शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

एकही दगड आदित्य ठाकरेंच्या गाडीवर फेकला गेला नाहीः औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 14:06 IST

आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद कार्यक्रमात डीजे बंद करण्यावरून राडा

औरंगाबाद: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मंगळवारी शिवसंवाद कार्यक्रमासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे आले असता. डिजे बंद केल्याच्या कारणावरून वाद झाल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. मात्र, ग्रामीण पोलिसांनी याबाबत खुलासा करून दगडफेकीचा आरोप फेटाळला आहे. 

ठाकरे गटाच्या युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सातव्या शिवसंवाद यात्रेनिमित्त मंगळवारी सायंकाळी नाशिक जिल्ह्यातून औरंगाबादच्या दौऱ्यावर आले. वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे त्यांचा शिवसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते. कार्यक्रम स्थळापासून हाकेच्या अंतरावर रमाबाई आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रम सुरू होता. कार्यकर्ते डी.जे.लावून जयंती उत्सव साजरा करीत होते. या डि.जे.चा आदित्य यांच्या भाषणाला अडथळा येत असल्याचे पाहून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी डी.जे. बंद करायला लावला. यातून वाद झाला.यानंतर हा वाद चिघळला. हे लक्षात येताच आदित्य यांनी स्टेजवरून उतरून उपस्थितांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी शिवशक्ती, भिमशक्ती यांची युती झाली आहे. मी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला डी.जे. वाजवायचा असेल तर वाजवा, असे म्हणाले. मात्र डि.जे. बंद केल्याने तेथे गदारोळ झाला. यावेळी तणाव वाढत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी कडक बंदोबस्तात आदित्य यांचा ताफा महालगावातून बाहेर काढला. यावेळी काहीजण या ताफ्यावर धावून आले. यावेळी दगडफेक झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. 

एकही दगड फेकला गेला नाहीयाबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस उपअधीक्षक सुनिल लांजेवार म्हणाले की, महालगाव येथील आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यावर त्यांचा ताफा निघाला असताना काही प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यात एक माध्यम प्रतिनिधी किरकोळ जखमी झाला आहे. परंतु यावेळी दगडफेक झाली नाही. सभेत किंवा आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर एकही दगड फेकण्यात आला नसल्याचा दावाही ग्रामीण पोलिसांनी केला आहे.

काही अडचण आली असेल तर माफी मागतोया साऱ्या प्रकारावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मी माईकवर बोललो, काही कारणास्तव साऊंड बंद झाला असेल. एकमेकांना समजून घ्यावे लागते. मी माईकवर माफीही मागितली. संविधानाच्या रक्षणासाठी शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आलीय. काही अडचण आली असेल तर माफी मागतो. पण एवढे मोठे कारण नाही. डीजे ५-१० मिनिटांसाठी बंद केला असेल. पण मी माईकवर सांगितले डिजे चालू द्या, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

अंबादास दानवेंचं पोलीस महासंचालकांना खरमरीत पत्रआदित्य ठाकरे यांची शिवासंवाद यात्रा औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील महालगाव मंगळवारी होती. तेव्हा तेथील ग्राम सचिवालयासमोरील मैदानावर सभा सुरू असताना तिथे अज्ञात जमावाकडून दगड मारण्यात आला. तसेच सभा संपवून तिथून निघतानाही आदित्य ठाकरे यांच्या कारवर दगड मारण्यात आले. तसेच सभेच्या ठिकाणी हिंसक जमाव चाल करून आला. सदर प्रकरणात सुरक्षेमध्ये अक्षम्य कसूर झाली आहे. त्याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी मागणी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना