शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

शहरातील एकही रस्ता, चौक नाही टाऊन प्लॅनिंगच्या चौकटीत; वाहतुकीचा झाला बट्ट्याबोळ

By विकास राऊत | Updated: December 15, 2023 12:15 IST

पाच ते दहा लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी संपूर्ण शहर वेठीस धरले आहे, त्यामुळे शहराचे नुकसान होत आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एकही रस्ता किंवा चौक टाऊन प्लॅनिंगच्या नियमांच्या चौकटीत तयार केलेला नाही. ते निर्माण करताना नियोजनाचा अभाव असल्याचे मत व्यक्त करीत महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी पालिका प्रशासनावरच बोट ठेवले.

शहरातील मुख्य रस्त्यांवरील चौक आणि रस्ते याबाबतची सद्य:स्थिती पाहता नित्याने वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाल्याचे दिसते आहे. त्या अनुषंगाने प्रशासकांनी नाराजी व्यक्त केली. दोन दिवसांपूर्वी शहर विकास आराखड्याच्या अनुषंगाने एका चर्चासत्राचे आयोजन स्मार्ट सिटी कार्यालयात केले होते. त्यात जी. श्रीकांत यांनी मत मांडताना शहरातील रस्ते व चौकांच्या सद्य:स्थितीवर बोट ठेवले. त्यांचा रोख आजवर पालिकेचा कारभार हाकणाऱ्या अधिकाऱ्यांकडे असावा अशी चर्चा आहे.

शहराचा एकत्रित विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून पीएलयू (प्रास्तावित जमीन वापर नकाशा) कसा असावा, याबद्दल पालिका प्रशासन शहराच्या विकासात सहभागी असलेल्या संस्था, संघटनांशी चर्चा करीत आहे. यावेळी जी. श्रीकांत म्हणाले, शहरातील एक तरी चौक योग्य प्रकारे असल्याचे दाखवा. योग्य प्रकारे नियोजन न करता रस्ते आणि चौक तयार करण्यात आले आहेत. जुन्या शहराची स्थिती तर अधिकच बिकट झाली आहे. रस्ते अरुंद झाले आहेत, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची साधने या रस्त्यावरून जाणे अवघड होत आहे. सार्वजनिक वाहुतक व्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर असून पन्नास टक्के टीडीआर संबंधितांना वापरणे बंधनकारक केले आहे.

स्वार्थासाठी शहर वेठीस धरले आहे....पाच ते दहा लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी संपूर्ण शहर वेठीस धरले आहे, त्यामुळे शहराचे नुकसान होत आहे. विकास आराखडा तयार करताना जागांवर आरक्षण पडणारच आहे, पण ते काम पारदर्शकतेने व्हावे. शहराची गरज लक्षात घेऊन पालिका काम करीत आहे. त्यामुळे विकास आराखड्यावर कमीत-कमी सूचना, हरकती येतील, असा प्रशासनाचा प्रयत्न असेल. वेळेत विकास आराखडा तयार करण्याचा होईल, अशी अपेक्षा प्रशासकांनी व्यक्त केली. नवीन विकास आराखड्याच्या माध्यमातून शहरासाठी चांगले नियोजन करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे, असा दावा जी. श्रीकांत यांनी केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका