शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

एकही दगड आदित्य ठाकरेंच्या गाडीवर फेकला गेला नाहीः औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 14:06 IST

आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद कार्यक्रमात डीजे बंद करण्यावरून राडा

औरंगाबाद: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मंगळवारी शिवसंवाद कार्यक्रमासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे आले असता. डिजे बंद केल्याच्या कारणावरून वाद झाल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. मात्र, ग्रामीण पोलिसांनी याबाबत खुलासा करून दगडफेकीचा आरोप फेटाळला आहे. 

ठाकरे गटाच्या युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सातव्या शिवसंवाद यात्रेनिमित्त मंगळवारी सायंकाळी नाशिक जिल्ह्यातून औरंगाबादच्या दौऱ्यावर आले. वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे त्यांचा शिवसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते. कार्यक्रम स्थळापासून हाकेच्या अंतरावर रमाबाई आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रम सुरू होता. कार्यकर्ते डी.जे.लावून जयंती उत्सव साजरा करीत होते. या डि.जे.चा आदित्य यांच्या भाषणाला अडथळा येत असल्याचे पाहून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी डी.जे. बंद करायला लावला. यातून वाद झाला.यानंतर हा वाद चिघळला. हे लक्षात येताच आदित्य यांनी स्टेजवरून उतरून उपस्थितांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी शिवशक्ती, भिमशक्ती यांची युती झाली आहे. मी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला डी.जे. वाजवायचा असेल तर वाजवा, असे म्हणाले. मात्र डि.जे. बंद केल्याने तेथे गदारोळ झाला. यावेळी तणाव वाढत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी कडक बंदोबस्तात आदित्य यांचा ताफा महालगावातून बाहेर काढला. यावेळी काहीजण या ताफ्यावर धावून आले. यावेळी दगडफेक झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. 

एकही दगड फेकला गेला नाहीयाबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस उपअधीक्षक सुनिल लांजेवार म्हणाले की, महालगाव येथील आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यावर त्यांचा ताफा निघाला असताना काही प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यात एक माध्यम प्रतिनिधी किरकोळ जखमी झाला आहे. परंतु यावेळी दगडफेक झाली नाही. सभेत किंवा आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर एकही दगड फेकण्यात आला नसल्याचा दावाही ग्रामीण पोलिसांनी केला आहे.

काही अडचण आली असेल तर माफी मागतोया साऱ्या प्रकारावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मी माईकवर बोललो, काही कारणास्तव साऊंड बंद झाला असेल. एकमेकांना समजून घ्यावे लागते. मी माईकवर माफीही मागितली. संविधानाच्या रक्षणासाठी शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आलीय. काही अडचण आली असेल तर माफी मागतो. पण एवढे मोठे कारण नाही. डीजे ५-१० मिनिटांसाठी बंद केला असेल. पण मी माईकवर सांगितले डिजे चालू द्या, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

अंबादास दानवेंचं पोलीस महासंचालकांना खरमरीत पत्रआदित्य ठाकरे यांची शिवासंवाद यात्रा औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील महालगाव मंगळवारी होती. तेव्हा तेथील ग्राम सचिवालयासमोरील मैदानावर सभा सुरू असताना तिथे अज्ञात जमावाकडून दगड मारण्यात आला. तसेच सभा संपवून तिथून निघतानाही आदित्य ठाकरे यांच्या कारवर दगड मारण्यात आले. तसेच सभेच्या ठिकाणी हिंसक जमाव चाल करून आला. सदर प्रकरणात सुरक्षेमध्ये अक्षम्य कसूर झाली आहे. त्याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी मागणी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना