शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

शहरातील एकही रस्ता, चौक नाही टाऊन प्लॅनिंगच्या चौकटीत; वाहतुकीचा झाला बट्ट्याबोळ

By विकास राऊत | Updated: December 15, 2023 12:15 IST

पाच ते दहा लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी संपूर्ण शहर वेठीस धरले आहे, त्यामुळे शहराचे नुकसान होत आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एकही रस्ता किंवा चौक टाऊन प्लॅनिंगच्या नियमांच्या चौकटीत तयार केलेला नाही. ते निर्माण करताना नियोजनाचा अभाव असल्याचे मत व्यक्त करीत महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी पालिका प्रशासनावरच बोट ठेवले.

शहरातील मुख्य रस्त्यांवरील चौक आणि रस्ते याबाबतची सद्य:स्थिती पाहता नित्याने वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाल्याचे दिसते आहे. त्या अनुषंगाने प्रशासकांनी नाराजी व्यक्त केली. दोन दिवसांपूर्वी शहर विकास आराखड्याच्या अनुषंगाने एका चर्चासत्राचे आयोजन स्मार्ट सिटी कार्यालयात केले होते. त्यात जी. श्रीकांत यांनी मत मांडताना शहरातील रस्ते व चौकांच्या सद्य:स्थितीवर बोट ठेवले. त्यांचा रोख आजवर पालिकेचा कारभार हाकणाऱ्या अधिकाऱ्यांकडे असावा अशी चर्चा आहे.

शहराचा एकत्रित विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून पीएलयू (प्रास्तावित जमीन वापर नकाशा) कसा असावा, याबद्दल पालिका प्रशासन शहराच्या विकासात सहभागी असलेल्या संस्था, संघटनांशी चर्चा करीत आहे. यावेळी जी. श्रीकांत म्हणाले, शहरातील एक तरी चौक योग्य प्रकारे असल्याचे दाखवा. योग्य प्रकारे नियोजन न करता रस्ते आणि चौक तयार करण्यात आले आहेत. जुन्या शहराची स्थिती तर अधिकच बिकट झाली आहे. रस्ते अरुंद झाले आहेत, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची साधने या रस्त्यावरून जाणे अवघड होत आहे. सार्वजनिक वाहुतक व्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर असून पन्नास टक्के टीडीआर संबंधितांना वापरणे बंधनकारक केले आहे.

स्वार्थासाठी शहर वेठीस धरले आहे....पाच ते दहा लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी संपूर्ण शहर वेठीस धरले आहे, त्यामुळे शहराचे नुकसान होत आहे. विकास आराखडा तयार करताना जागांवर आरक्षण पडणारच आहे, पण ते काम पारदर्शकतेने व्हावे. शहराची गरज लक्षात घेऊन पालिका काम करीत आहे. त्यामुळे विकास आराखड्यावर कमीत-कमी सूचना, हरकती येतील, असा प्रशासनाचा प्रयत्न असेल. वेळेत विकास आराखडा तयार करण्याचा होईल, अशी अपेक्षा प्रशासकांनी व्यक्त केली. नवीन विकास आराखड्याच्या माध्यमातून शहरासाठी चांगले नियोजन करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे, असा दावा जी. श्रीकांत यांनी केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका