शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

गुजरातसारखी स्थिती नाही, राज्यातील औद्योगिक वीजपुरवठा सुरळीत : नितीन राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 19:05 IST

अधिकची वीज येत्या आठवडाभरामध्ये उपलब्ध होण्याची शक्यता

औरंगाबाद : विजेचे संकट संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेले आहे आणि यास कारणीभूत म्हणजे कोळशाचा अपुरा पुरवठा. यामुळे आंध्र प्रदेश सरकारने ५० टक्के वीज कपातीचे धोरण अवलंबिले आहे. गुजरात राज्यात औद्योगिक ग्राहकांसाठी आठवड्यातून एक दिवस वीजपुरवठा न करण्याचे धोरण राबवत आहे. सुदैवाने अशी वेळ महाराष्ट्रावर अजूनही आलेली नाही, असे ऊर्जामंत्री डाॅ.नितीन राऊत म्हणाले.

डाॅ.राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेतली. उपलब्ध विजेचे वितरण कार्यक्षम होण्यासाठी दक्षता बाळगणे, विजेची चोरी थांबविणे, अतिभारित विद्युत वाहिन्या व रोहित्रांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, या बाबींमुळे लोडशेडिंग होणार नाही, यासाठी सक्त ताकीद डाॅ.राऊत यांनी दिली. मंत्रिमंडळाने टाटाच्या गुजरातमधील वीजनिर्मिती प्रकल्पातून ७६० मेगावॅट वीज विकत घेण्यासाठी मान्यता दिलेली आहे. ही अधिकची वीज येत्या आठवडाभरामध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तेव्हा सध्या जे विजेचे भारनियमन होत आहे, त्याला आळा बसेल. जनतेचे शंकानिरसन व्हावे, यासाठी २४ तास चालेल, अशा नियंत्रण कक्षाची स्थापना करावी, ज्यामुळे जनतेला योग्य खरी माहिती मिळेल व गैरसमज पसरणार नाही, असे डाॅ.राऊत म्हणाले.

विजेची चोरी करू नकानागरिकांनी विजेचा वापर अत्यंत काटकसरीने करावा. वेळेवर वीजबिल भराव आणि विजेची चोरी करू नये, असे आवाहन डाॅ.राऊत यांनी केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNitin Rautनितीन राऊतelectricityवीज