शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

अनिवासी भारतीय करू शकणार पोस्टल मतदान

By | Published: December 02, 2020 4:12 AM

....... निवडणूक आयोगाने केली सरकारला विचारणा नवी दिल्ली : अनिवासी भारतीयांना मतदानाची परवानगी देण्याच्या मागणीसाठी निवडणूक आयोगाने सरकारशी संपर्क ...

.......

निवडणूक आयोगाने केली सरकारला विचारणा

नवी दिल्ली : अनिवासी भारतीयांना मतदानाची परवानगी देण्याच्या मागणीसाठी निवडणूक आयोगाने सरकारशी संपर्क साधला आहे. १९६१ च्या निवडणूक नियमात दुरुस्ती करीत असे करणे शक्य आहे, तसेच यासाठी संसदेची परवानगी लागणार नाही.

निवडणूक आयोगाने गत आठवड्यात विधि मंत्रालयाला सांगितले आहे की, आसाम, प. बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पाँडिचेरीतील विधानसभा निवडणुकीसाठी एनआरआयना मतदान करता यावे यासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय स्वरूपात आपण तयार आहोत. इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टिमचा विस्तार करण्याचीही तयारी आयोगाने दाखविली आहे.

असे सांगितले जाते की, अंदाजे एक कोटी भारतीय लोक विदेशात राहतात. यातील ६० लाख लोक मतदानासाठी पात्र असतील. ईटीपीबीएस ही सेवा केवळ मतदारांसाठी उपलब्ध आहे. यानुसार, डाक मतपत्र इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठविले जाऊ शकते आणि मेलच्या माध्यमातून परत मागविले जाऊ शकते. यापूर्वी निवडणूक आयोगाला राज्यसभा खासदार आणि उद्योजक नवीन जिंदल यांच्याकडून अशा प्रकारची विनंती करण्यात आली होती.

............