसीलदार, गंगापूर