शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

शहरातील एकही रस्ता, चौक नाही टाऊन प्लॅनिंगच्या चौकटीत; वाहतुकीचा झाला बट्ट्याबोळ

By विकास राऊत | Updated: December 15, 2023 12:15 IST

पाच ते दहा लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी संपूर्ण शहर वेठीस धरले आहे, त्यामुळे शहराचे नुकसान होत आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एकही रस्ता किंवा चौक टाऊन प्लॅनिंगच्या नियमांच्या चौकटीत तयार केलेला नाही. ते निर्माण करताना नियोजनाचा अभाव असल्याचे मत व्यक्त करीत महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी पालिका प्रशासनावरच बोट ठेवले.

शहरातील मुख्य रस्त्यांवरील चौक आणि रस्ते याबाबतची सद्य:स्थिती पाहता नित्याने वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाल्याचे दिसते आहे. त्या अनुषंगाने प्रशासकांनी नाराजी व्यक्त केली. दोन दिवसांपूर्वी शहर विकास आराखड्याच्या अनुषंगाने एका चर्चासत्राचे आयोजन स्मार्ट सिटी कार्यालयात केले होते. त्यात जी. श्रीकांत यांनी मत मांडताना शहरातील रस्ते व चौकांच्या सद्य:स्थितीवर बोट ठेवले. त्यांचा रोख आजवर पालिकेचा कारभार हाकणाऱ्या अधिकाऱ्यांकडे असावा अशी चर्चा आहे.

शहराचा एकत्रित विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून पीएलयू (प्रास्तावित जमीन वापर नकाशा) कसा असावा, याबद्दल पालिका प्रशासन शहराच्या विकासात सहभागी असलेल्या संस्था, संघटनांशी चर्चा करीत आहे. यावेळी जी. श्रीकांत म्हणाले, शहरातील एक तरी चौक योग्य प्रकारे असल्याचे दाखवा. योग्य प्रकारे नियोजन न करता रस्ते आणि चौक तयार करण्यात आले आहेत. जुन्या शहराची स्थिती तर अधिकच बिकट झाली आहे. रस्ते अरुंद झाले आहेत, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची साधने या रस्त्यावरून जाणे अवघड होत आहे. सार्वजनिक वाहुतक व्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर असून पन्नास टक्के टीडीआर संबंधितांना वापरणे बंधनकारक केले आहे.

स्वार्थासाठी शहर वेठीस धरले आहे....पाच ते दहा लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी संपूर्ण शहर वेठीस धरले आहे, त्यामुळे शहराचे नुकसान होत आहे. विकास आराखडा तयार करताना जागांवर आरक्षण पडणारच आहे, पण ते काम पारदर्शकतेने व्हावे. शहराची गरज लक्षात घेऊन पालिका काम करीत आहे. त्यामुळे विकास आराखड्यावर कमीत-कमी सूचना, हरकती येतील, असा प्रशासनाचा प्रयत्न असेल. वेळेत विकास आराखडा तयार करण्याचा होईल, अशी अपेक्षा प्रशासकांनी व्यक्त केली. नवीन विकास आराखड्याच्या माध्यमातून शहरासाठी चांगले नियोजन करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे, असा दावा जी. श्रीकांत यांनी केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका